शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

औरंगाबाद जिल्ह्यात रक्तदोषाचे तीन हजारांवर रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 19:35 IST

जिल्ह्यात थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेल यांसारख्या रक्तदोषाचे तीन हजारांवर रुग्ण आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यात थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेल यांसारख्या रक्तदोषाचे तीन हजारांवर रुग्ण आहेत. महाराष्ट्र सरकारने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमाने या रक्ताधित व्यक्तींनाही दिव्यांगत्व प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेलच्या रुग्णांनाही शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळणार आहे.

जिल्ह्यात आजघडीला हिमोफेलियाचे ५५०, थॅलेसेमियाचे २ हजार, तर सिकलसेलचे १ हजार रुग्ण असल्याची माहिती हिमोफेलिया सोसायटीच्या औरंगाबाद चॅप्टरतर्फे देण्यात आली. थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेल यांसारख्या रक्तदोषाने रुग्णांना अपंगत्व येते. केवळ दिव्यांग प्रमाणपत्राअभावी अनेक शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर येत होती. राज्य सरकारने रक्तदोषामुळे येणाऱ्या दिव्यांगत्वासह एकूण २१ प्रकारच्या दिव्यांगत्वाने बाधित व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र देण्याचा निर्णय १४ सप्टेंबर रोजी जाहीर केला. त्यामुळे जिल्ह्यातील रक्तदोषाच्या रुग्णांनाही दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. नव्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी दिव्यांगत्वाचे मूल्यमापन व प्रमाणपत्र वितरणासाठी कार्यप्रणालीही निश्चित करण्यात आली आहे.

२१ प्रकारचे दिव्यांगत्वदृष्टिदोष, कर्णबधिरता, शारीरिक दिव्यांगता, मानसिक आजार, बौद्धिक दिव्यांगता, बहुदिव्यांगता, शारीरिक वाढ खुंटणे, स्वमग्नता, मेंदूचा पक्षाघात, स्नायूंची विकृती, मज्जासंस्थेचे जुने आजार, अध्ययन अक्षमता, मल्टिपल स्क्लेरॉसिस, वाचा व भाषा दोष, अ‍ॅसिड अटॅक व्हिक्टिम, पार्किनसन्स, दृष्टिक्षिणता, कुष्ठरोगासह थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेल या एकूण २१ प्रकारच्या व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.

सुधारणा करण्याची गरज आहे

थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेलच्या रुग्णांना दिव्यांगत्व प्रमाणपत्र देण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. त्यांचा अनेकांना फायदा होईल; परंतु हिमोफेलियाच्या टक्केवारीसंदर्भात सुधारणा करण्याची गरज आहे,असे वाटते.-प्रभुराम जाधव, हिमोफेलिया सोसायटी, औरंगाबाद चॅप्टर

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय