शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

औरंगाबाद जिल्ह्यात रक्तदोषाचे तीन हजारांवर रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 19:35 IST

जिल्ह्यात थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेल यांसारख्या रक्तदोषाचे तीन हजारांवर रुग्ण आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यात थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेल यांसारख्या रक्तदोषाचे तीन हजारांवर रुग्ण आहेत. महाराष्ट्र सरकारने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमाने या रक्ताधित व्यक्तींनाही दिव्यांगत्व प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेलच्या रुग्णांनाही शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळणार आहे.

जिल्ह्यात आजघडीला हिमोफेलियाचे ५५०, थॅलेसेमियाचे २ हजार, तर सिकलसेलचे १ हजार रुग्ण असल्याची माहिती हिमोफेलिया सोसायटीच्या औरंगाबाद चॅप्टरतर्फे देण्यात आली. थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेल यांसारख्या रक्तदोषाने रुग्णांना अपंगत्व येते. केवळ दिव्यांग प्रमाणपत्राअभावी अनेक शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर येत होती. राज्य सरकारने रक्तदोषामुळे येणाऱ्या दिव्यांगत्वासह एकूण २१ प्रकारच्या दिव्यांगत्वाने बाधित व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र देण्याचा निर्णय १४ सप्टेंबर रोजी जाहीर केला. त्यामुळे जिल्ह्यातील रक्तदोषाच्या रुग्णांनाही दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. नव्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी दिव्यांगत्वाचे मूल्यमापन व प्रमाणपत्र वितरणासाठी कार्यप्रणालीही निश्चित करण्यात आली आहे.

२१ प्रकारचे दिव्यांगत्वदृष्टिदोष, कर्णबधिरता, शारीरिक दिव्यांगता, मानसिक आजार, बौद्धिक दिव्यांगता, बहुदिव्यांगता, शारीरिक वाढ खुंटणे, स्वमग्नता, मेंदूचा पक्षाघात, स्नायूंची विकृती, मज्जासंस्थेचे जुने आजार, अध्ययन अक्षमता, मल्टिपल स्क्लेरॉसिस, वाचा व भाषा दोष, अ‍ॅसिड अटॅक व्हिक्टिम, पार्किनसन्स, दृष्टिक्षिणता, कुष्ठरोगासह थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेल या एकूण २१ प्रकारच्या व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.

सुधारणा करण्याची गरज आहे

थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेलच्या रुग्णांना दिव्यांगत्व प्रमाणपत्र देण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. त्यांचा अनेकांना फायदा होईल; परंतु हिमोफेलियाच्या टक्केवारीसंदर्भात सुधारणा करण्याची गरज आहे,असे वाटते.-प्रभुराम जाधव, हिमोफेलिया सोसायटी, औरंगाबाद चॅप्टर

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय