शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

पैठण एमआयडीसीलगतची हजार एकर शेती अन् जलस्त्रोत केमिकलयुक्त पाण्याने प्रदूषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 16:30 IST

केमिकल कंपन्यांमुळे केवळ पाणी आणि शेत जमिनीच प्रदूषित झाल्या नाहीत, तर परिसरातील हवाही दूषित होत असते.

छत्रपती संभाजीनगर : पैठण एमआयडीसीमध्ये काही वर्षांपासून कार्यरत केमिकल कंपन्यांनी एमआयडीलगतचे सर्व जलस्त्रोत आणि तीन गावांतील सुमारे एक हजार एकर जमीन आणि जलस्त्रोतांचे नुकसान केले आहे. कृषी विभागाच्या तपासणीत पिकांसाठी आवश्यक अन्नद्रव्य जमिनीत सापडले नाही. शिवाय दूषित पाण्याच्या वापरामुळे उत्पादनक्षमता घटल्याचा अहवाल आहे. वारंवार तक्रारीनंतरही प्रदूषण नियंत्रण मंडळांकडून केवळ कागदोपत्री कारवाई केली जात असल्याने शेवटी शेतकऱ्यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण एमआयडीसी ही ४० वर्षे जुनी औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीमध्ये ३५वर केमिकल कंपन्या आहेत. औद्योगिक कंपन्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, पैठण एमआयडीसीतील केमिकल निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून नियमांची पायमल्ली होताना दिसते. मुधळवाडी, नारायणगाव आणि वाहेगाव या गावांतर्गत असलेल्या सर्व विहिरींचे जलस्त्रोत प्रदूषित झाले आहेत. केमिकलमिश्रित पाण्याच्या वापराने शेत जमिनीची क्षारता वाढून उत्पादनक्षमता घटली आहे. याबाबत अहवाल कृषी विभागाने दोन वर्षांपूर्वीच दिला. मात्र, याकडे डोळेझाक करण्यात आले.

ठोस कारवाई नाहीकेमिकल कंपन्यांमुळे जलस्त्रोत आणि जमिनीचे नुकसान होत असल्याच्या लेखी तक्रारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २०२२ पासून महाराष्ट्र प्रदूषित नियंत्रण मंडळाकडे केल्या. या तक्रारींची प्रत जिल्हाधिकारी आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळास पाठविल्या. मात्र, शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेल्या या कंपन्यांवर मंडळाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. उलट शेतकऱ्यांवर गुन्हा नोंदविला. शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.- ज्ञानदेव मुळे, युवा जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

वायूप्रदूषणहीकेमिकल कंपन्यांमुळे केवळ पाणी आणि शेत जमिनीच प्रदूषित झाल्या नाहीत, तर परिसरातील हवाही दूषित होत असते. रोज सायंकाळी विविध कंपन्यांतून हवेत सोडण्यात येणाऱ्या धोकादायक वायूमुळे पिकांची पानगळ, फुलगळ आणि फळगळ होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

३ एप्रिल रोजी केंद्रीय हरित लवादांसमोर सुनावणीपैठण एमआयडीसीलगतच्या मुधळवाडी येथील केमिकल कंपन्यांमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोस कारवाई केली नाही. मंगल बोडखे आणि अन्य शेतकऱ्यांनी भरपाईसाठी राष्ट्रीय हरित लवादांत याचिका दाखल केली आहे. या याचिकेची दखल घेत हरित लवादाने नागपूर येथील विश्वेश्वरय्या केमिकल इन्स्टिट्यूटला शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन तेथील जलस्त्रोतांची तपासणी करून अहवाल देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार या संस्थेच्या तज्ज्ञांनी ६ जानेवारी रोजी नमुने घेतले. ३ एप्रिल रोजी या प्रकरणांवर सुनावणी आहे.- विष्णू बोखडे, शेतकरी.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरpollutionप्रदूषणMIDCएमआयडीसी