शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पैठण एमआयडीसीलगतची हजार एकर शेती अन् जलस्त्रोत केमिकलयुक्त पाण्याने प्रदूषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 16:30 IST

केमिकल कंपन्यांमुळे केवळ पाणी आणि शेत जमिनीच प्रदूषित झाल्या नाहीत, तर परिसरातील हवाही दूषित होत असते.

छत्रपती संभाजीनगर : पैठण एमआयडीसीमध्ये काही वर्षांपासून कार्यरत केमिकल कंपन्यांनी एमआयडीलगतचे सर्व जलस्त्रोत आणि तीन गावांतील सुमारे एक हजार एकर जमीन आणि जलस्त्रोतांचे नुकसान केले आहे. कृषी विभागाच्या तपासणीत पिकांसाठी आवश्यक अन्नद्रव्य जमिनीत सापडले नाही. शिवाय दूषित पाण्याच्या वापरामुळे उत्पादनक्षमता घटल्याचा अहवाल आहे. वारंवार तक्रारीनंतरही प्रदूषण नियंत्रण मंडळांकडून केवळ कागदोपत्री कारवाई केली जात असल्याने शेवटी शेतकऱ्यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण एमआयडीसी ही ४० वर्षे जुनी औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीमध्ये ३५वर केमिकल कंपन्या आहेत. औद्योगिक कंपन्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, पैठण एमआयडीसीतील केमिकल निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून नियमांची पायमल्ली होताना दिसते. मुधळवाडी, नारायणगाव आणि वाहेगाव या गावांतर्गत असलेल्या सर्व विहिरींचे जलस्त्रोत प्रदूषित झाले आहेत. केमिकलमिश्रित पाण्याच्या वापराने शेत जमिनीची क्षारता वाढून उत्पादनक्षमता घटली आहे. याबाबत अहवाल कृषी विभागाने दोन वर्षांपूर्वीच दिला. मात्र, याकडे डोळेझाक करण्यात आले.

ठोस कारवाई नाहीकेमिकल कंपन्यांमुळे जलस्त्रोत आणि जमिनीचे नुकसान होत असल्याच्या लेखी तक्रारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २०२२ पासून महाराष्ट्र प्रदूषित नियंत्रण मंडळाकडे केल्या. या तक्रारींची प्रत जिल्हाधिकारी आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळास पाठविल्या. मात्र, शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेल्या या कंपन्यांवर मंडळाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. उलट शेतकऱ्यांवर गुन्हा नोंदविला. शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.- ज्ञानदेव मुळे, युवा जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

वायूप्रदूषणहीकेमिकल कंपन्यांमुळे केवळ पाणी आणि शेत जमिनीच प्रदूषित झाल्या नाहीत, तर परिसरातील हवाही दूषित होत असते. रोज सायंकाळी विविध कंपन्यांतून हवेत सोडण्यात येणाऱ्या धोकादायक वायूमुळे पिकांची पानगळ, फुलगळ आणि फळगळ होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

३ एप्रिल रोजी केंद्रीय हरित लवादांसमोर सुनावणीपैठण एमआयडीसीलगतच्या मुधळवाडी येथील केमिकल कंपन्यांमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोस कारवाई केली नाही. मंगल बोडखे आणि अन्य शेतकऱ्यांनी भरपाईसाठी राष्ट्रीय हरित लवादांत याचिका दाखल केली आहे. या याचिकेची दखल घेत हरित लवादाने नागपूर येथील विश्वेश्वरय्या केमिकल इन्स्टिट्यूटला शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन तेथील जलस्त्रोतांची तपासणी करून अहवाल देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार या संस्थेच्या तज्ज्ञांनी ६ जानेवारी रोजी नमुने घेतले. ३ एप्रिल रोजी या प्रकरणांवर सुनावणी आहे.- विष्णू बोखडे, शेतकरी.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरpollutionप्रदूषणMIDCएमआयडीसी