शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
7
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
8
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
9
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
10
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
11
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
12
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
13
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
14
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
15
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
17
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
18
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
19
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
20
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...

‘त्या’ रिक्षाचालकास एसपीओंनी वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 01:25 IST

रिक्षा चालवून रोजंदारीही निघत नसल्याने वैफल्यातून आत्महत्येसाठी रेल्वेरुळावर झोपलेल्या रिक्षाचालकास वाचविण्यास विशेष पोलीस अधिका-यांना (एसपीओ) यश आले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चार दिवसांवर दिवाळीचा सण आला आणि आठ दिवसांपासून रिक्षा चालवून रोजंदारीही निघत नसल्याने वैफल्यातून आत्महत्येसाठी रेल्वेरुळावर झोपलेल्या रिक्षाचालकास वाचविण्यास विशेष पोलीस अधिका-यांना (एसपीओ) यश आले. ही घटना शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास संग्रामनगर रेल्वे उड्डाणपुलाखाली घडली.सुरेश नामदेव (वय ५०, रा. हनुमानगर, नाव बदलले आहे) हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. एका मुलीचा विवाह झालेला आहे, तर दुसरी नववीत शिकत आहे. मुलगा महाविद्यालयात शिक्षण घेतो. दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी जवळ दोन पैसेही नसल्याने ते रोज सकाळीच रिक्षा व्यवसायासाठी बाहेर नेत. नियमाप्रमाणे प्रवासी वाहतूक करण्यासाठी ते रिक्षाथांब्यावर थांबतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बारा ते चौदा तास काम करूनही त्यांना म्हणावे तसे प्रवासी मिळत नव्हते. प्रवासी न मिळाल्याने त्यांना दैनंदिन रोजंदारीही काढणे दूर होत होते. त्यात त्यांची जुनी रिक्षा असल्याने त्यात नेहमी बिघाड होतो. रिक्षा दुरुस्तीवर पैसे खर्च करावे का दैनंदिन घरखर्च भागवावा, या विवंचनेत ते होते. पैसे शिल्लक राहत नसल्याने ते निराश झाल्याने त्यांच्या पत्नीने त्यांची समजूत काढली. पत्नीने त्यांना हिंमत दिली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास वृद्ध वडिलांना जेऊ घातल्यानंतर ते घराबाहेर पडले. पुंडलिकनगर येथून ते चालत-चालत थेट संग्रामनगर रेल्वे उड्डाणपुलाखाली गेले. रात्री ११ वाजेच्या सुमारास ते रेल्वेरुळावर जाऊन झोपले. साडेअकरा वाजेच्या सुमारास एसपीओ श्रीमंत गोर्डे पाटील, अशोक सोजे यांना ते नजरेस पडले. त्यांनी त्यांना रुळावरून उठवून त्यांची विचापूस केली तेव्हा त्यांनी रिक्षाचा व्यवसाय होत नसल्याने आत्महत्या करण्यासाठी रेल्वेरुळावर झोपल्याचे सांगितले.भविष्याची चिंता सतावत असल्याने मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. यावेळी गोर्डे पाटील, अ‍ॅॅड. रामदास भोसले, नरेंद्र आडे, स्वराज गोर्डे, राहुल सोनकांबळे यांनी त्यांची समजूत काढली आणि नातेवाईकांना बोलावून त्यांच्या स्वाधीन केले.रेल्वेसमोर उडी मारण्याची हिंमत झाली नाहीतत्पूर्वी त्यांच्यासमोरून तीन रेल्वेगाड्या गेल्या. प्रत्येक गाडीसमोर उडी मारून जीवनयात्रा संपवावी, या उद्देशाने ते तिकडे गेले; परंतु रेल्वेसमोर उडी मारण्याची त्यांची हिंमत झाली नाही. शेवटी त्यांनी रेल्वेरुळावर झोपण्याचा निर्णय घेतला.