शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

दहा वर्षांपूर्वीचे आधार कार्ड असेल तर अपडेट करावेच लागेल, अन्यथा होईल ब्लॉक

By विकास राऊत | Updated: November 24, 2022 17:39 IST

१० वर्षांनी आधार ईकेवायसी करणे बंधनकारक आहे.

औरंगाबाद : शासनाच्या नियमानुसार १० वर्षांनी आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ज्यांचे आधार नोंदणी करून १० वर्षे झाली आहेत, त्यांनी आधार कार्ड अपडेट करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले आहे. 

आधार कार्ड काढल्यानंतर कालांतराने अनेक बदल होतात. जसे पत्ता, बोटांचे ठसे, नावातील चुका, मोबाइल क्रमांक नोंदीचे अद्ययावतीकरण होणे आवश्यक असते. त्यासाठी १० वर्षांनी आधार ईकेवायसी करणे बंधनकारक आहे. नजीकच्या आधार केंद्रावर जाऊन हे करणे आवश्यक आहे. १८ वर्षांवरील नागरिकांनी आधार कार्ड काढले नसल्यास व १८ वर्षांनंतर पहिल्यांदाच आधार नोंदणी करीत असल्यास अशा नागरिकांच्या कागदपत्रांची जिल्हास्तरीय आधार समितीमार्फत तपासणी करण्यात येणार आहे.

..तर आधारकार्ड रद्द होईलआतापर्यंत आधारकार्ड का काढले गेले नाही, याची तपासणी समिती नागरिकांचे कागदपत्रे ऑनलाइन सादर झाल्यानंतर करेल. त्यामुळे ज्यांनी अद्याप आधारकार्ड काढलेले नाही त्यांनी कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करावेत. आधारकार्ड काढून दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. त्यांनी आपले आधारकार्ड ई-केवायसी अपडेट करून घ्यावे. आधार अपडेट न केल्यास भविष्यात आधार नोंदणी रद्द होण्याची शक्यता आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डAurangabadऔरंगाबादcollectorजिल्हाधिकारी