शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

तीसगावात भीषण पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 22:36 IST

तीसगाव परिसरातील बहुतांशी जलस्त्रोत आटल्याने गावावर भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे

वाळूज महानगर : तीसगाव परिसरातील बहुतांशी जलस्त्रोत आटल्याने गावावर भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत असून, हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीकडून तीन टँकरने पाणीपुरवठा करुन नागरिकांची तहान भागविली जात आहे.

काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत आहे. याचा सर्वाधिक फटका वाळूज महानगरातील तीसगावला बसला आहे. गावातील बहुतांशी जलस्त्रोत आटले आहेत. तर काहींना केवळ १५ ते २० मिनिटेच तेही कमी दाबाने पाणी येत आहे.

त्यामुळे गावात भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. नागरिकांची गैरसोय लक्षात घेवून ग्रामपंचायतीने पाणीपुरवठ्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु केले आहेत. वरिष्ठ पातळीवर सतत पाठपुरावा करुन ग्रामपंचायतीने तीन टँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा सुरु केला आहे. एमआयडीसीच्या जलकुंभावरुन तीन टँकर प्रत्येकी दोन फेऱ्या केल्या जात आहेत. प्रत्येकाला ड्रमप्रमाणे पाणी दिले जात आहे.

मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात तीन टॅँकर कमी पडत आहेत. त्यातच दर शुक्रवारी लोडशिडिंग असते. शिवाय एमआयडीसीच्या जलवाहिनीत सतत काहीना काही तांत्रिक बिघाड होत असतो. अशावेळी नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. गावची लोकसंख्या लक्षात घेवून टँकरच्या फेºया वाढवाव्यात अथवा टँकरची संख्या वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. या विषयी ग्रामविकास अधिकारी अशोक गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गावातील जलस्त्रोत आटल्याने पाणीटंचाई सुरु आहे. मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात सुरु असलेला पाणीपुरवठा पुरेसा आहे. असे लोकमतशी बोलताना सांगितले.

 

टॅग्स :Walujवाळूजwater scarcityपाणी टंचाई