शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

तीसगावात भीषण पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 22:36 IST

तीसगाव परिसरातील बहुतांशी जलस्त्रोत आटल्याने गावावर भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे

वाळूज महानगर : तीसगाव परिसरातील बहुतांशी जलस्त्रोत आटल्याने गावावर भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत असून, हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीकडून तीन टँकरने पाणीपुरवठा करुन नागरिकांची तहान भागविली जात आहे.

काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत आहे. याचा सर्वाधिक फटका वाळूज महानगरातील तीसगावला बसला आहे. गावातील बहुतांशी जलस्त्रोत आटले आहेत. तर काहींना केवळ १५ ते २० मिनिटेच तेही कमी दाबाने पाणी येत आहे.

त्यामुळे गावात भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. नागरिकांची गैरसोय लक्षात घेवून ग्रामपंचायतीने पाणीपुरवठ्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु केले आहेत. वरिष्ठ पातळीवर सतत पाठपुरावा करुन ग्रामपंचायतीने तीन टँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा सुरु केला आहे. एमआयडीसीच्या जलकुंभावरुन तीन टँकर प्रत्येकी दोन फेऱ्या केल्या जात आहेत. प्रत्येकाला ड्रमप्रमाणे पाणी दिले जात आहे.

मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात तीन टॅँकर कमी पडत आहेत. त्यातच दर शुक्रवारी लोडशिडिंग असते. शिवाय एमआयडीसीच्या जलवाहिनीत सतत काहीना काही तांत्रिक बिघाड होत असतो. अशावेळी नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. गावची लोकसंख्या लक्षात घेवून टँकरच्या फेºया वाढवाव्यात अथवा टँकरची संख्या वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. या विषयी ग्रामविकास अधिकारी अशोक गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गावातील जलस्त्रोत आटल्याने पाणीटंचाई सुरु आहे. मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात सुरु असलेला पाणीपुरवठा पुरेसा आहे. असे लोकमतशी बोलताना सांगितले.

 

टॅग्स :Walujवाळूजwater scarcityपाणी टंचाई