शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

गंगापूर तालुका तहानलेला

By admin | Updated: May 15, 2014 00:26 IST

लालखाँ पठाण , गंगापूर गंगापूर तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना पाणीपुरवठा करणार्‍या टँकरला परवानगी देण्यास तहसील प्रशासन उदासीन आहे.

 लालखाँ पठाण , गंगापूर गंगापूर तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना पाणीपुरवठा करणार्‍या टँकरला परवानगी देण्यास तहसील प्रशासन उदासीन आहे, त्यामुळे नागरिकांत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. शिल्लेगाव, शेंदुरवादा, लासूर स्टेशन, तुर्काबाद या परिसरातील गावांत पाण्याचे दुर्भिक्ष आहे. येथील ग्रामपंचायतींनी पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर व्हावी या करिता ग्रामपंचायतीच्या ठरावासह पंचायत समितीकडे टँकर मिळावे यासाठी प्रस्ताव सादर करून पंधरा दिवसांचा कालावधी लोटला. सदर प्रकरण तहसीलच्या अखत्यारीतील असल्याने पंचायत समितीने तांत्रिक मान्यता देऊन तहसील कार्यालयात सादर केले. प्रस्ताव दाखल झाल्यानंतर २४ तासांत संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी शहानिशा करून तात्काळ अहवाल देऊन गरज असलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी आदेश द्यावे व टँकर सुरू करावे असे शासनाचे सक्त आदेश आहेत, असे असताना या आदेशाला तहसीलदारांकडून केराची टोपली दाखवण्यात येत आहे. निवडणूक काळात प्रचारादरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात गंगापूर येथे आले असता पाणीटंचाईसंदर्भात काही सरपंचांनी मंत्रिमहोदयांच्या कानी समस्या घातल्या होत्या. तहसील प्रशासन हे टंचाईग्रस्त गावास टँकर प्रस्ताव मंजूर करीत नसल्याचे गाºहाणेसुद्धा पदाधिकार्‍यांनी मांडले. यावेळी पालकमंत्र्यांनी तहसीलदारांना सक्त ताकीद देऊन पाणीटंचाईसंदर्भात कुठल्याच प्रकारची सबब ऐकून घेतली जाणार नाही. नागरिकांना वेळीच पाणीपुरवठा करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्या आदेशालासुद्धा तहसीलदारांनी कानाडोळा करीत प्रस्ताव मंजुरीस दिरंगाई केली. काही ठिकाणी गेल्या दीड महिन्यांपासून पाण्याचे टँकर प्रस्ताव मंजुरीविना पडून असून यास तहसील प्रशासनच जबाबदार असल्याचे सरपंच सांगत आहेत. तालुक्यात गतवर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याकारणाने ओढे-नाले खळखळून वाहिले नाहीत, त्यामुळे परिसरातील विहिरी, शेततळे, पाझर तलाव अद्याप कोरडेच आहेत. विहिरींची पाणी पातळी खोल गेली आहे. गोदावरी नदीवरील पैठण येथील धरणाची पाणीपातळी उन्हामुळे दिवसेंदिवस खालावत चालली आहे. तालुक्यातील अतिमहत्त्वाचे टेंभापुरी व शिल्लेगाव मध्यम प्रकल्प पावसाळा प्रारंभापासूनच कोरडेठाक पडलेले आहेत.