शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

तहानलेल्या विद्यापीठाला मिळणार बंधाऱ्यांचा दिलासा; तीन कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी मिळाला निधी

By विजय सरवदे | Updated: January 3, 2024 20:17 IST

नवीन तीन कोल्हापुरी बंधारे उभारणे आणि काही बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीने ५० लाखांचा निधी दिला

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा परिसर डोंगराने वेढलेला आहे. डोंगरावर कोसळणारे पावसाचे पाणी वाहून जाऊ नये, यासाठी ते अडवून जिरविण्यासाठी नवीन तीन कोल्हापुरी बंधारे उभारणे आणि काही बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीने ५० लाखांचा निधी दिला आहे. यामुळे परिसरातील वनराईबरोबरच विहिरींनाही आता बऱ्यापैकी जीवदान मिळणार आहे. विशेष म्हणजे, परिसरातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचे प्रयत्न वाखाणण्यासारखेच राहिले, अशा प्रतिक्रिया विद्यापीठ वर्तुळात उमटल्या.

७२४ एकरमध्ये पसरलेल्या विद्यापीठ परिसरात अनेक नाले आहेत. परिसरात अनेक विभाग, प्रशासकीय कार्यालये, विविध लॅब, विद्यार्थी वसतिगृहे आणि प्राध्यापक- कर्मचारी निवासस्थाने आहेत. जवळपास १२५ एकर परिसरात आंबा, चिंच, आवळा, चिकू आदींच्या फळबागा विस्तारलेल्या आहेत. वनस्पतिशास्त्र अभ्यासक्रमांशी संबंधित विविध प्रकारच्या दुर्मीळ वनस्पतींनी नटलेली उद्याने आहेत. यासाठी मात्र, दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सध्या अस्तित्वात असलेले उपलब्ध १७ बंधारे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्यासाठी अपुरे पडत आहेत. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने आमदार प्रदीप जैस्वाल यांच्याकडे नवीन बंधारे उभारणे, तसेच जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती व खोलीकरणासाठी एक कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव सादर केला होता. आ. जैस्वाल यांनी यासाठी पुढाकार घेऊन जिल्हा नियोजन समितीमार्फत ५० लाखांचा निधी नुकताच विद्यापीठासाठी मंजूर केला आहे.

सन २०१६-१७ मध्ये तत्कालीन कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या कार्यकाळात तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी विद्यापीठातील सिंचनासाठी २५ लाखांचा निधी दिला होता. त्यातून विद्यापीठ परिसरातील जुन्या बंधाऱ्यांची साठवण क्षमता वाढविण्यात आली. याशिवाय ठिकठिकाणी चर खोदून पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविण्यात आले.

१५ कोटी लिटरपर्यंत साठवण क्षमता वाढणारविद्यापीठ परिसरात सध्या सहा मोठे सिमेंट बंधारे आणि ११ नाला बंधारे आहेत. या बंधाऱ्यांची पाणी साठवण क्षमता १०.५० कोटी लिटर एवढी आहे. आता प्राप्त झालेल्या ५० कोटी रुपयांतून प्रत्येकी दीड कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेचे तीन कोल्हापुरी बंधारे उभारले जाणार आहेत. यामुळे विद्यापीठ परिसरात १५ कोटी लिटर एवढी साठवण क्षमता वाढेल, यास विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता रवींद्र काळे यांनी दुजोरा दिला आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादRainपाऊस