शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

तहानलेल्या विद्यापीठाला मिळणार बंधाऱ्यांचा दिलासा; तीन कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी मिळाला निधी

By विजय सरवदे | Updated: January 3, 2024 20:17 IST

नवीन तीन कोल्हापुरी बंधारे उभारणे आणि काही बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीने ५० लाखांचा निधी दिला

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा परिसर डोंगराने वेढलेला आहे. डोंगरावर कोसळणारे पावसाचे पाणी वाहून जाऊ नये, यासाठी ते अडवून जिरविण्यासाठी नवीन तीन कोल्हापुरी बंधारे उभारणे आणि काही बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीने ५० लाखांचा निधी दिला आहे. यामुळे परिसरातील वनराईबरोबरच विहिरींनाही आता बऱ्यापैकी जीवदान मिळणार आहे. विशेष म्हणजे, परिसरातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचे प्रयत्न वाखाणण्यासारखेच राहिले, अशा प्रतिक्रिया विद्यापीठ वर्तुळात उमटल्या.

७२४ एकरमध्ये पसरलेल्या विद्यापीठ परिसरात अनेक नाले आहेत. परिसरात अनेक विभाग, प्रशासकीय कार्यालये, विविध लॅब, विद्यार्थी वसतिगृहे आणि प्राध्यापक- कर्मचारी निवासस्थाने आहेत. जवळपास १२५ एकर परिसरात आंबा, चिंच, आवळा, चिकू आदींच्या फळबागा विस्तारलेल्या आहेत. वनस्पतिशास्त्र अभ्यासक्रमांशी संबंधित विविध प्रकारच्या दुर्मीळ वनस्पतींनी नटलेली उद्याने आहेत. यासाठी मात्र, दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सध्या अस्तित्वात असलेले उपलब्ध १७ बंधारे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्यासाठी अपुरे पडत आहेत. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने आमदार प्रदीप जैस्वाल यांच्याकडे नवीन बंधारे उभारणे, तसेच जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती व खोलीकरणासाठी एक कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव सादर केला होता. आ. जैस्वाल यांनी यासाठी पुढाकार घेऊन जिल्हा नियोजन समितीमार्फत ५० लाखांचा निधी नुकताच विद्यापीठासाठी मंजूर केला आहे.

सन २०१६-१७ मध्ये तत्कालीन कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या कार्यकाळात तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी विद्यापीठातील सिंचनासाठी २५ लाखांचा निधी दिला होता. त्यातून विद्यापीठ परिसरातील जुन्या बंधाऱ्यांची साठवण क्षमता वाढविण्यात आली. याशिवाय ठिकठिकाणी चर खोदून पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविण्यात आले.

१५ कोटी लिटरपर्यंत साठवण क्षमता वाढणारविद्यापीठ परिसरात सध्या सहा मोठे सिमेंट बंधारे आणि ११ नाला बंधारे आहेत. या बंधाऱ्यांची पाणी साठवण क्षमता १०.५० कोटी लिटर एवढी आहे. आता प्राप्त झालेल्या ५० कोटी रुपयांतून प्रत्येकी दीड कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेचे तीन कोल्हापुरी बंधारे उभारले जाणार आहेत. यामुळे विद्यापीठ परिसरात १५ कोटी लिटर एवढी साठवण क्षमता वाढेल, यास विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता रवींद्र काळे यांनी दुजोरा दिला आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादRainपाऊस