शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
2
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
3
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
4
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
5
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
6
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
7
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
8
नवीन वर्षात गुंतवणुकीचा श्रीगणेशा! 'या' आहेत श्रीमंत करणाऱ्या टॉप ५ योजना; सुरक्षा आणि दमदार परतावा
9
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
10
Vijay Hazare Trophy : कोण आहे Devendra Bora? ज्याच्यासमोर हिटमॅन रोहित 'गोल्डन डक'सह ठरला फ्लॉप
11
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
12
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
13
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
14
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
15
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
16
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
17
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
18
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
19
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
20
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
Daily Top 2Weekly Top 5

सातारा परिसराची तहान जारवरच

By admin | Updated: June 2, 2014 01:34 IST

साहेबराव हिवराळे , औरंगाबाद सातारा व देवळाई परिसरात पाऊण लाखाच्या वर लोकसंख्या असून, दरवर्षी टँकर आणि पाण्याच्या जारवरच नागरिकांना तहान भागवावी लागत आहे.

साहेबराव हिवराळे , औरंगाबाद सातारा व देवळाई परिसरात पाऊण लाखाच्या वर लोकसंख्या असून, दरवर्षी टँकर आणि पाण्याच्या जारवरच नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. सातारा परिसरासाठी गेल्या तीन महिन्यांपासून १५ टँकरची मागणी ग्रामपंचायतीने जिल्हा प्रशासनाकडे केली होती. प्रत्यक्षात केवळ ६ टँकर मिळाले. गेल्यावर्षी फेब्रुवारीतच पाण्याची तीव्रटंचाई निर्माण झाली होती. तेव्हा टँकरच्या फेर्‍यांमध्येही वाढ करण्यात आली होती. यंदा फेब्रुवारीपासून अर्ज करूनही प्रशासनाकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याची नाराजी शासन दरबारी पोहोचली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने ६ टँकर आज सातारा परिसरात पाठवले. पाणीपातळी खोल गेल्यामुळे खाजगी टँकर आणि जारच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. या भागात वर्षभर खाजगी पाण्याचा धंदा जोरात सुरू आहे. सातार्‍यात जारचे पाणी वापरणे प्रतिष्ठेचे ठरत आहे. जास्तीच्या टँकरसाठी पाठपुरावा जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयात १५ टँकरसाठी रीतसर मागणी केली असून, कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याच्या योजनेसाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सध्या ६ टँकरने पाणी दिले जात असून, जास्तीच्या टँकरसाठी वरिष्ठांकडे मागणी केली आहे, असे सरपंच अलका शिरसाट व ग्रामसेवक भास्कर साळवे यांनी सांगितले. किती दिवस करणार खर्च सातारा परिसरात बोअरच्या पाण्याने तळ गाठला असून, खाजगी टँकरचे पाणी वापरावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी मात्र खर्च सुरूच आहे. पिण्याच्या पाण्याची सोय करण्याकडे कुणीही लक्ष देत नाही. आंदोलन करण्याची वेळ आली आहे.असे सविता कुलकर्णी यांनी सांगितले. तहान भागत नाही देवीदास नरवडे म्हणाले की, जारच्या पाण्याने तहान भागत नाही. आम्हा सामान्यांना पाणीटंचाईचा फटका बसतो. मनपाप्रमाणे शुद्ध पाणीपुरवठा करून नागरिकांची तहान भागवावी लागते. टँकरच्या अपूर्ण फेर्‍या परिसराचा विस्तार बघता आठवड्यातून एकदा टँकर येते. टँकरची संख्या वाढविण्यासाठी सतत पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. किती दिवस टँकरवर अवलंबून राहावे लागणार आहे, असे हरिभाऊ राठोड यांनी सांगितले. बाटलीच्या पाण्यावर जास्त खर्च अनेकदा तक्रार करूनही शुद्ध पाणीपुरवठ्याकडे कुणीही लक्ष दिलेले नाही. अजून किती दिवस बाटलीतील पाण्यासाठी खर्च करावे लागणार? असा प्रश्न संतोष पारखे यांनी उपस्थित केला. सामान्य व्यक्तीचा खर्च वाढला दीपक पाडळकर म्हणाले की, पाणीपुरवठ्याची सोय नसल्यामुळे व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नाइलाजाने बाटलीबंद पाणी वापरावे लागत आहे. त्यामुळे सामान्य व्यक्तीचा खर्च प्रचंड वाढला आहे. टँकरचे पाणी मिळत नाही. कामगारांना सायकलवर पाणी वाहून न्यावे लागते.