शहरं
Join us  
Trending Stories
1
Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान
2
मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत हरले असते; एलन मस्क यांनी पुन्हा साधला निशाणा
3
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित
4
धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान
5
'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
6
रोड शोच खटकतो! लोकांचा जीव महत्त्वाचा; विजयाचे सेलिब्रेशन करायचे असेल तर... गंभीर स्पष्टच बोलला
7
राहुल गांधींच्या ‘आत्मसमर्पणा’बाबत केलेल्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
8
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर जसबीर सिंगला अटक, पोलिसांची मोठी कारवाई
10
आता कोणत्या देशावर रशिया हल्ला करणार?; १० हजार सैन्य तैनातीच्या दाव्यानं युरोपमध्ये खळबळ
11
Nashik Politics: संजय राऊत-सुधाकर बडगुजर यांच्यातील चॅटिंगचा स्क्रीनशॉट व्हायरल
12
Samruddhi Mahamarg: हा फक्त रस्ता नाही, तर राज्याच्या प्रगतीचा इकॉनॉमिक कॉरिडोर -CM देवेंद्र फडणवीस
13
"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."
14
IND vs ENG रोहित-विराट यांची उणीव नक्कीच भासेल, पण... इंग्लंड दौऱ्याआधी काय म्हणाला कॅप्टन शुबमन गिल
15
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
16
Flight Shame: विमान प्रवासाची लाज, काय आहे फ्लाइंग शेम चळवळ प्रकरण?
17
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
18
डॉक्टर दाम्पत्य 12 दिवस डिजिटल अरेस्ट; CBI अधिकारी असल्याचे भासवून 2 कोटी रुपये लुटले
19
स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार
20
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!

सातारा परिसराची तहान जारवरच

By admin | Updated: June 2, 2014 01:34 IST

साहेबराव हिवराळे , औरंगाबाद सातारा व देवळाई परिसरात पाऊण लाखाच्या वर लोकसंख्या असून, दरवर्षी टँकर आणि पाण्याच्या जारवरच नागरिकांना तहान भागवावी लागत आहे.

साहेबराव हिवराळे , औरंगाबाद सातारा व देवळाई परिसरात पाऊण लाखाच्या वर लोकसंख्या असून, दरवर्षी टँकर आणि पाण्याच्या जारवरच नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. सातारा परिसरासाठी गेल्या तीन महिन्यांपासून १५ टँकरची मागणी ग्रामपंचायतीने जिल्हा प्रशासनाकडे केली होती. प्रत्यक्षात केवळ ६ टँकर मिळाले. गेल्यावर्षी फेब्रुवारीतच पाण्याची तीव्रटंचाई निर्माण झाली होती. तेव्हा टँकरच्या फेर्‍यांमध्येही वाढ करण्यात आली होती. यंदा फेब्रुवारीपासून अर्ज करूनही प्रशासनाकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याची नाराजी शासन दरबारी पोहोचली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने ६ टँकर आज सातारा परिसरात पाठवले. पाणीपातळी खोल गेल्यामुळे खाजगी टँकर आणि जारच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. या भागात वर्षभर खाजगी पाण्याचा धंदा जोरात सुरू आहे. सातार्‍यात जारचे पाणी वापरणे प्रतिष्ठेचे ठरत आहे. जास्तीच्या टँकरसाठी पाठपुरावा जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयात १५ टँकरसाठी रीतसर मागणी केली असून, कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याच्या योजनेसाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सध्या ६ टँकरने पाणी दिले जात असून, जास्तीच्या टँकरसाठी वरिष्ठांकडे मागणी केली आहे, असे सरपंच अलका शिरसाट व ग्रामसेवक भास्कर साळवे यांनी सांगितले. किती दिवस करणार खर्च सातारा परिसरात बोअरच्या पाण्याने तळ गाठला असून, खाजगी टँकरचे पाणी वापरावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी मात्र खर्च सुरूच आहे. पिण्याच्या पाण्याची सोय करण्याकडे कुणीही लक्ष देत नाही. आंदोलन करण्याची वेळ आली आहे.असे सविता कुलकर्णी यांनी सांगितले. तहान भागत नाही देवीदास नरवडे म्हणाले की, जारच्या पाण्याने तहान भागत नाही. आम्हा सामान्यांना पाणीटंचाईचा फटका बसतो. मनपाप्रमाणे शुद्ध पाणीपुरवठा करून नागरिकांची तहान भागवावी लागते. टँकरच्या अपूर्ण फेर्‍या परिसराचा विस्तार बघता आठवड्यातून एकदा टँकर येते. टँकरची संख्या वाढविण्यासाठी सतत पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. किती दिवस टँकरवर अवलंबून राहावे लागणार आहे, असे हरिभाऊ राठोड यांनी सांगितले. बाटलीच्या पाण्यावर जास्त खर्च अनेकदा तक्रार करूनही शुद्ध पाणीपुरवठ्याकडे कुणीही लक्ष दिलेले नाही. अजून किती दिवस बाटलीतील पाण्यासाठी खर्च करावे लागणार? असा प्रश्न संतोष पारखे यांनी उपस्थित केला. सामान्य व्यक्तीचा खर्च वाढला दीपक पाडळकर म्हणाले की, पाणीपुरवठ्याची सोय नसल्यामुळे व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नाइलाजाने बाटलीबंद पाणी वापरावे लागत आहे. त्यामुळे सामान्य व्यक्तीचा खर्च प्रचंड वाढला आहे. टँकरचे पाणी मिळत नाही. कामगारांना सायकलवर पाणी वाहून न्यावे लागते.