शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

राज्यात तिसऱ्या लाटेत १२ लाख कोरोना रुग्ण राहणार ॲक्टिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 15:56 IST

Corona Virus in Maharashtra : दुसऱ्या लाटेच्या दीडपट बाधित होतील तिसऱ्या लाटेत

ठळक मुद्देआरोग्य विभागाचा अंदाज उपचारासाठी यंत्रणा सज्ज

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शहरांत निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत. अशातच नीती आयोगाने येत्या सप्टेंबरमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. डेल्टा प्लसनेही चिंता वाढवली असून, आरोग्य विभागाकडून संभाव्य तिसरी लाट थोपविण्याची तयारी केली जात आहे. तिसऱ्या लाटेत राज्यात तब्बल १२ लाख ९५ हजार रुग्ण ॲक्टिव्ह राहण्याची शक्यता गृहीत धरून आरोग्य यंत्रणा उपचारासाठी सज्ज होत आहे.

राज्यात पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कोरोनाचा एकच कहर पहायला मिळाला. रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आणि मृत्यूचेही प्रमाण वाढले. दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेची ऑक्सिजनपासून इतर उपचार सुविधांच्या बाबतीत कसोटीच लागली. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा आतापासूनच खबरदारीची पावले टाकत आहे. दुसऱ्या लाटेत जेवढे रुग्ण आढळले, त्याच्या दीडपट बाधित रुग्ण तिसऱ्या लाटेत आढळण्याची शक्यता आरोग्य यंत्रणेकडून वर्तविली जात आहे. सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत उपचार सुविधा उभ्या करण्यात येत आहेत.

कोकण विभागात सर्वाधिक रुग्णराज्यात कोकण विभागात सर्वाधिक रुग्ण सक्रिय राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांत मिळून एकूण तीन लाख ४३ हजार २२७ रुग्ण सक्रिय राहण्याची भीती आहे.

औरंगाबादेतील स्थितीऔरंगाबाद जिल्ह्यात तिसऱ्या लाटेत ३१ हजार ९२३ रुग्ण ॲक्टिव्ह राहण्याचा अंदाज आहे. तिसरी लाट आली तर रोज ४६ मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा असणे अपेक्षित आहे. घाटी रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, महापालिका आणि जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग तिसऱ्या लाटेसाठी सज्ज आहेत. त्यादृष्टीने ऑक्सिजन सुविधेत वाढ करण्यासह उपचार सुविधाही सज्ज केली जात आहे.

लक्षणांत सतत बदलकोरोनाचे स्वरूप बदलत गेले तसे रुग्णांच्या लक्षणांतही बदल होत गेला. आधी सर्दी, खोकला, पडसे ही लक्षणे मानली जात होती. त्यानंतर तोंडाची चव जाणे व वास न येणे, जुलाब असे लक्षणे समोर आली. आता अंगदुखी, सांधेदुखी ही लक्षणे मानली जात आहेत. कोरोनाचे स्वरूप बदलत असले तरी निदान आणि उपचार तेच आहे. त्यामुळे कोणतीही चिंता करू नये, असे औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर म्हणाल्या.

कोरोना प्रतिबंधक नियम पाळादुसरी लाट संपली आणि कोरोना गेला हे मनातून काढून टाकले पाहिजे. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. सोशल डिस्टन्ससह कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले पाहिजे. कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यावी.- डाॅ. स्वप्निल लाळे, आरोग्य उपसंचालक

असे राहतील तिसऱ्या लाटेत सक्रिय रुग्ण :विभाग---रुग्णसंख्या-कोकण- ३,४३,२२७-पुणे- ३,२०,६९३- नाशिक- १,६९,३६४-औरंगाबाद- १,६६,७००-अमरावती- ७३,५१७- नागपूर- २,२१,७१२

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAurangabadऔरंगाबादMaharashtraमहाराष्ट्र