शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

विधान परिषदेसाठी होणार तिरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 13:43 IST

महायुती-आघाडीसह अपक्ष उमेदवार मैदानात

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, तिरंगी लढत होणार आहे. या निवडणुकीसाठी सात जणांनी १ आॅगस्ट रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील एकाचा अर्ज बाद झाला, तर उर्वरित सहापैकी तिघांनी सोमवारी (५ आॅगस्टला) उमेदवारी मागे घेतली. महायुतीकडून अंबादास दानवे, आघाडीचे बाबूराव ऊर्फ भवानीदास कुलकर्णी, शहानवाज अब्दुल रहेमान खान यांच्यात लढत होणार आहे. नंदकिशोर सहारे, अब्दुल जावेद अब्दुल वाहेद शेख, तात्यासाहेब चिमणे यांनी सोमवारी माघार घेतली, असे प्रशासनाने स्पष्ट केले. 

तिरंगी लढत होणार असल्यामुळे फोडाफोडीचे राजकारण होण्याची दाट शक्यता आहे. निवडणुकीत भाजपसह ६५७ मतदार सर्व मिळून आहेत. त्यामध्ये भाजप १८९, शिवसेना १४१, काँग्रेस १७०, राष्ट्रवादी काँग्रेस ८०, एमआयएम २८, रिपाइं, बसपा व इतर पक्ष, अपक्ष मिळून ४९, असे मतदार आहेत. या मतदारसंघासाठी १९ आॅगस्ट रोजी मतदान होईल. सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. २२ आॅगस्ट रोजी मतमोजणी होईल. मतदानासाठी तहसीलनिहाय मतदान केंद्र असणार आहे. दोन्ही जिल्ह्यांत १७ ठिकाणी मतदान केंद्र असू शकतील. 

माघारीवर विजयाचे गणितज्या उमेदवारांनी माघार घेतली आहे, त्यातील सहारे, चिमणे यांची माघार महत्त्वाची आहे. या निवडणुकीत पसंतीनिहाय मतदान होते. विजयाचे गणित माघार आणि पसंतीनुसारच होणार असून, त्यासाठी मोठी आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता आहे. भाजपने जि. प. अध्यक्षपद मिळावे, यासाठी अट घालून महापौर नंदकुमार घोडेले यांना रविवारी बोलण्यास मज्जाव केल्यामुळे भाजपचे मतदार किंगमेकर ठरणार आहे. पक्ष, व्हीप आणि आदेशानुसार मतदान होणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात साशंकता आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJalanaजालनाElectionनिवडणूक