शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

विधान परिषदेसाठी होणार तिरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 13:43 IST

महायुती-आघाडीसह अपक्ष उमेदवार मैदानात

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, तिरंगी लढत होणार आहे. या निवडणुकीसाठी सात जणांनी १ आॅगस्ट रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील एकाचा अर्ज बाद झाला, तर उर्वरित सहापैकी तिघांनी सोमवारी (५ आॅगस्टला) उमेदवारी मागे घेतली. महायुतीकडून अंबादास दानवे, आघाडीचे बाबूराव ऊर्फ भवानीदास कुलकर्णी, शहानवाज अब्दुल रहेमान खान यांच्यात लढत होणार आहे. नंदकिशोर सहारे, अब्दुल जावेद अब्दुल वाहेद शेख, तात्यासाहेब चिमणे यांनी सोमवारी माघार घेतली, असे प्रशासनाने स्पष्ट केले. 

तिरंगी लढत होणार असल्यामुळे फोडाफोडीचे राजकारण होण्याची दाट शक्यता आहे. निवडणुकीत भाजपसह ६५७ मतदार सर्व मिळून आहेत. त्यामध्ये भाजप १८९, शिवसेना १४१, काँग्रेस १७०, राष्ट्रवादी काँग्रेस ८०, एमआयएम २८, रिपाइं, बसपा व इतर पक्ष, अपक्ष मिळून ४९, असे मतदार आहेत. या मतदारसंघासाठी १९ आॅगस्ट रोजी मतदान होईल. सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. २२ आॅगस्ट रोजी मतमोजणी होईल. मतदानासाठी तहसीलनिहाय मतदान केंद्र असणार आहे. दोन्ही जिल्ह्यांत १७ ठिकाणी मतदान केंद्र असू शकतील. 

माघारीवर विजयाचे गणितज्या उमेदवारांनी माघार घेतली आहे, त्यातील सहारे, चिमणे यांची माघार महत्त्वाची आहे. या निवडणुकीत पसंतीनिहाय मतदान होते. विजयाचे गणित माघार आणि पसंतीनुसारच होणार असून, त्यासाठी मोठी आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता आहे. भाजपने जि. प. अध्यक्षपद मिळावे, यासाठी अट घालून महापौर नंदकुमार घोडेले यांना रविवारी बोलण्यास मज्जाव केल्यामुळे भाजपचे मतदार किंगमेकर ठरणार आहे. पक्ष, व्हीप आणि आदेशानुसार मतदान होणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात साशंकता आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJalanaजालनाElectionनिवडणूक