शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
4
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
5
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
6
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
7
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
8
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
9
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
10
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
11
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
12
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
13
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
14
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
15
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
16
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
17
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
18
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
19
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
20
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेसाठी होणार तिरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 13:43 IST

महायुती-आघाडीसह अपक्ष उमेदवार मैदानात

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, तिरंगी लढत होणार आहे. या निवडणुकीसाठी सात जणांनी १ आॅगस्ट रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील एकाचा अर्ज बाद झाला, तर उर्वरित सहापैकी तिघांनी सोमवारी (५ आॅगस्टला) उमेदवारी मागे घेतली. महायुतीकडून अंबादास दानवे, आघाडीचे बाबूराव ऊर्फ भवानीदास कुलकर्णी, शहानवाज अब्दुल रहेमान खान यांच्यात लढत होणार आहे. नंदकिशोर सहारे, अब्दुल जावेद अब्दुल वाहेद शेख, तात्यासाहेब चिमणे यांनी सोमवारी माघार घेतली, असे प्रशासनाने स्पष्ट केले. 

तिरंगी लढत होणार असल्यामुळे फोडाफोडीचे राजकारण होण्याची दाट शक्यता आहे. निवडणुकीत भाजपसह ६५७ मतदार सर्व मिळून आहेत. त्यामध्ये भाजप १८९, शिवसेना १४१, काँग्रेस १७०, राष्ट्रवादी काँग्रेस ८०, एमआयएम २८, रिपाइं, बसपा व इतर पक्ष, अपक्ष मिळून ४९, असे मतदार आहेत. या मतदारसंघासाठी १९ आॅगस्ट रोजी मतदान होईल. सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. २२ आॅगस्ट रोजी मतमोजणी होईल. मतदानासाठी तहसीलनिहाय मतदान केंद्र असणार आहे. दोन्ही जिल्ह्यांत १७ ठिकाणी मतदान केंद्र असू शकतील. 

माघारीवर विजयाचे गणितज्या उमेदवारांनी माघार घेतली आहे, त्यातील सहारे, चिमणे यांची माघार महत्त्वाची आहे. या निवडणुकीत पसंतीनिहाय मतदान होते. विजयाचे गणित माघार आणि पसंतीनुसारच होणार असून, त्यासाठी मोठी आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता आहे. भाजपने जि. प. अध्यक्षपद मिळावे, यासाठी अट घालून महापौर नंदकुमार घोडेले यांना रविवारी बोलण्यास मज्जाव केल्यामुळे भाजपचे मतदार किंगमेकर ठरणार आहे. पक्ष, व्हीप आणि आदेशानुसार मतदान होणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात साशंकता आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJalanaजालनाElectionनिवडणूक