शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

गायरानवरील अतिक्रमणे होणार नियमित; हजारो ग्रामस्थांना मिळाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 18:57 IST

३० डिसेंबरपर्यंत संगणकावर मालमत्तेच्या नोंदी घेण्याचे आदेश

ठळक मुद्दे३० डिसेंबरपर्यंत संगणकावर मालमत्तेच्या नोंदी घेण्याचे आदेश

- शेख महेमूद 

वाळूज महानगर : ग्रामीण भागात सरकारी जमिनीवर घरे बांधून केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे. या निर्णयामुळे हजारो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. संबंधित ग्रामपंचायतीने ३० डिसेंबरपर्यंत अतिक्रमित मालमत्तेच्या नोंदी घेण्यात याव्यात, असे अध्यादेशात म्हटले आहे. 

राज्यभरात ग्रामीण भागातील सरकारी जमिनीवर कामगार, शेतमजूर आदींनी कच्ची-पक्की घरे बांधली आहेत. वाळूज उद्योगनगरीत रोजगाराच्या शोधात आलेल्या कामगारांनी जोगेश्वरी, वाळूज, रांजणगाव, करोडी, साजापूर, घाणेगाव, विटावा, वडगाव, पंढरपूर आदी ठिकाणी सरकारी जमिनीवर घरे बांधली. बहुतांश अतिक्रणधारकांच्या नोंदी केवळ करवसुलीसाठी स्थानिक ग्रामपंचायतीने घेतल्यामुळे अनेकांचा भ्रमनिरास होत होता. ही अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी ग्रामसभेत अनेकदा ठराव पारित करण्यात आले आहेत.

सदरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय आदींकडे पाठपुरावा केला होता. विशेष म्हणजे तेथे राहणाऱ्या नागरिकांना स्थानिक ग्रामपंचायतीकडून विविध नागरी सुविधा पुरविण्यात येतात. याच बरोबर अतिक्रमणधारकांकडून नियमितपणे कराची वसुलीही केली जाते. मात्र, मालकी हक्काचा उतारा मिळत नसल्यामुळे या अतिक्रमणधारकांचा शासनदरबारी प्रदीर्घ काळापासून लढा सुरू होता.

वर्षभरापूर्वी या अतिक्रमणधारकांच्या नोंदी संगणकीय प्रणालीत घेण्याची प्रकिया बंद करण्यात आली. मात्र, या नोंदी घेण्याची प्रकिया पुन्हा सुरू करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. यानुसार अतिक्रमणाची डेटा एंट्री करण्याची सुविधा संगणकप्रणालीवर १६ डिसेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात एकही अतिक्रमणाची नोंद नाही व तसा ग्रामसभेचा ठराव संगणकप्रणालीवर नोंदविल्यास अतिक्रमणांच्या नोंदी घेतल्या जाणार नाहीत. ३० डिसेंबरपर्यंत संगणकीयप्रणालीवर नोंदी करण्याची अंतिम मुदत असून, यानंतर नोंदी घेतल्या जाणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

थकीत कर भरल्यानंतर होणार नोंदीशासकीय जागेवर अतिक्रमणे करून घरे बांधणाऱ्यांकडून थकीत घरपट्टी, पाणीपट्टी भरल्यानंतरच या अतिक्रमणांच्या नोंदी संगणकीय प्रणालीत घेतल्या जाणार असल्याचे वाळूजचे ग्रामविकास अधिकारी एस.सी.लव्हाळे, रांजणगावचे ग्रामविकास अधिकारी एस.एन.रोहकले, जोगेश्वरीचे ग्रामविकास अधिकारी बी.एल.भालेराव यांनी सांगितले. थकीत कर भरून नोंदी करण्याचे आवाहनही ग्रामविकास अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायतagricultureशेती