शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

गायरानवरील अतिक्रमणे होणार नियमित; हजारो ग्रामस्थांना मिळाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 18:57 IST

३० डिसेंबरपर्यंत संगणकावर मालमत्तेच्या नोंदी घेण्याचे आदेश

ठळक मुद्दे३० डिसेंबरपर्यंत संगणकावर मालमत्तेच्या नोंदी घेण्याचे आदेश

- शेख महेमूद 

वाळूज महानगर : ग्रामीण भागात सरकारी जमिनीवर घरे बांधून केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे. या निर्णयामुळे हजारो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. संबंधित ग्रामपंचायतीने ३० डिसेंबरपर्यंत अतिक्रमित मालमत्तेच्या नोंदी घेण्यात याव्यात, असे अध्यादेशात म्हटले आहे. 

राज्यभरात ग्रामीण भागातील सरकारी जमिनीवर कामगार, शेतमजूर आदींनी कच्ची-पक्की घरे बांधली आहेत. वाळूज उद्योगनगरीत रोजगाराच्या शोधात आलेल्या कामगारांनी जोगेश्वरी, वाळूज, रांजणगाव, करोडी, साजापूर, घाणेगाव, विटावा, वडगाव, पंढरपूर आदी ठिकाणी सरकारी जमिनीवर घरे बांधली. बहुतांश अतिक्रणधारकांच्या नोंदी केवळ करवसुलीसाठी स्थानिक ग्रामपंचायतीने घेतल्यामुळे अनेकांचा भ्रमनिरास होत होता. ही अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी ग्रामसभेत अनेकदा ठराव पारित करण्यात आले आहेत.

सदरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय आदींकडे पाठपुरावा केला होता. विशेष म्हणजे तेथे राहणाऱ्या नागरिकांना स्थानिक ग्रामपंचायतीकडून विविध नागरी सुविधा पुरविण्यात येतात. याच बरोबर अतिक्रमणधारकांकडून नियमितपणे कराची वसुलीही केली जाते. मात्र, मालकी हक्काचा उतारा मिळत नसल्यामुळे या अतिक्रमणधारकांचा शासनदरबारी प्रदीर्घ काळापासून लढा सुरू होता.

वर्षभरापूर्वी या अतिक्रमणधारकांच्या नोंदी संगणकीय प्रणालीत घेण्याची प्रकिया बंद करण्यात आली. मात्र, या नोंदी घेण्याची प्रकिया पुन्हा सुरू करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. यानुसार अतिक्रमणाची डेटा एंट्री करण्याची सुविधा संगणकप्रणालीवर १६ डिसेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात एकही अतिक्रमणाची नोंद नाही व तसा ग्रामसभेचा ठराव संगणकप्रणालीवर नोंदविल्यास अतिक्रमणांच्या नोंदी घेतल्या जाणार नाहीत. ३० डिसेंबरपर्यंत संगणकीयप्रणालीवर नोंदी करण्याची अंतिम मुदत असून, यानंतर नोंदी घेतल्या जाणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

थकीत कर भरल्यानंतर होणार नोंदीशासकीय जागेवर अतिक्रमणे करून घरे बांधणाऱ्यांकडून थकीत घरपट्टी, पाणीपट्टी भरल्यानंतरच या अतिक्रमणांच्या नोंदी संगणकीय प्रणालीत घेतल्या जाणार असल्याचे वाळूजचे ग्रामविकास अधिकारी एस.सी.लव्हाळे, रांजणगावचे ग्रामविकास अधिकारी एस.एन.रोहकले, जोगेश्वरीचे ग्रामविकास अधिकारी बी.एल.भालेराव यांनी सांगितले. थकीत कर भरून नोंदी करण्याचे आवाहनही ग्रामविकास अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायतagricultureशेती