शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

सीआरपीएफच्या ११ कंपन्या येणार

By admin | Updated: October 3, 2014 00:39 IST

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्याच्या सीमांवर दहा ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. निवडणूक काळात जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त असणार आहे. त्यासाठी केंद्रीय राखीव दलाच्या ११ कंपन्यांची कुमकही जिल्ह्यास मिळणार आहे. जिल्हाधिकारी विक्रमकुमार, पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह, पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केंद्रीय निवडणूक निरीक्षक मनोजकुमार, उपेंद्रनाथ बोरा आणि एम. के. अयप्पा यांचीही उपस्थिती होती. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुबार नावे आहेत. त्यामुळे बोगस मतदान होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी दुबार नावांची बुथवाईज स्वतंत्र यादी करण्यात आली आहे. ही यादी प्रत्येक बुथवर उपलब्ध असेल. यादीतील कुणी मतदानासाठी आला तर त्याच्याकडे दुसरा एखादा ओळखीचा पुरावा मागितला जाईल. बोगस मतदान करीत आहे, असे आढळल्यास लगेच त्याला अटक करून कारवाई करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. उमेदवारांच्या गर्दीमुळे ईव्हीएमचा तुटवडाजिल्ह्यात सहा मतदारसंघांत १५ पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात उरल्यामुळे तेथे दोन- दोन इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) चा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे ईव्हीएमचा तुटवडा जाणवत आहे. आणखी दोन हजार ईव्हीएम लागणार आहेत. आयोगाकडे तशी मागणी केली आहे, असे जिल्हाधिकारी विक्रमकुमार म्हणाले.