शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राजे, महाराजे अनेक झाले पण छत्रपती होणारे शिवाजी पहिलेच : रवींद्र पाटील

By राम शिनगारे | Updated: June 6, 2023 17:34 IST

विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विशेष व्याख्यान

छत्रपती संभाजीनगर : इतिहासासह पुराणकाळात अनेक राजे, महाराजे होऊन गेले. परंतु छत्रपती होणारे शिवाजी महाराज हे पहिलेच होय. राज्याभिषेकाची पायाभरणी ३० वर्षांपासून सुरू होती. त्याचा परिपाक म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन होय, असे प्रतिपादन प्रसिद्ध शिवचरित्रकार रवींद्र पाटील यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महात्मा फुले सभागृहात ’सांप्रत काळामध्ये छत्रपतींच्या राज्यभिषेकाची आवश्कता’ या विषयावर मंगळवारी विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर कुलसचीव डॉ.भगवान साखळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.गजानन सानप, डॉ. योगिता होके पाटील, संचालक डॉ. राजेश रगडे यांची उपस्थिती होती.

व्याख्याते पाटील म्हणाले, ज्या काळात अन्याय, अत्याचारांनी परिसीमा गाठली होती. साधे बोलणेही कठिण झाले होते. त्या काळात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याचा संकल्प केला. त्यासाठी राजमाता जिजाऊ यांची प्रेरणा होती. ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक झाला, मात्र त्यापूर्वी ३० वर्ष या राज्याभिषेकाचीच पायाभरणी करण्यात येत होती. देशाच्या इतिहासात अनेक राजे होऊन गेले, मात्र पहिले छत्रपती शिवाजी महाराजच होच होते. साडेतीनशे वर्षांनंतर शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा महिमा टिकून आहे. त्या शिवराज्यभिषेकाचा महिमा असेतूचंद्र राहील, असेही पाटील यांनी सांगितले.

कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी ’शिवराज्यांभिषेक’चे ऐतिहासिक महत्व सांगितले. प्रा.पराग हासे यांनी सूत्रसंचालन तर डॉ.राजेश रगडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.प्रशांत अमृतकर, डॉ.मुस्तजिब खान, प्रदीपकुमार जाधव यांच्यासह इतर उपस्थित होते.

प्रत्येकजण शिवाजी महाराजांचा मावळाअध्यक्षीय समारोपात प्रकुलगुरु डॉ. शिरसाठ म्हणाले, शिवारायांनी मावळ्यांच्या मदतीने स्वराज्याची निर्मिती केली. त्याच मावळ्यांपैकी आपणही एक आहोत. महाराजांच्या सर्व पैलुंचा अभ्यास झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज