शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

राजे, महाराजे अनेक झाले पण छत्रपती होणारे शिवाजी पहिलेच : रवींद्र पाटील

By राम शिनगारे | Updated: June 6, 2023 17:34 IST

विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विशेष व्याख्यान

छत्रपती संभाजीनगर : इतिहासासह पुराणकाळात अनेक राजे, महाराजे होऊन गेले. परंतु छत्रपती होणारे शिवाजी महाराज हे पहिलेच होय. राज्याभिषेकाची पायाभरणी ३० वर्षांपासून सुरू होती. त्याचा परिपाक म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन होय, असे प्रतिपादन प्रसिद्ध शिवचरित्रकार रवींद्र पाटील यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महात्मा फुले सभागृहात ’सांप्रत काळामध्ये छत्रपतींच्या राज्यभिषेकाची आवश्कता’ या विषयावर मंगळवारी विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर कुलसचीव डॉ.भगवान साखळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.गजानन सानप, डॉ. योगिता होके पाटील, संचालक डॉ. राजेश रगडे यांची उपस्थिती होती.

व्याख्याते पाटील म्हणाले, ज्या काळात अन्याय, अत्याचारांनी परिसीमा गाठली होती. साधे बोलणेही कठिण झाले होते. त्या काळात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याचा संकल्प केला. त्यासाठी राजमाता जिजाऊ यांची प्रेरणा होती. ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक झाला, मात्र त्यापूर्वी ३० वर्ष या राज्याभिषेकाचीच पायाभरणी करण्यात येत होती. देशाच्या इतिहासात अनेक राजे होऊन गेले, मात्र पहिले छत्रपती शिवाजी महाराजच होच होते. साडेतीनशे वर्षांनंतर शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा महिमा टिकून आहे. त्या शिवराज्यभिषेकाचा महिमा असेतूचंद्र राहील, असेही पाटील यांनी सांगितले.

कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी ’शिवराज्यांभिषेक’चे ऐतिहासिक महत्व सांगितले. प्रा.पराग हासे यांनी सूत्रसंचालन तर डॉ.राजेश रगडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.प्रशांत अमृतकर, डॉ.मुस्तजिब खान, प्रदीपकुमार जाधव यांच्यासह इतर उपस्थित होते.

प्रत्येकजण शिवाजी महाराजांचा मावळाअध्यक्षीय समारोपात प्रकुलगुरु डॉ. शिरसाठ म्हणाले, शिवारायांनी मावळ्यांच्या मदतीने स्वराज्याची निर्मिती केली. त्याच मावळ्यांपैकी आपणही एक आहोत. महाराजांच्या सर्व पैलुंचा अभ्यास झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज