शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

राजे, महाराजे अनेक झाले पण छत्रपती होणारे शिवाजी पहिलेच : रवींद्र पाटील

By राम शिनगारे | Updated: June 6, 2023 17:34 IST

विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विशेष व्याख्यान

छत्रपती संभाजीनगर : इतिहासासह पुराणकाळात अनेक राजे, महाराजे होऊन गेले. परंतु छत्रपती होणारे शिवाजी महाराज हे पहिलेच होय. राज्याभिषेकाची पायाभरणी ३० वर्षांपासून सुरू होती. त्याचा परिपाक म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन होय, असे प्रतिपादन प्रसिद्ध शिवचरित्रकार रवींद्र पाटील यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महात्मा फुले सभागृहात ’सांप्रत काळामध्ये छत्रपतींच्या राज्यभिषेकाची आवश्कता’ या विषयावर मंगळवारी विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर कुलसचीव डॉ.भगवान साखळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.गजानन सानप, डॉ. योगिता होके पाटील, संचालक डॉ. राजेश रगडे यांची उपस्थिती होती.

व्याख्याते पाटील म्हणाले, ज्या काळात अन्याय, अत्याचारांनी परिसीमा गाठली होती. साधे बोलणेही कठिण झाले होते. त्या काळात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याचा संकल्प केला. त्यासाठी राजमाता जिजाऊ यांची प्रेरणा होती. ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक झाला, मात्र त्यापूर्वी ३० वर्ष या राज्याभिषेकाचीच पायाभरणी करण्यात येत होती. देशाच्या इतिहासात अनेक राजे होऊन गेले, मात्र पहिले छत्रपती शिवाजी महाराजच होच होते. साडेतीनशे वर्षांनंतर शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा महिमा टिकून आहे. त्या शिवराज्यभिषेकाचा महिमा असेतूचंद्र राहील, असेही पाटील यांनी सांगितले.

कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी ’शिवराज्यांभिषेक’चे ऐतिहासिक महत्व सांगितले. प्रा.पराग हासे यांनी सूत्रसंचालन तर डॉ.राजेश रगडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.प्रशांत अमृतकर, डॉ.मुस्तजिब खान, प्रदीपकुमार जाधव यांच्यासह इतर उपस्थित होते.

प्रत्येकजण शिवाजी महाराजांचा मावळाअध्यक्षीय समारोपात प्रकुलगुरु डॉ. शिरसाठ म्हणाले, शिवारायांनी मावळ्यांच्या मदतीने स्वराज्याची निर्मिती केली. त्याच मावळ्यांपैकी आपणही एक आहोत. महाराजांच्या सर्व पैलुंचा अभ्यास झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज