शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ना लेणी पाहायला वेळ मिळाला, ना चर्चा झाली; २०० पर्यटक नुसतेच आले अन् गेले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 20:02 IST

औरंगाबादेत झालेल्या सहाव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेच्या माध्यमातून शहरात एकाच वेळी २०० विदेशी पाहुणे आले होते.

ठळक मुद्देसहाव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेच्या माध्यमातून शहरात एकाच वेळी २०० विदेशी पाहुणे आले होते.वेळ आणि नियोजनाच्या अभावामुळे कोणतीही चर्चा न होताच विदेशी पर्यटक नुसतेच आले आणि गेले.यामुळे पर्यटन क्षेत्रातील एक मोठी संधी हातातून निसटल्याची खंत शहरातील सहल आयोजकांनी व्यक्त केली. 

औरंगाबाद : औरंगाबादेत झालेल्या सहाव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेच्या माध्यमातून शहरात एकाच वेळी २०० विदेशी पाहुणे आले होते. या पाहुण्यांशी शहरातील पर्यटनासंबंधी चर्चा करण्यासाठी स्थानिक सहल आयोजकांनाही आमंत्रित करण्यात आले होते; पण वेळ आणि नियोजनाच्या अभावामुळे कोणतीही चर्चा न होताच विदेशी पर्यटक नुसतेच आले आणि गेले. यामुळे पर्यटन क्षेत्रातील एक मोठी संधी हातातून निसटल्याची खंत शहरातील सहल आयोजकांनी व्यक्त केली. 

देशातील बौद्ध सर्किटमध्ये औरंगाबादला जोडून शहराचा बौद्ध पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याचे मागच्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे पर्यटन खात्याच्या सहकार्याने आयोजित या परिषदेच्या माध्यमातून अनेक वर्षांच्या प्रयत्नांना मूर्त रूप मिळेल, अशी अपेक्षा सहल आयोजकांसोबतच शहरातील पर्यटनप्रेमींनाही होती. जागतिक स्तरावरून मोठ्या प्रमाणावर पर्यटक शहरात येणे, हेदेखील पहिल्यांदाच होत होते. 

या पर्यटकांमध्ये विविध देशांचे मंत्री, सचिव, भन्ते, पत्रकार, बौद्ध अभ्यागत आणि पर्यटक अशा सर्वांचाच समावेश होता. दि. २४ आॅगस्ट रोजी विमानतळावर आगमन झाल्यानंतर हे पर्यटक अजिंठा लेणीकडे रवाना झाले. लेणी परिसरात पोहोचायला त्यांना दु. २ वाजले. दोन तासात लेणी पाहिल्यानंतर पर्यटक पुन्हा औरंगाबादकडे रवाना झाले. दिवसभर अजिंठा लेणी पाहिल्यानंतर सायंकाळी शहरातील पर्यटनाच्या सुविधांसंदर्भात स्थानिक सहल आयोजकांशी चर्चा आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार होता; पण पर्यटकांना तसेच पर्यटनमंत्र्यांना येण्यास उशीर झाल्यामुळे ना धड सांस्कृतिक कार्यक्रम पाहता आला ना सहल आयोजकांशी चर्चा करण्यात आली. 

सगळ्या अपेक्षा फोल ठरल्याच्या कार्यक्रमात जर स्थानिक सहल आयोजक आणि परदेशी पाहुणे यांना चर्चा करण्यास वेळ मिळाला असता, तर आपल्या शहरात पर्यटनाच्या उत्तमोत्तम सुविधा उपलब्ध आहेत, हे आम्हाला त्यांना उत्तम प्रकारे पटवून देता आले असते. तसेच त्यांच्या आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षा जाणून घेण्याचीही संधी मिळाली असती आणि त्यादृष्टीने आपल्याकडे सुधारणा करता येऊ शकत होत्या. आपल्याकडच्या सोयी-सुविधा जाणून परदेशी पाहुण्यांनीही लवकरच पुन्हा येथे येण्यास पुढाकार घेतला असता; पण नियोजनाअभावी सगळ्या अपेक्षा फोल ठरल्या असून एक चांगली संधी हातातून निसटली, अशी खंत सहल आयोजकांनी व्यक्त केली. 

लेणी पाहायला कमी वेळ मिळालादिवसभराचे वेळापत्रक अत्यंत धावपळीचे असल्यामुळे लेणी परिसरात खूप कमी वेळ थांबता आले. अजिंठा लेणी पाहायला आणखी थोडा निवांत वेळ मिळायला हवा होता, अशी खंत काही परदेशी पाहुण्यांनी सायंकाळच्या कार्यक्रमात व्यक्त केल्याचेही समजते. 

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळtourismपर्यटनBuddha Cavesबौद्ध लेणीAurangabadऔरंगाबादGovernmentसरकार