शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

ना लेणी पाहायला वेळ मिळाला, ना चर्चा झाली; २०० पर्यटक नुसतेच आले अन् गेले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 20:02 IST

औरंगाबादेत झालेल्या सहाव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेच्या माध्यमातून शहरात एकाच वेळी २०० विदेशी पाहुणे आले होते.

ठळक मुद्देसहाव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेच्या माध्यमातून शहरात एकाच वेळी २०० विदेशी पाहुणे आले होते.वेळ आणि नियोजनाच्या अभावामुळे कोणतीही चर्चा न होताच विदेशी पर्यटक नुसतेच आले आणि गेले.यामुळे पर्यटन क्षेत्रातील एक मोठी संधी हातातून निसटल्याची खंत शहरातील सहल आयोजकांनी व्यक्त केली. 

औरंगाबाद : औरंगाबादेत झालेल्या सहाव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेच्या माध्यमातून शहरात एकाच वेळी २०० विदेशी पाहुणे आले होते. या पाहुण्यांशी शहरातील पर्यटनासंबंधी चर्चा करण्यासाठी स्थानिक सहल आयोजकांनाही आमंत्रित करण्यात आले होते; पण वेळ आणि नियोजनाच्या अभावामुळे कोणतीही चर्चा न होताच विदेशी पर्यटक नुसतेच आले आणि गेले. यामुळे पर्यटन क्षेत्रातील एक मोठी संधी हातातून निसटल्याची खंत शहरातील सहल आयोजकांनी व्यक्त केली. 

देशातील बौद्ध सर्किटमध्ये औरंगाबादला जोडून शहराचा बौद्ध पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याचे मागच्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे पर्यटन खात्याच्या सहकार्याने आयोजित या परिषदेच्या माध्यमातून अनेक वर्षांच्या प्रयत्नांना मूर्त रूप मिळेल, अशी अपेक्षा सहल आयोजकांसोबतच शहरातील पर्यटनप्रेमींनाही होती. जागतिक स्तरावरून मोठ्या प्रमाणावर पर्यटक शहरात येणे, हेदेखील पहिल्यांदाच होत होते. 

या पर्यटकांमध्ये विविध देशांचे मंत्री, सचिव, भन्ते, पत्रकार, बौद्ध अभ्यागत आणि पर्यटक अशा सर्वांचाच समावेश होता. दि. २४ आॅगस्ट रोजी विमानतळावर आगमन झाल्यानंतर हे पर्यटक अजिंठा लेणीकडे रवाना झाले. लेणी परिसरात पोहोचायला त्यांना दु. २ वाजले. दोन तासात लेणी पाहिल्यानंतर पर्यटक पुन्हा औरंगाबादकडे रवाना झाले. दिवसभर अजिंठा लेणी पाहिल्यानंतर सायंकाळी शहरातील पर्यटनाच्या सुविधांसंदर्भात स्थानिक सहल आयोजकांशी चर्चा आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार होता; पण पर्यटकांना तसेच पर्यटनमंत्र्यांना येण्यास उशीर झाल्यामुळे ना धड सांस्कृतिक कार्यक्रम पाहता आला ना सहल आयोजकांशी चर्चा करण्यात आली. 

सगळ्या अपेक्षा फोल ठरल्याच्या कार्यक्रमात जर स्थानिक सहल आयोजक आणि परदेशी पाहुणे यांना चर्चा करण्यास वेळ मिळाला असता, तर आपल्या शहरात पर्यटनाच्या उत्तमोत्तम सुविधा उपलब्ध आहेत, हे आम्हाला त्यांना उत्तम प्रकारे पटवून देता आले असते. तसेच त्यांच्या आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षा जाणून घेण्याचीही संधी मिळाली असती आणि त्यादृष्टीने आपल्याकडे सुधारणा करता येऊ शकत होत्या. आपल्याकडच्या सोयी-सुविधा जाणून परदेशी पाहुण्यांनीही लवकरच पुन्हा येथे येण्यास पुढाकार घेतला असता; पण नियोजनाअभावी सगळ्या अपेक्षा फोल ठरल्या असून एक चांगली संधी हातातून निसटली, अशी खंत सहल आयोजकांनी व्यक्त केली. 

लेणी पाहायला कमी वेळ मिळालादिवसभराचे वेळापत्रक अत्यंत धावपळीचे असल्यामुळे लेणी परिसरात खूप कमी वेळ थांबता आले. अजिंठा लेणी पाहायला आणखी थोडा निवांत वेळ मिळायला हवा होता, अशी खंत काही परदेशी पाहुण्यांनी सायंकाळच्या कार्यक्रमात व्यक्त केल्याचेही समजते. 

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळtourismपर्यटनBuddha Cavesबौद्ध लेणीAurangabadऔरंगाबादGovernmentसरकार