शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
2
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
3
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
4
"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट
5
NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...
6
ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
7
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
8
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!
9
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
10
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
11
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
12
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
13
विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय?
14
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
15
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
16
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
17
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
18
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
19
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
20
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!

शेड आहे, संरक्षक भिंतच नाही; अनेक ठिकाणी सुविधांची वाणवा

By admin | Updated: December 16, 2015 23:12 IST

हिंगोली : जिल्हाभरात अनेक गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा आहे. परंतु मागणी करूनही सोयी-सुविधा पुरविल्या गेलेल्या नाहीत.

हिंगोली : जिल्हाभरात अनेक गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा आहे. परंतु मागणी करूनही सोयी-सुविधा पुरविल्या गेलेल्या नाहीत. करंजीत सुविधांचा अभाव करंजी : वसमत तालुक्यातील करंजी येथे हिंदू व मुस्लिम बांधवासाठी दोन स्वतंत्र स्मशानभूमी आहेत. मात्र दोन्ही स्मशानभूमींची दुरवस्था झाली आहे. सध्या स्मशानभूमीला संरक्षक भिंत नसल्यामुळे याठिकाणी रात्रीच्या वेळी प्राणी आपले निवारा करून राहत आहेत. पावसाळ्यामध्ये एखादा ग्रामस्थ मरण पावला तर दहन विधीसाठी साधे टिनपत्रेसुद्धा नाहीत. अनेकवेळा स्मशानभूमीला संरक्षक भिंतीची मागणी करूनही अद्याप काम झाले नाही. करंजी परिसरातील इतर गावांमध्येही स्मशानभूमीत मुलभूत सोयीसुविधांची समस्या आहे. कडोळीत एकच जागा कडोळी : येथे एकच स्मशानभूमी शेड असून २००३-२००४ मध्ये बांधकाम पूर्ण झाले आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करायचे झाल्यास खाली करावे लागते. कारण त्यामधील सर्व बेड उखडले आहे. शेडची कुठल्याही प्रकारे दुरूस्ती झालेली नाही. गावात ५ हजार लोकसंख्या अजून दोन स्मशानभूमी आवश्यक आहेत. एकाच दिवशी जर दोन मृत्यू झाले तर एकाच शेडखाली अंत्यसंस्कार करावे लागतात. तेथे जाण्यास रस्ताही नसून विजेची व्यवस्था ग्रा.पं.करणार आहे. पावसाळ्यात अडचणी वाढतात. साटंब्यात अडचण भांडेगाव : भांडेगाव येथे स्मशानभूमीची मोठी अडचण होती. परंतु आता येथे स्वच्छता करून स्मशानभूमीची अडचण दूर केली. तर साटंबा येथेही स्मशानभूमीला कुंपन केलेले आहे. या ठिकाणी शेड नसल्याने पावसाळ्यात अंत्यविधीस अडचण येते. साटंबा येथे हिंदू, मुस्लिम, बौद्ध, मातंग अशा वेगवेगळ्या समाजाच्या स्मशानभूमीसाठी वेगळी व्यवस्था आहे. परंतु एकाही ठिकाणी पावसाळ्यात अंत्यविधी करण्यास सोय नाही. तोंडापुरात समस्यांचा विळखा वारंगाफाटा : तोंडापूर येथील तिन्ही स्मशानभूमी चहूबाजूने समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या आहेत. एक स्मशानभूमी ही अर्धवट बांधलेली आहे. एक मुस्लिम व एक बौद्ध समाजाची स्मशानभूमी आहेत. सदरील स्मशानभूमींना तारकुंपन व संरक्षक भिंत सोडली तर कुठल्याही प्रकारच्या आवश्यक सोयीसुविधा नाहीत. सुशोभिकरणासाठी शासनाकडून अद्याप अनुदान खर्च करण्यात आलेला नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. चिखलातून जाते वाट डोंगरकडा : गावाची लोकसंख्या दहा हजारावर असून सर्व जातीधर्माच्या वेगवेगळ्या स्मशानभूमी आहेत. पण गावातील एकाही स्मशानभूमीला शेड पक्का रस्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. पावसाळ्यात तर अंत्यविधीला फार मोठी समस्या येते. बौद्ध स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी पावसाळ्यात चिखलातून वाट काढावी लागते. गावंडे व अडकिणे गल्लीच्या स्मशानभूमीला लोकसहभागातून निधी गोळा करून तारकुंपन करण्यात आलेले आहे. डोंगरकडा फाटा येथे एकच स्मशानभूमी असून शेड, संरक्षक भिंत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. शिरडला सुविधा नाहीत शिरडशहापूर : येथे तीन स्मशानभूमी असून दोन समाजांसाठी मात्र कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. आहे त्या स्मशानभूमीतही कोणत्याच सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. गावची स्मशानभूमी ही नदीपलीकडे आहे. जैन समाजाच्या स्मशानभूमीत नुसते शेड उभारलेले असून तारांचे कुंपन आहे. दलितवस्ती स्मशानभूमीत अर्धवट संरक्षक भिंतीचे काम आमदार फंडातून झाले आहे. गौडगल्लीच्या स्मशानभूमीची संरक्षक भिंत नुकतीच बांधली आहे. मराठा व लिंगायत समाजाला स्मशानभूमीसाठी जागाच नसल्याने उघड्यावर अथवा शेतात अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. सर्वच स्मशानभूमीला जाण्यास चांगला रस्ता नाही. साधे हातपंप, वीज व्यवस्था नसल्यामुळे रात्री अंधाराचा सामना करावा लागतो.