शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

शेड आहे, संरक्षक भिंतच नाही; अनेक ठिकाणी सुविधांची वाणवा

By admin | Updated: December 16, 2015 23:12 IST

हिंगोली : जिल्हाभरात अनेक गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा आहे. परंतु मागणी करूनही सोयी-सुविधा पुरविल्या गेलेल्या नाहीत.

हिंगोली : जिल्हाभरात अनेक गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा आहे. परंतु मागणी करूनही सोयी-सुविधा पुरविल्या गेलेल्या नाहीत. करंजीत सुविधांचा अभाव करंजी : वसमत तालुक्यातील करंजी येथे हिंदू व मुस्लिम बांधवासाठी दोन स्वतंत्र स्मशानभूमी आहेत. मात्र दोन्ही स्मशानभूमींची दुरवस्था झाली आहे. सध्या स्मशानभूमीला संरक्षक भिंत नसल्यामुळे याठिकाणी रात्रीच्या वेळी प्राणी आपले निवारा करून राहत आहेत. पावसाळ्यामध्ये एखादा ग्रामस्थ मरण पावला तर दहन विधीसाठी साधे टिनपत्रेसुद्धा नाहीत. अनेकवेळा स्मशानभूमीला संरक्षक भिंतीची मागणी करूनही अद्याप काम झाले नाही. करंजी परिसरातील इतर गावांमध्येही स्मशानभूमीत मुलभूत सोयीसुविधांची समस्या आहे. कडोळीत एकच जागा कडोळी : येथे एकच स्मशानभूमी शेड असून २००३-२००४ मध्ये बांधकाम पूर्ण झाले आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करायचे झाल्यास खाली करावे लागते. कारण त्यामधील सर्व बेड उखडले आहे. शेडची कुठल्याही प्रकारे दुरूस्ती झालेली नाही. गावात ५ हजार लोकसंख्या अजून दोन स्मशानभूमी आवश्यक आहेत. एकाच दिवशी जर दोन मृत्यू झाले तर एकाच शेडखाली अंत्यसंस्कार करावे लागतात. तेथे जाण्यास रस्ताही नसून विजेची व्यवस्था ग्रा.पं.करणार आहे. पावसाळ्यात अडचणी वाढतात. साटंब्यात अडचण भांडेगाव : भांडेगाव येथे स्मशानभूमीची मोठी अडचण होती. परंतु आता येथे स्वच्छता करून स्मशानभूमीची अडचण दूर केली. तर साटंबा येथेही स्मशानभूमीला कुंपन केलेले आहे. या ठिकाणी शेड नसल्याने पावसाळ्यात अंत्यविधीस अडचण येते. साटंबा येथे हिंदू, मुस्लिम, बौद्ध, मातंग अशा वेगवेगळ्या समाजाच्या स्मशानभूमीसाठी वेगळी व्यवस्था आहे. परंतु एकाही ठिकाणी पावसाळ्यात अंत्यविधी करण्यास सोय नाही. तोंडापुरात समस्यांचा विळखा वारंगाफाटा : तोंडापूर येथील तिन्ही स्मशानभूमी चहूबाजूने समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या आहेत. एक स्मशानभूमी ही अर्धवट बांधलेली आहे. एक मुस्लिम व एक बौद्ध समाजाची स्मशानभूमी आहेत. सदरील स्मशानभूमींना तारकुंपन व संरक्षक भिंत सोडली तर कुठल्याही प्रकारच्या आवश्यक सोयीसुविधा नाहीत. सुशोभिकरणासाठी शासनाकडून अद्याप अनुदान खर्च करण्यात आलेला नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. चिखलातून जाते वाट डोंगरकडा : गावाची लोकसंख्या दहा हजारावर असून सर्व जातीधर्माच्या वेगवेगळ्या स्मशानभूमी आहेत. पण गावातील एकाही स्मशानभूमीला शेड पक्का रस्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. पावसाळ्यात तर अंत्यविधीला फार मोठी समस्या येते. बौद्ध स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी पावसाळ्यात चिखलातून वाट काढावी लागते. गावंडे व अडकिणे गल्लीच्या स्मशानभूमीला लोकसहभागातून निधी गोळा करून तारकुंपन करण्यात आलेले आहे. डोंगरकडा फाटा येथे एकच स्मशानभूमी असून शेड, संरक्षक भिंत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. शिरडला सुविधा नाहीत शिरडशहापूर : येथे तीन स्मशानभूमी असून दोन समाजांसाठी मात्र कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. आहे त्या स्मशानभूमीतही कोणत्याच सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. गावची स्मशानभूमी ही नदीपलीकडे आहे. जैन समाजाच्या स्मशानभूमीत नुसते शेड उभारलेले असून तारांचे कुंपन आहे. दलितवस्ती स्मशानभूमीत अर्धवट संरक्षक भिंतीचे काम आमदार फंडातून झाले आहे. गौडगल्लीच्या स्मशानभूमीची संरक्षक भिंत नुकतीच बांधली आहे. मराठा व लिंगायत समाजाला स्मशानभूमीसाठी जागाच नसल्याने उघड्यावर अथवा शेतात अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. सर्वच स्मशानभूमीला जाण्यास चांगला रस्ता नाही. साधे हातपंप, वीज व्यवस्था नसल्यामुळे रात्री अंधाराचा सामना करावा लागतो.