शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

स्वातंत्र्यापासून केसापुरी गावाला रस्ताच नाही; ग्रामस्थांना निवडणुकीतच होते बसचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 17:24 IST

विद्यार्थी, शेतकरी,  शिक्षकवृंदांची कसरत

ठळक मुद्दे३ किलोमीटर पायपीटकेवळ निवडणुकीच्या वेळीच मतदान यंत्र घेऊन येणाऱ्या बसचे होते दर्शन

- संतोष वाघ । चितेगाव (औरंगाबाद ) : चितेगावपासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या केसापुरीला देश स्वतंत्र झाल्यापासून डांबरी रस्ताच तयार केलेला नाही. लोकप्रतिनिधी १० वर्षांतून एकदा दगड-माती टाकून कसाबसा रस्ता तयार करतात. पावसाळ्यातील ४ महिने गुडघ्यापर्यंत चिखल तुडवीत या रस्त्यातून वाट काढावी लागते.

पैठण तालुक्यातील केसापुरी गावात रस्ताच नाही. बाभूळगाव ते केसापुरी हा ३ किलोमीटरचा रस्ताही दलदलीचा झाल्याने शेतकरी, दूध विक्रेते व विद्यार्थ्यांना या रस्त्याने जाणे-येणे करणे म्हणजे तारेवरची कसरतच ठरते.  मागील ७१ वर्षांत या गावात डांबरी रस्ता कधी तयारच झाला नाही. या गावाची दळणवळण व्यवस्था  कोलमडलेली आहे. या गावच्या ग्रामस्थांना बाहेरगावी जाण्या-येण्यासाठी खाजगी वाहनही उपलब्ध होऊ शकत नाही. केवळ निवडणुकीच्या वेळीच मतदान यंत्र घेऊन येणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या बसचे दर्शन गावकऱ्यांना होते. मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत केसापुरी या गावाची निवड होऊनही रस्ताच नसल्याने गावाचे परिवर्तन होणार कसे, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. या पंचवार्षिकपासून चितेगाव हा जिल्हा परिषद गट नव्याने उदयास आला. याठिकाणी निवडून येणारा जि.प. सदस्य हा केसापुरी गावाच्या रस्त्याचा प्रश्न मिटवील म्हणून गावकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; परंतु निवडणुका होऊन २ वर्षे उलटली तरीही या रस्त्याकडे सदस्याचे साधे लक्षही गेले नसल्यामुळे ३ किलोमीटर चिखल तुडवावा लागतो. 

केसापुरी या गावाला बाजारपेठ नसल्याने येथील लोकांना चितेगाव येथे नेहमी यावे लागते. गावात कोणतेही रुग्णालय नाही. जिल्हा परिषदेची शाळा पाचवीपर्यंत असल्याने पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना चितेगाव येथे यावे लागते. तीन किलोमीटर चिखलातून जाणे-येणे करण्यासाठी विद्यार्थी कंटाळून जात असल्याने चार महिन्यांत शाळेला निम्म्या सुट्याच पडतात. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामध्ये रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गर्भवती महिला व आबालवृद्धांची खूप परवड होत आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकState Governmentराज्य सरकारroad safetyरस्ते सुरक्षाAurangabadऔरंगाबाद