शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

स्वातंत्र्यापासून केसापुरी गावाला रस्ताच नाही; ग्रामस्थांना निवडणुकीतच होते बसचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 17:24 IST

विद्यार्थी, शेतकरी,  शिक्षकवृंदांची कसरत

ठळक मुद्दे३ किलोमीटर पायपीटकेवळ निवडणुकीच्या वेळीच मतदान यंत्र घेऊन येणाऱ्या बसचे होते दर्शन

- संतोष वाघ । चितेगाव (औरंगाबाद ) : चितेगावपासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या केसापुरीला देश स्वतंत्र झाल्यापासून डांबरी रस्ताच तयार केलेला नाही. लोकप्रतिनिधी १० वर्षांतून एकदा दगड-माती टाकून कसाबसा रस्ता तयार करतात. पावसाळ्यातील ४ महिने गुडघ्यापर्यंत चिखल तुडवीत या रस्त्यातून वाट काढावी लागते.

पैठण तालुक्यातील केसापुरी गावात रस्ताच नाही. बाभूळगाव ते केसापुरी हा ३ किलोमीटरचा रस्ताही दलदलीचा झाल्याने शेतकरी, दूध विक्रेते व विद्यार्थ्यांना या रस्त्याने जाणे-येणे करणे म्हणजे तारेवरची कसरतच ठरते.  मागील ७१ वर्षांत या गावात डांबरी रस्ता कधी तयारच झाला नाही. या गावाची दळणवळण व्यवस्था  कोलमडलेली आहे. या गावच्या ग्रामस्थांना बाहेरगावी जाण्या-येण्यासाठी खाजगी वाहनही उपलब्ध होऊ शकत नाही. केवळ निवडणुकीच्या वेळीच मतदान यंत्र घेऊन येणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या बसचे दर्शन गावकऱ्यांना होते. मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत केसापुरी या गावाची निवड होऊनही रस्ताच नसल्याने गावाचे परिवर्तन होणार कसे, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. या पंचवार्षिकपासून चितेगाव हा जिल्हा परिषद गट नव्याने उदयास आला. याठिकाणी निवडून येणारा जि.प. सदस्य हा केसापुरी गावाच्या रस्त्याचा प्रश्न मिटवील म्हणून गावकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; परंतु निवडणुका होऊन २ वर्षे उलटली तरीही या रस्त्याकडे सदस्याचे साधे लक्षही गेले नसल्यामुळे ३ किलोमीटर चिखल तुडवावा लागतो. 

केसापुरी या गावाला बाजारपेठ नसल्याने येथील लोकांना चितेगाव येथे नेहमी यावे लागते. गावात कोणतेही रुग्णालय नाही. जिल्हा परिषदेची शाळा पाचवीपर्यंत असल्याने पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना चितेगाव येथे यावे लागते. तीन किलोमीटर चिखलातून जाणे-येणे करण्यासाठी विद्यार्थी कंटाळून जात असल्याने चार महिन्यांत शाळेला निम्म्या सुट्याच पडतात. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामध्ये रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गर्भवती महिला व आबालवृद्धांची खूप परवड होत आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकState Governmentराज्य सरकारroad safetyरस्ते सुरक्षाAurangabadऔरंगाबाद