शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

स्वातंत्र्यापासून केसापुरी गावाला रस्ताच नाही; ग्रामस्थांना निवडणुकीतच होते बसचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 17:24 IST

विद्यार्थी, शेतकरी,  शिक्षकवृंदांची कसरत

ठळक मुद्दे३ किलोमीटर पायपीटकेवळ निवडणुकीच्या वेळीच मतदान यंत्र घेऊन येणाऱ्या बसचे होते दर्शन

- संतोष वाघ । चितेगाव (औरंगाबाद ) : चितेगावपासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या केसापुरीला देश स्वतंत्र झाल्यापासून डांबरी रस्ताच तयार केलेला नाही. लोकप्रतिनिधी १० वर्षांतून एकदा दगड-माती टाकून कसाबसा रस्ता तयार करतात. पावसाळ्यातील ४ महिने गुडघ्यापर्यंत चिखल तुडवीत या रस्त्यातून वाट काढावी लागते.

पैठण तालुक्यातील केसापुरी गावात रस्ताच नाही. बाभूळगाव ते केसापुरी हा ३ किलोमीटरचा रस्ताही दलदलीचा झाल्याने शेतकरी, दूध विक्रेते व विद्यार्थ्यांना या रस्त्याने जाणे-येणे करणे म्हणजे तारेवरची कसरतच ठरते.  मागील ७१ वर्षांत या गावात डांबरी रस्ता कधी तयारच झाला नाही. या गावाची दळणवळण व्यवस्था  कोलमडलेली आहे. या गावच्या ग्रामस्थांना बाहेरगावी जाण्या-येण्यासाठी खाजगी वाहनही उपलब्ध होऊ शकत नाही. केवळ निवडणुकीच्या वेळीच मतदान यंत्र घेऊन येणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या बसचे दर्शन गावकऱ्यांना होते. मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत केसापुरी या गावाची निवड होऊनही रस्ताच नसल्याने गावाचे परिवर्तन होणार कसे, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. या पंचवार्षिकपासून चितेगाव हा जिल्हा परिषद गट नव्याने उदयास आला. याठिकाणी निवडून येणारा जि.प. सदस्य हा केसापुरी गावाच्या रस्त्याचा प्रश्न मिटवील म्हणून गावकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; परंतु निवडणुका होऊन २ वर्षे उलटली तरीही या रस्त्याकडे सदस्याचे साधे लक्षही गेले नसल्यामुळे ३ किलोमीटर चिखल तुडवावा लागतो. 

केसापुरी या गावाला बाजारपेठ नसल्याने येथील लोकांना चितेगाव येथे नेहमी यावे लागते. गावात कोणतेही रुग्णालय नाही. जिल्हा परिषदेची शाळा पाचवीपर्यंत असल्याने पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना चितेगाव येथे यावे लागते. तीन किलोमीटर चिखलातून जाणे-येणे करण्यासाठी विद्यार्थी कंटाळून जात असल्याने चार महिन्यांत शाळेला निम्म्या सुट्याच पडतात. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामध्ये रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गर्भवती महिला व आबालवृद्धांची खूप परवड होत आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकState Governmentराज्य सरकारroad safetyरस्ते सुरक्षाAurangabadऔरंगाबाद