शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
16
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
17
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
18
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
19
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
20
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'

औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन नाही; मात्र बाजारपेठांसाठी निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 14:13 IST

नागरिक कोरोनाच्या अनुषंगाने असलेल्या सुरक्षासाधनांचा वापर करीत नसल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश बाजारपेठा रात्री ९ वाजेपर्यंतच

औरंगाबाद : कोरोना विषाणूच्या संसर्गाने जिल्ह्याला विळखा घातलेला आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आरोग्य यंत्रणेवर त्याचा ताण पडत असून, शहर व जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन होण्यासारखी स्थिती असल्याच्या अफवांचे पेव सोशल मीडियातून फुटले आहे. त्याला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पूर्णविराम दिला आहे. आता जिल्ह्यात लॉकडाऊन होणार नाही. मात्र, रात्री ९ वाजेनंतर सर्व बाजारपेठा बंद करण्यात येतील, याबाबत आदेश देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. 

लॉकडाऊन, कोरोना रुग्णवाढ आणि सोशल मीडियातील अफवा याबाबत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले, १६ सप्टेंबरपासून जिल्हा व शहरातील बाजारपेठा रात्री ९ वाजेनंतर बंद करण्यात येतील. रात्री ९ वाजेनंतर बाजारपेठांमध्ये गर्दी कायम दिसते आहे. नागरिक कोरोनाच्या अनुषंगाने असलेल्या सुरक्षासाधनांचा वापर करीत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रात्री ८.३० वा. बाजारपेठा, व्यापारीपेठांमधील कर्मचाऱ्यांना घरी जाण्यासाठी वेळ असेल.  त्यानंतर ९ वाजेपर्यंत सर्व दुकाने बंद करण्यासाठी कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. रात्री होणारी गर्दी यातून कमी होईल, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. 

लॉकडाऊन हा शेवटचा पर्यायकोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी लॉकडाऊन करणे हा शेवटचा पर्याय आहे; परंतु आता पुनश्च: हरिओम करण्याबाबत शासनाने अनलॉक सुरू केले आहे. लॉकडाऊनच्या अनेक नियमांत शिथिलता आणली आहे. जनता कर्फ्यू राबविणे शक्य आहे, मात्र ते सध्या राबविता येईल, असे वाटत नाही. 

१७०० बेडस् आठवडाभरात वाढणारकोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना किमान आॅक्सिजनचा बेड तरी तातडीने मिळावा, यासाठी आठवडाभरात १७०० बेडस् आॅक्सिजनसह उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. १७०० बेडस् वाढल्यानंतर जिल्ह्यात ३७०० बेडस् होतील. २५ हॉस्पिटल्स कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज असतील. घाटीत ४०० बेडस्, एमजीएममध्ये ३००, जिल्हा रुग्णालयात १०० सह इतर हॉस्पिटल्समध्ये बेडस् वाढविण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद