शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

खगोलशास्त्राबद्दल जेवढी अंधश्रद्धा आहे तेवढी कोणत्याही शास्त्रात नाही  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 16:19 IST

खगोलशास्त्राबद्दल जेवढी अंधश्रद्धा आहे तेवढी कोणत्याही शास्त्रात नाही, असे स्पष्ट विचार खगोलशास्त्राचे अभ्यासक व पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी येथे मांडले. 

ठळक मुद्देखगोलशास्त्राकडे विज्ञानाचे शास्त्र म्हणून पाहिले पाहिजे, यावर त्यांनी आपल्या व्याख्यानात भर दिला.

औरंगाबाद : धूमकेतूमधून पृथ्वी गेल्यास सर्व माणसे मरतात, उल्का दिसली तर मनातील मनोकामना पूर्ण होतात किंवा चंद्राभोवती खळे निर्माण झाले तर अप्रिय घटना घडते, या अंधश्रद्धा आहेत. तसेच ग्रहांचा व अंगठीतील खड्यांचा काहीच संबंध नाही. मात्र, खगोलशास्त्राबद्दल जेवढी अंधश्रद्धा आहे तेवढी कोणत्याही शास्त्रात नाही, असे स्पष्ट विचार खगोलशास्त्राचे अभ्यासक व पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी येथे मांडले. 

एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र व क्लब औैरंगाबादच्या वतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.  सोमण यांच्या उदाहरणांसह देण्यात येणाऱ्या शैलीमुळे व्याख्यान रंगले. विविध उदाहरणे देत दा.कृ. सोमण यांनी खगोलप्रेमींना  खगोलशास्त्राकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. खगोलशास्त्राकडे विज्ञानाचे शास्त्र म्हणून पाहिले पाहिजे, यावर त्यांनी आपल्या व्याख्यानात भर दिला.

त्यांनी सांगितले की, दर ३३ वर्षांनी सिंह राशीतून १७ नोव्हेंबर रोजी मोठा उल्का वर्षाव होत असतो. पृथ्वी त्या दिवशी ‘टेंपल टटल’ धूमकेतूच्या मार्गातून भ्रमण करते. १७ नोव्हेंबर २००० रोजी तासाला ४०० उल्का पृथ्वीवर पडल्या होत्या. आता १७ नोव्हेंबर २०३३ रोजी रात्री असा मोठा उल्का वर्षाव होणार आहे. स्वीफ्ट धूमकेतू १४ आॅगस्ट २१२६ रोजी पृथ्वीवर आदळणार अशी बातमी होती. मात्र, आता शास्त्रज्ञांनी सांगितले की, तो पृथ्वीपासून २ कोटी २० लाख कि.मी. अंतरावरून जाणार आहे. यामुळे घाबरण्याचे कारण नाही. १६ डिसेंबर २०१९ रोजी दक्षिण भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे.

मात्र, औरंगाबादेत हे सूर्यग्रहण खंडग्रास दिसणार असल्याचे सांगून सोमण पुढे म्हणाले की, खगोलशास्त्रासारखा आवडीचा छंद कोणताही नाही. पुस्तक वाचावे लागते तर आकाश सदैव उघडे असते. रात्रीच्या वेळी आकाशातील नक्षत्र बघण्यास काहीच खर्च येत नाही. लहान असो वा ज्येष्ठ सर्वांनी आकाश दर्शन करावे, खगोलशास्त्राचे तेवढे ज्ञान समाजात निर्माण होईल. त्यामुळे अंधश्रद्धा दूर होण्यास मदत होईल, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी एमजीएमचे विश्वस्त प्राचार्य प्रताप बोराडे, खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंैधकर यांची उपस्थिती होती.  भाग्यश्री केढे यांनी सूत्रसंचालन    केले.  

पंचांग हे आकाशाचे वेळापत्रक दा.कृ. सोमण यांनी सांगितले की, रेल्वेचे जसे वेळापत्रक असते तसेच पंचांग हे आकाशाचे वेळापत्रक आहे. त्यापलीकडे काही नाही. त्यांनी सांगितले की, राशीभविष्य बघण्यापेक्षा आपले भविष्य स्वत:च्या मनगटाच्या जोरावर घडविणे आवश्यक  आहे.

टॅग्स :Astrologyफलज्योतिषmgm campusएमजीएम परिसरEducationशिक्षण