शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
4
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
5
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
6
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
7
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
8
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
9
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
10
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
11
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
12
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
13
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
14
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
15
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
17
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
18
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
19
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
20
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Daily Top 2Weekly Top 5

दारिद्र्य रेषेखालील नागरिकांचे १७ वर्षांपासून सर्वेक्षण नाही; गरिबांना मिळतोय का योजनांचा लाभ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 15:29 IST

समाजातील निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग शारीरिक व मानसिक आजार, विधवा आणि अनाथ बालकांचे जीवनमान सुसाह्य करण्यासाठी सरकार विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत करत असते.

औरंगाबाद : दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या कुटुंबांसाठी केंद्र आणि राज्य शासनाने अनेक योजना आणल्या आहेत. त्यांचा लाभ गोर-गरिबांना अजिबात मिळत नाही. अनेक संपन्न कुटुंबांची नावे दारिद्र्य रेषेखालील यादीत समाविष्ट करण्यात आलेली आहेत. त्यामुळे या धनाढ्य मंडळींना योजनांचा लाभ मिळतोय. आश्चर्याची बाब म्हणजे मागील १७ वर्षांपासून दारिद्र्य रेषेखालील नागरिकांचे सर्वेक्षणच झालेले नाही.

समाजातील निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग शारीरिक व मानसिक आजार, विधवा आणि अनाथ बालकांचे जीवनमान सुसाह्य करण्यासाठी सरकार विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत करत असते. यातील काही योजना राज्य सरकारद्वारे, तर काही योजना केंद्र सरकारच्या मदतीने राबविल्या जातात. या योजनांचा लाभ ९० टक्के गोर-गरिबांना मिळतच नाही. प्रत्येक योजनेत लाभार्थी म्हणून शासनाकडे हजारोंच्या संख्येने अर्ज येतात. निधीही फस्त होतो. प्रत्यक्षात गरीब-गरीबच राहतो. सध्या महापालिका २०११च्या जनगणनेनुसार दारिद्र्य रेषेखालील नागरिकांची यादी ग्राह्य धरत आहे. अनेक योजनांचा लाभ शासनाने दिलेल्या यादीनुसारच दिल्या जातो, असे प्रकल्प विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

२००५ मध्ये केले होते सर्वेक्षणदारिद्र्य रेषेखालील नागरिकांचे सर्वेक्षण २००५ मध्ये केले होते. त्यानंतर शासनाने सर्वेक्षणच केले नाही. जुन्या यादीनुसारच सध्या महापालिकेत कामकाज सुरू आहे.

शहरात सव्वा लाख लाभार्थीदारिद्र्य रेषेखाली शहरातील १ लाख २५ हजार नागरिक असल्याची यादी राज्य शासनाने महापालिकेला दिली आहे. या यादीला जनगणनेचा निकष लावण्यात आला आहे, हे विशेष.

दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना कोणते लाभ मिळतात?शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना असतात. या योजनांचा थेट लाभ दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना घेतो येऊ शकतो. अनेक योजनांमध्ये शासनाकडून अनुदान दिले जाते देते. त्यामागे लाभार्थींचे जीवनमान उंचावण्याचा उद्देश असतो.

आता या कुटुंबांची परिस्थिती बदलली नाही का?२००५ मध्ये ज्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खराब होती त्यांची परिस्थिती मागील १७ वर्षांत सुधारली नाही, असे हाेऊच शकत नाही, मात्र सर्वेक्षण झालेले नसल्याने जुनीच यादी वापरणे सुरू आहे.

नवीन कुटुंबांचे काय?दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणारे शहरात आजही अनेक कुटुंब आहेत. त्यांना रेशन कार्ड नाही. शासनाच्या योजना काय असतात हे सुद्धा माहीत नाही. सर्वेक्षणच नसल्याने त्यांचे नाव दारिद्र्य रेषेखालील यादीत येत नाही.

प्रामाणिकपणे सर्वेक्षण व्हावेशासनाने गोर-गरिबांच्या वसाहतींमध्ये जाऊन प्रामाणिकपणे सर्वेक्षण केल्यास खरे लाभार्थी समोर येतील. कार्यालयात बसून किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरून यादी तयार केल्यास खऱ्या लाभार्थींपर्यंत शासनाच्या योजना कधीच पोहोचणार नाहीत.- ॲड. अभय टाकसाळ, सामाजिक कार्यकर्ते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद