शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

दारिद्र्य रेषेखालील नागरिकांचे १७ वर्षांपासून सर्वेक्षण नाही; गरिबांना मिळतोय का योजनांचा लाभ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 15:29 IST

समाजातील निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग शारीरिक व मानसिक आजार, विधवा आणि अनाथ बालकांचे जीवनमान सुसाह्य करण्यासाठी सरकार विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत करत असते.

औरंगाबाद : दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या कुटुंबांसाठी केंद्र आणि राज्य शासनाने अनेक योजना आणल्या आहेत. त्यांचा लाभ गोर-गरिबांना अजिबात मिळत नाही. अनेक संपन्न कुटुंबांची नावे दारिद्र्य रेषेखालील यादीत समाविष्ट करण्यात आलेली आहेत. त्यामुळे या धनाढ्य मंडळींना योजनांचा लाभ मिळतोय. आश्चर्याची बाब म्हणजे मागील १७ वर्षांपासून दारिद्र्य रेषेखालील नागरिकांचे सर्वेक्षणच झालेले नाही.

समाजातील निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग शारीरिक व मानसिक आजार, विधवा आणि अनाथ बालकांचे जीवनमान सुसाह्य करण्यासाठी सरकार विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत करत असते. यातील काही योजना राज्य सरकारद्वारे, तर काही योजना केंद्र सरकारच्या मदतीने राबविल्या जातात. या योजनांचा लाभ ९० टक्के गोर-गरिबांना मिळतच नाही. प्रत्येक योजनेत लाभार्थी म्हणून शासनाकडे हजारोंच्या संख्येने अर्ज येतात. निधीही फस्त होतो. प्रत्यक्षात गरीब-गरीबच राहतो. सध्या महापालिका २०११च्या जनगणनेनुसार दारिद्र्य रेषेखालील नागरिकांची यादी ग्राह्य धरत आहे. अनेक योजनांचा लाभ शासनाने दिलेल्या यादीनुसारच दिल्या जातो, असे प्रकल्प विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

२००५ मध्ये केले होते सर्वेक्षणदारिद्र्य रेषेखालील नागरिकांचे सर्वेक्षण २००५ मध्ये केले होते. त्यानंतर शासनाने सर्वेक्षणच केले नाही. जुन्या यादीनुसारच सध्या महापालिकेत कामकाज सुरू आहे.

शहरात सव्वा लाख लाभार्थीदारिद्र्य रेषेखाली शहरातील १ लाख २५ हजार नागरिक असल्याची यादी राज्य शासनाने महापालिकेला दिली आहे. या यादीला जनगणनेचा निकष लावण्यात आला आहे, हे विशेष.

दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना कोणते लाभ मिळतात?शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना असतात. या योजनांचा थेट लाभ दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना घेतो येऊ शकतो. अनेक योजनांमध्ये शासनाकडून अनुदान दिले जाते देते. त्यामागे लाभार्थींचे जीवनमान उंचावण्याचा उद्देश असतो.

आता या कुटुंबांची परिस्थिती बदलली नाही का?२००५ मध्ये ज्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खराब होती त्यांची परिस्थिती मागील १७ वर्षांत सुधारली नाही, असे हाेऊच शकत नाही, मात्र सर्वेक्षण झालेले नसल्याने जुनीच यादी वापरणे सुरू आहे.

नवीन कुटुंबांचे काय?दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणारे शहरात आजही अनेक कुटुंब आहेत. त्यांना रेशन कार्ड नाही. शासनाच्या योजना काय असतात हे सुद्धा माहीत नाही. सर्वेक्षणच नसल्याने त्यांचे नाव दारिद्र्य रेषेखालील यादीत येत नाही.

प्रामाणिकपणे सर्वेक्षण व्हावेशासनाने गोर-गरिबांच्या वसाहतींमध्ये जाऊन प्रामाणिकपणे सर्वेक्षण केल्यास खरे लाभार्थी समोर येतील. कार्यालयात बसून किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरून यादी तयार केल्यास खऱ्या लाभार्थींपर्यंत शासनाच्या योजना कधीच पोहोचणार नाहीत.- ॲड. अभय टाकसाळ, सामाजिक कार्यकर्ते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद