शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
2
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
3
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
4
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
5
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
6
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
7
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
8
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
9
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
10
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
11
प्रबोधिनी एकादशी २०२५: देवउठनी एकादशीला विष्णू खरोखरच ४ महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात का?
12
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
13
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
14
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
15
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
16
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
17
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
19
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
20
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स

...तर देशात हक्कांची वर्णव्यवस्था येईल : निरंजन टकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 19:44 IST

‘मूकनायक’ नियतकालिकाच्या शताब्दी वर्षानिमित्त व्याख्यान

औरंगाबाद : या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच ‘सबका विकास व सबका साथ’ देण्याचा प्रयत्न केला. मतदानाचा अधिकार व लोकशाही निर्मितीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला हे कुणी नाकारू शकत नाही. आज देशात ‘डर’ पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. नागरिकत्व सिद्ध करण्याच्या नावाखाली हक्काची वर्णव्यवस्था निर्माण करण्यात येत आहे, असे स्पष्ट प्रतिपादन शुक्रवारी येथे प्रख्यात पत्रकार व न्या. लोया यांचा खून उघडकीस आणल्यामुळे देशभर गाजलेले निरंजन टकले यांनी केले. मूकनायक शताब्दीनिमित्त शुक्रवारपासून सुरू झालेल्या व्याख्यानमालेचे टकले हे पहिले पुष्प गुंफत होते. 

महात्मा फुले सामाजिक समता प्रतिष्ठानतर्फे आयोजित पीईएसच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘मतदानाचा अधिकार आणि लोकशाही निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे होते. टकले म्हणाले, शेवटी तिरस्काराचा नाश अटळ आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायाचाच विजय होणार आहे. ‘गवत आहे मी, तुमच्या सगळ्या विध्वंसावर उगवून येईन’ ही कविता सादर करून त्यांनी आपले व्याख्यान टाळ्यांच्या कडकडाटात संपवले. 

कार्यक्रम सुरू होईपर्यंत राजाभाऊ सिरसाट व संचाने बुद्ध व भीमगीते सादर केली. प्रबुद्ध म्हस्के यांनी क्रांतीगीत गायिले. तत्पूर्वी तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पाहुण्यांनी अभिवादन केले. त्यानंतर मूकनायक व बाबासाहेबांची प्रतिमा देऊन टकले, गव्हाणे व पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य अभिजित वाडेकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मूकनायकवर गणेश शिंदे यांनी तयार केलेली डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेखर मगर यांनी प्रास्ताविक केले. लोया खून प्रकरण, त्यातील बारकावे, तपासातील अनेक विसंगती याकडे उपस्थितांचे टकले यांनी लक्ष वेधले. जुने दिवस आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे सीएए व एनआरसीला सर्वांनी विरोध केलाच पाहिजे, असे आवाहन डॉ. सुधीर गव्हाणे यांनी अध्यक्षीय भाषणात केले.

राज्याच्या गृहमंत्र्यांना हे माहीत असायलाच हवे न्या. लोया प्रकरणाचा उल्लेख करताना राज्याचे नवे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा टकले यांनी खरपूस समाचार घेतला. अनिल देशमुख म्हणताहेत की, लोया प्रकरणाचे पुरावे आमच्यापर्यंत आलेच नाहीत. कमाल आहे. मी नाशिकच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे त्याचवेळी सर्व पुराव्यानिशी लेखी तक्रार केली आहे. तरी देशमुख याची माहिती करून न घेता पुरावे मागत असतील तर याला काय म्हणावे? 

टॅग्स :SocialसामाजिकAurangabadऔरंगाबादPES's Engineering Collegeपीईएस अभियांत्रिकी औरंगाबाद