शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
2
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
3
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
7
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
8
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
9
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
10
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
11
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
12
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
13
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
14
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
15
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
16
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
17
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
18
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
19
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
20
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण

...तर देशात हक्कांची वर्णव्यवस्था येईल : निरंजन टकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 19:44 IST

‘मूकनायक’ नियतकालिकाच्या शताब्दी वर्षानिमित्त व्याख्यान

औरंगाबाद : या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच ‘सबका विकास व सबका साथ’ देण्याचा प्रयत्न केला. मतदानाचा अधिकार व लोकशाही निर्मितीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला हे कुणी नाकारू शकत नाही. आज देशात ‘डर’ पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. नागरिकत्व सिद्ध करण्याच्या नावाखाली हक्काची वर्णव्यवस्था निर्माण करण्यात येत आहे, असे स्पष्ट प्रतिपादन शुक्रवारी येथे प्रख्यात पत्रकार व न्या. लोया यांचा खून उघडकीस आणल्यामुळे देशभर गाजलेले निरंजन टकले यांनी केले. मूकनायक शताब्दीनिमित्त शुक्रवारपासून सुरू झालेल्या व्याख्यानमालेचे टकले हे पहिले पुष्प गुंफत होते. 

महात्मा फुले सामाजिक समता प्रतिष्ठानतर्फे आयोजित पीईएसच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘मतदानाचा अधिकार आणि लोकशाही निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे होते. टकले म्हणाले, शेवटी तिरस्काराचा नाश अटळ आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायाचाच विजय होणार आहे. ‘गवत आहे मी, तुमच्या सगळ्या विध्वंसावर उगवून येईन’ ही कविता सादर करून त्यांनी आपले व्याख्यान टाळ्यांच्या कडकडाटात संपवले. 

कार्यक्रम सुरू होईपर्यंत राजाभाऊ सिरसाट व संचाने बुद्ध व भीमगीते सादर केली. प्रबुद्ध म्हस्के यांनी क्रांतीगीत गायिले. तत्पूर्वी तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पाहुण्यांनी अभिवादन केले. त्यानंतर मूकनायक व बाबासाहेबांची प्रतिमा देऊन टकले, गव्हाणे व पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य अभिजित वाडेकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मूकनायकवर गणेश शिंदे यांनी तयार केलेली डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेखर मगर यांनी प्रास्ताविक केले. लोया खून प्रकरण, त्यातील बारकावे, तपासातील अनेक विसंगती याकडे उपस्थितांचे टकले यांनी लक्ष वेधले. जुने दिवस आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे सीएए व एनआरसीला सर्वांनी विरोध केलाच पाहिजे, असे आवाहन डॉ. सुधीर गव्हाणे यांनी अध्यक्षीय भाषणात केले.

राज्याच्या गृहमंत्र्यांना हे माहीत असायलाच हवे न्या. लोया प्रकरणाचा उल्लेख करताना राज्याचे नवे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा टकले यांनी खरपूस समाचार घेतला. अनिल देशमुख म्हणताहेत की, लोया प्रकरणाचे पुरावे आमच्यापर्यंत आलेच नाहीत. कमाल आहे. मी नाशिकच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे त्याचवेळी सर्व पुराव्यानिशी लेखी तक्रार केली आहे. तरी देशमुख याची माहिती करून न घेता पुरावे मागत असतील तर याला काय म्हणावे? 

टॅग्स :SocialसामाजिकAurangabadऔरंगाबादPES's Engineering Collegeपीईएस अभियांत्रिकी औरंगाबाद