शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

...तर देशात हक्कांची वर्णव्यवस्था येईल : निरंजन टकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 19:44 IST

‘मूकनायक’ नियतकालिकाच्या शताब्दी वर्षानिमित्त व्याख्यान

औरंगाबाद : या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच ‘सबका विकास व सबका साथ’ देण्याचा प्रयत्न केला. मतदानाचा अधिकार व लोकशाही निर्मितीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला हे कुणी नाकारू शकत नाही. आज देशात ‘डर’ पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. नागरिकत्व सिद्ध करण्याच्या नावाखाली हक्काची वर्णव्यवस्था निर्माण करण्यात येत आहे, असे स्पष्ट प्रतिपादन शुक्रवारी येथे प्रख्यात पत्रकार व न्या. लोया यांचा खून उघडकीस आणल्यामुळे देशभर गाजलेले निरंजन टकले यांनी केले. मूकनायक शताब्दीनिमित्त शुक्रवारपासून सुरू झालेल्या व्याख्यानमालेचे टकले हे पहिले पुष्प गुंफत होते. 

महात्मा फुले सामाजिक समता प्रतिष्ठानतर्फे आयोजित पीईएसच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘मतदानाचा अधिकार आणि लोकशाही निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे होते. टकले म्हणाले, शेवटी तिरस्काराचा नाश अटळ आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायाचाच विजय होणार आहे. ‘गवत आहे मी, तुमच्या सगळ्या विध्वंसावर उगवून येईन’ ही कविता सादर करून त्यांनी आपले व्याख्यान टाळ्यांच्या कडकडाटात संपवले. 

कार्यक्रम सुरू होईपर्यंत राजाभाऊ सिरसाट व संचाने बुद्ध व भीमगीते सादर केली. प्रबुद्ध म्हस्के यांनी क्रांतीगीत गायिले. तत्पूर्वी तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पाहुण्यांनी अभिवादन केले. त्यानंतर मूकनायक व बाबासाहेबांची प्रतिमा देऊन टकले, गव्हाणे व पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य अभिजित वाडेकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मूकनायकवर गणेश शिंदे यांनी तयार केलेली डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेखर मगर यांनी प्रास्ताविक केले. लोया खून प्रकरण, त्यातील बारकावे, तपासातील अनेक विसंगती याकडे उपस्थितांचे टकले यांनी लक्ष वेधले. जुने दिवस आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे सीएए व एनआरसीला सर्वांनी विरोध केलाच पाहिजे, असे आवाहन डॉ. सुधीर गव्हाणे यांनी अध्यक्षीय भाषणात केले.

राज्याच्या गृहमंत्र्यांना हे माहीत असायलाच हवे न्या. लोया प्रकरणाचा उल्लेख करताना राज्याचे नवे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा टकले यांनी खरपूस समाचार घेतला. अनिल देशमुख म्हणताहेत की, लोया प्रकरणाचे पुरावे आमच्यापर्यंत आलेच नाहीत. कमाल आहे. मी नाशिकच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे त्याचवेळी सर्व पुराव्यानिशी लेखी तक्रार केली आहे. तरी देशमुख याची माहिती करून न घेता पुरावे मागत असतील तर याला काय म्हणावे? 

टॅग्स :SocialसामाजिकAurangabadऔरंगाबादPES's Engineering Collegeपीईएस अभियांत्रिकी औरंगाबाद