शहरं
Join us  
Trending Stories
1
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
2
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

...तर स्वराज्य संघटना राजकारणात येणार नाही; संभाजीराजे छत्रपतींचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 15:35 IST

पैठण येथील अभिनंदन मंगल कार्यालयात शनिवारी छावा क्रांतीवीर संघटनेचे आठवे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले.

पैठण-  मराठा समाजाला आरक्षण देऊन त्यांचे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी पावले उचलली गेली, तर स्वराज्य संघटना राजकारणात जाणार नाही अन्यथा  आम्हाला तसा निर्णय घ्यावा लागेल, अशा स्पष्ट शब्दात छत्रपती संभाजे राजे यांनी पैठण येथील छावा क्रांतीवीर सेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना सरकारला ईशारा दिला.

पैठण येथील अभिनंदन मंगल कार्यालयात शनिवारी छावा क्रांतीवीर संघटनेचे आठवे राष्ट्रीय अधिवेशन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करणभाऊ गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीराजे व प पु १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर, शिवाजी बँकेचे चेअरमन रवींद्र काळे, माजी आमदार संजय वाघचौरे, अभिजित राणे, रामेश्वर बावणे, अनिल राऊत, भगवान सोरमारे, गंगाधर औताडे, सागर बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी करण गायकर यांनी मराठा आरक्षण व समाजाचे मुलभूत प्रश्न अधिवेशनात मांडले हाच धागा पकडत छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणासाठी मराठा समाज सामाजिक मागासलेला आहे हे सिध्द करावे लागेल व यासाठी मराठा समाज मागास आयोगाचे गठण सरकारने करावे असे आवाहन केले. मराठा आरक्षणाची कार्यवाही परत करावी लागणार आहे असेही ते यावेळी म्हणाले.

मला तुमची साथ हवी

स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढील काळात स्वराज्य संघटना वाटचाल करणार आहे. त्यासाठी तुमची साथ मला हवी आहे. असे आवाहन छत्रपती संभाजी महाराज यांनी केले.  दरम्यान राष्ट्रीय अधिवेशनात विविध ठराव मांडण्यात येऊन त्या संदर्भात पुढील दिशा धोरणे ठरविण्यात आली. अधिवेशनासाठी मोठ्या संख्येने छावा क्रांतीवीर संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. राज्य सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे व तात्काळ मागास आयोगाची स्थापना करावी असे आवाहन या अधिवेशनात राज्य सरकारला छत्रपती संभाजीराजे यांनी केले असून यासाठी तातडीने बैठक घेण्यात यावी अशी मागणी केली.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीpaithan-acपैठण