शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

...तर स्वराज्य संघटना राजकारणात येणार नाही; संभाजीराजे छत्रपतींचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 15:35 IST

पैठण येथील अभिनंदन मंगल कार्यालयात शनिवारी छावा क्रांतीवीर संघटनेचे आठवे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले.

पैठण-  मराठा समाजाला आरक्षण देऊन त्यांचे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी पावले उचलली गेली, तर स्वराज्य संघटना राजकारणात जाणार नाही अन्यथा  आम्हाला तसा निर्णय घ्यावा लागेल, अशा स्पष्ट शब्दात छत्रपती संभाजे राजे यांनी पैठण येथील छावा क्रांतीवीर सेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना सरकारला ईशारा दिला.

पैठण येथील अभिनंदन मंगल कार्यालयात शनिवारी छावा क्रांतीवीर संघटनेचे आठवे राष्ट्रीय अधिवेशन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करणभाऊ गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीराजे व प पु १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर, शिवाजी बँकेचे चेअरमन रवींद्र काळे, माजी आमदार संजय वाघचौरे, अभिजित राणे, रामेश्वर बावणे, अनिल राऊत, भगवान सोरमारे, गंगाधर औताडे, सागर बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी करण गायकर यांनी मराठा आरक्षण व समाजाचे मुलभूत प्रश्न अधिवेशनात मांडले हाच धागा पकडत छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणासाठी मराठा समाज सामाजिक मागासलेला आहे हे सिध्द करावे लागेल व यासाठी मराठा समाज मागास आयोगाचे गठण सरकारने करावे असे आवाहन केले. मराठा आरक्षणाची कार्यवाही परत करावी लागणार आहे असेही ते यावेळी म्हणाले.

मला तुमची साथ हवी

स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढील काळात स्वराज्य संघटना वाटचाल करणार आहे. त्यासाठी तुमची साथ मला हवी आहे. असे आवाहन छत्रपती संभाजी महाराज यांनी केले.  दरम्यान राष्ट्रीय अधिवेशनात विविध ठराव मांडण्यात येऊन त्या संदर्भात पुढील दिशा धोरणे ठरविण्यात आली. अधिवेशनासाठी मोठ्या संख्येने छावा क्रांतीवीर संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. राज्य सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे व तात्काळ मागास आयोगाची स्थापना करावी असे आवाहन या अधिवेशनात राज्य सरकारला छत्रपती संभाजीराजे यांनी केले असून यासाठी तातडीने बैठक घेण्यात यावी अशी मागणी केली.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीpaithan-acपैठण