शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

... तर बँकेच्या दारात बसू

By admin | Updated: May 16, 2016 23:56 IST

हिंगोली : शेतकरी हा निसर्गाच्या अवकृपेमुळे तब्बल चार वर्षांपासून डबघाईला आला आहे. त्याच्यावर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे.

हिंगोली : शेतकरी हा निसर्गाच्या अवकृपेमुळे तब्बल चार वर्षांपासून डबघाईला आला आहे. त्याच्यावर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. त्यामुळे बँकांनी मागेल त्याला पीककर्ज दिलेच पाहिजे नसता आम्ही बँकेच्या दारात बसू असा इशारा फळबागा वाचवा अभियान व खरीप हंगाम नियोजन शेतकरी मेळाव्यात खा. राजीव सातव यांनी दिला. आ. तान्हाजी मुटकुळे, आ. डॉ. संतोष टारफे, जिल्हाधिकारी तुकाराम कासार, सीईओ मधुकर आर्दड, अ. मुकाअ ए. एम. देशमुख, तहसीलदार किरण अंबेकर, डॉ. पी. पी. शेळके, कृषी शास्त्रज्ञ आळसे, जयाजी पाईकराव आदींची उपस्थिती होती. सातव म्हणाले, कोणाच्याही चुका न काढता, सद्य:परिस्थितीत शेकऱ्याला वाचविण्यासाठी कोणते प्रयत्न शक्य आहेत ते करा. कोणती बँक कर्ज देत नसेल तर शेतकऱ्यांनी आ. मुटकुळे, आ. टारफे व माझ्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सातव यांनी केले. पाणीटंचाई निवारणात गतिमानता नाही. पावसाळा आला तरीही प्रस्ताव मंजुरीतच आहेत. पशुसंवर्धनच्या कामकाजाबद्दलही खा. सातव यांनी नाराजी व्यक्त केली. सध्या गुरांना साथरोग सुरु असून पावसापूर्वी व नंतरचे साथरोग आटोक्यात आणण्यासाठी या विभागाचे अधिकारी सज्ज असणे गरजेचे असतानाही ते राहत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कासार म्हणाले, फळबाग वाचवा अभियान राबवायला उशिर झाला. त्याऐवजी शेतकरी वाचवा अभियान असा उलेख करुन उर्वरितांसाठी तरी प्रशासनासह सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. पीककर्जासाठी तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना तालुका स्तरावर बँक अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. दर सोमवारी सायंकाळी ४ ते ५ या वेळात बैठका होतील. आ. मुटकुळे म्हणाले, सध्याचे सिंचनक्षेत्र दहा टक्के असून ते चाळीस टक्क्यांवर नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी आम्ही राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवू. मात्र प्रशासनानेही तेवढ्याच नेटाने कामे केली पाहिजेत. आ. टारफे म्हणाले, दुष्काळामुळे कृषी विभागाने अनुदानावर बी-बियाणे दिले पाहिजे. शिवाय पालकमंत्र्यांनी आदेश देवूनही टँकर सुरू होत नाही. मागेल त्याला शेततळे नुसते मंजूर झाले. कामांचा पत्ता नाही. जलयुक्तची कामेही गतिमान होणे गरजेचे आहे. प्रास्ताविक लोंढे यांनी तर आर. बी. हरणे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)