शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

...तर नगरसेवकांची संख्या जाईल १५० पर्यंत; इच्छुक उमेदवार पुन्हा हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 12:24 IST

२०१५ मध्ये ११५ वॉर्डांसाठी निवडणूक घेण्यात आली होती.

ठळक मुद्देराज्य शासनाकडून नगरसेवक वाढीच्या हालचाली लोकसंख्येनुसार संख्या जाईल १५० पर्यंत

- मुजीब देवणीकरऔरंगाबाद : राज्य सरकारने महापालिकांमधील ( Aurangabad Municipal Corporation ) नगरसेवकांची संख्या वाढविण्याच्या हालचालींना वेग दिल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली असून, लवकरच या संदर्भात मंत्रिमंडळासमोर प्रस्तावही येणार असल्याचे जाणती मंडळी सांगते. मंत्रिमंडळाने नगरसेवक वाढविण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आणि औरंगाबाद महापालिकेलाही तो लागू केला, तर शहरातील नगरसेवकांची संख्या लोकसंख्येनुसार १५० पर्यंत वाढू शकेल (number of corporators will go up to 150) . त्यामुळे प्रभाग रचनेचा प्रारूप आराखड्याचे काम पुन्हा रेंगाळण्याची चिन्हे असल्यामुळे इच्छुक उमेदवार हवालदिल झाले आहेत.

लोकसंख्येच्या निकषावर नगरसेवकांची संख्या ठरविली जाते. औरंगाबाद महापालिकेला ‘क’ दर्जा देण्यात आलेला आहे. २०१५ मध्ये ११५ वॉर्डांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. एप्रिल २०१९ मध्ये महापालिकेचा कार्यकाल संपला. आता राज्य निवडणूक आयोगाने प्रभागांचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाने कामही सुरू केले आहे. नगरसेवकांची संख्या वाढविण्यात येणार असल्याची चर्चा पालिका वर्तुळात गेल्या दोन दिवसांपासून सुरू झाली. सोशल मीडियावर यासंदर्भात वेगवेगळे मतप्रवाहसुद्धा सुरू झाले.

लोकसंख्येचा निकष महत्वाचा‘लोकमत’ने यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता सूत्रांनी सांगितले की, नगरसेवकांची संख्या वाढवायची असेल तर महापालिका अधिनियम कलम ५ मध्ये राज्य शासनाला बदल करावा लागेल. अचानक नगरसेवकांची संख्या वाढविता येत नाही. महापालिकेचा प्रवर्ग आणि लोकसंख्येच्या निकषानुसार नगरसेवकांची संख्या ठरते. शहराच्या १० लाख लोकसंख्येसाठी १०० आणि त्यावर २५ हजार लोकसंख्येसाठी एक नगरसेवक ठरविण्यात आला आहे. ‘क’वर्ग महापालिकेसाठी संख्येची कमाल मर्यादा १२५ आहे. कायद्यात बदल करताना किती हजारांवर एक नगरसेवक ठेवणार, याचा निकष शासनाला ठरवावा लागेल. त्यानंतर या निर्णयाचे कायद्यात रूपांतर होऊ शकेल. अर्थात, या प्रक्रियेला वेळही लागू शकतो. सध्या ११५ नगरसेवकांच्या निकषावर निवडणूकीचे काम सुरू आहे.

निकष बदलावे लागतीलमहापालिका अधिनियम कलम ५ मधील २-अ मध्ये लोकसंख्येचे निकष दिले आहेत. नगरसेवकांची संख्या वाढविण्यासाठी कायद्यात बदल आवश्यक असतो. कमीत कमी लोकसंख्येला किती आणि जास्तीत जास्त लोकसंख्येला किती नगरसेवक असावेत हे अधियमात नमूद केलेले आहे.- एम.ए. पठाण, निवृत्त नगरसचिव, मनपा.

काय म्हणतो कायदा३ ते ६ लाख लोकसंख्या - किमान ६५, जास्तीत जास्त ८५ नगरसेवक६ ते १२ लाख लोकसंख्या - किमान ८५, जास्तीत जास्त ११५१२ ते २४ लाख लोकसंख्या- ११५ ते १५१२४ ते ३० लाख लोकसंख्या- १५१ ते १६१३० लाखांपेक्षा अधिक- १६१ ते १७५

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक