शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

...तर नगरसेवकांची संख्या जाईल १५० पर्यंत; इच्छुक उमेदवार पुन्हा हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 12:24 IST

२०१५ मध्ये ११५ वॉर्डांसाठी निवडणूक घेण्यात आली होती.

ठळक मुद्देराज्य शासनाकडून नगरसेवक वाढीच्या हालचाली लोकसंख्येनुसार संख्या जाईल १५० पर्यंत

- मुजीब देवणीकरऔरंगाबाद : राज्य सरकारने महापालिकांमधील ( Aurangabad Municipal Corporation ) नगरसेवकांची संख्या वाढविण्याच्या हालचालींना वेग दिल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली असून, लवकरच या संदर्भात मंत्रिमंडळासमोर प्रस्तावही येणार असल्याचे जाणती मंडळी सांगते. मंत्रिमंडळाने नगरसेवक वाढविण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आणि औरंगाबाद महापालिकेलाही तो लागू केला, तर शहरातील नगरसेवकांची संख्या लोकसंख्येनुसार १५० पर्यंत वाढू शकेल (number of corporators will go up to 150) . त्यामुळे प्रभाग रचनेचा प्रारूप आराखड्याचे काम पुन्हा रेंगाळण्याची चिन्हे असल्यामुळे इच्छुक उमेदवार हवालदिल झाले आहेत.

लोकसंख्येच्या निकषावर नगरसेवकांची संख्या ठरविली जाते. औरंगाबाद महापालिकेला ‘क’ दर्जा देण्यात आलेला आहे. २०१५ मध्ये ११५ वॉर्डांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. एप्रिल २०१९ मध्ये महापालिकेचा कार्यकाल संपला. आता राज्य निवडणूक आयोगाने प्रभागांचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाने कामही सुरू केले आहे. नगरसेवकांची संख्या वाढविण्यात येणार असल्याची चर्चा पालिका वर्तुळात गेल्या दोन दिवसांपासून सुरू झाली. सोशल मीडियावर यासंदर्भात वेगवेगळे मतप्रवाहसुद्धा सुरू झाले.

लोकसंख्येचा निकष महत्वाचा‘लोकमत’ने यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता सूत्रांनी सांगितले की, नगरसेवकांची संख्या वाढवायची असेल तर महापालिका अधिनियम कलम ५ मध्ये राज्य शासनाला बदल करावा लागेल. अचानक नगरसेवकांची संख्या वाढविता येत नाही. महापालिकेचा प्रवर्ग आणि लोकसंख्येच्या निकषानुसार नगरसेवकांची संख्या ठरते. शहराच्या १० लाख लोकसंख्येसाठी १०० आणि त्यावर २५ हजार लोकसंख्येसाठी एक नगरसेवक ठरविण्यात आला आहे. ‘क’वर्ग महापालिकेसाठी संख्येची कमाल मर्यादा १२५ आहे. कायद्यात बदल करताना किती हजारांवर एक नगरसेवक ठेवणार, याचा निकष शासनाला ठरवावा लागेल. त्यानंतर या निर्णयाचे कायद्यात रूपांतर होऊ शकेल. अर्थात, या प्रक्रियेला वेळही लागू शकतो. सध्या ११५ नगरसेवकांच्या निकषावर निवडणूकीचे काम सुरू आहे.

निकष बदलावे लागतीलमहापालिका अधिनियम कलम ५ मधील २-अ मध्ये लोकसंख्येचे निकष दिले आहेत. नगरसेवकांची संख्या वाढविण्यासाठी कायद्यात बदल आवश्यक असतो. कमीत कमी लोकसंख्येला किती आणि जास्तीत जास्त लोकसंख्येला किती नगरसेवक असावेत हे अधियमात नमूद केलेले आहे.- एम.ए. पठाण, निवृत्त नगरसचिव, मनपा.

काय म्हणतो कायदा३ ते ६ लाख लोकसंख्या - किमान ६५, जास्तीत जास्त ८५ नगरसेवक६ ते १२ लाख लोकसंख्या - किमान ८५, जास्तीत जास्त ११५१२ ते २४ लाख लोकसंख्या- ११५ ते १५१२४ ते ३० लाख लोकसंख्या- १५१ ते १६१३० लाखांपेक्षा अधिक- १६१ ते १७५

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक