शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

रेल्वेतून प्रवास करीत सांधले जातेय चोरीचे नेटवर्क;जिल्ह्यातील ग्रामीण भाग दरोडेखोरांच्या दहशतीखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 15:59 IST

वैजापूर, गंगापूर, खुलताबाद या तिन्ही तालुक्यांच्या ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून दरोडेखोरांच्या दहशतीमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

ठळक मुद्दे वैजापूर तालुक्यातील चांडगाव येथे दोन संशयित दरोडेखोरांना जमावाने यमसदनी पाठविण्याची घटना घडली.

- एकनाथ मतकर  

औरंगाबाद : वैजापूर, गंगापूर, खुलताबाद या तिन्ही तालुक्यांच्या ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून दरोडेखोरांच्या दहशतीमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. वैजापूर तालुक्यातील चांडगाव येथे दोन संशयित दरोडेखोरांना जमावाने यमसदनी पाठविण्याची घटना घडली. तालुक्यातील रोटेगाव या मार्गावर रेल्वेस्टेशन आहे. काही अंतरावर दौलताबाद, पोटूळ, लासूर, करंजगाव, परसोडा ही रेल्वेस्थानके आहेत. या पाच रेल्वेस्थानकांपैकी लासूर रेल्वेस्टेशन सोडले, तर बाकी चारही रेल्वेस्टेशन्स रात्रीच्या वेळी निर्मनुष्य असतात.

याचाच फायदा घेत दरोडेखोर औरंगाबादेतील रेल्वेस्थानकावरून या मार्गावर कोठेही रेल्वेची चेन ओढून उतरून परिसरात लुटमार करून पुन्हा रेल्वेने प्रवास करून पोबारा करतात. ग्रामस्थांनी तक्रारी करूनही पोलिसांना या दरोडेखोरांचा काहीही सुगावा लागत नाही. वैजापूर तालुक्यातील खंडाळा, शिऊर, परसोडा कारखाना भागात या चोरट्यांनी यापूर्वी दहशत माजवून चोऱ्या केल्या आहेत, तर वेरूळ परिसरात सध्या रात्रीची गस्त घालून नागरिक स्वसंरक्षण करीत आहेत.

गंगापूर-वैजापूर, खुलताबाद तालुक्यांतील रस्त्यांची अत्यंत वाईट परिस्थिती झालेली असून गंगापूर तालुक्यातील वरखेड पाटी ते महालगावपर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे असल्याने वाहनचालकांना तेवढ्या जागेत वाहनांचा वेग कमी करावा. या रस्त्यावर पोलिसांची कधीही पेट्रोलिंग होताना दिसत नाही. गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव व वैजापूर तालुक्यातील वीरगाव येथे पोलीस स्टेशन आहे; मात्र पोलीस स्टेशन्स मेनरोडपासून १० कि़मी.अंतरावर आहेत. महालगाव ते चोरवाघलगाव एवढ्या अंतरावरही चोरट्यांनी बऱ्याचवेळा वाहनधारकांना लुटल्याच्या घटना घडल्या आहेत.

पाणी मागण्याच्या बहाण्याने हेरगिरीचोर-दरोडेखोर दिवसा ग्रामीण भागात पाणी मागण्याच्या निमित्ताने हेरगिरी करातात व रात्री लुटमार करतात. सणासुदीच्या काळात ग्रामीण भाग दहशतीखाली आला आहे. हे दरोडेखोर अंगावर आॅईल किंवा तेल लावून येत असल्यामुळे त्यांना कोणी पकडण्याचा प्रयत्न के ला तर ते हातातून निसटून पळतात, असे ग्रामस्थांनी सांगितले.

टॅग्स :Robberyचोरीrailwayरेल्वेPoliceपोलिस