शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

प्रतीक्षा संपली, ताशी १०० च्या गतीने औरंगाबाद मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह धावली रेल्वे

By संतोष हिरेमठ | Updated: December 30, 2022 19:36 IST

चाचणीसाठी १० बोगींची रेल्वे रोटेगाव - औरंगाबाद मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह धावली

औरंगाबाद :  रोटेगाव - औरंगाबादरेल्वे मार्गावर अखेर इलेक्ट्रिक इंजिन धावणार आहे. विद्युतीकरण झालेल्या या रेल्वे मार्गाची रेल्वे अधिकाऱ्यांच्या देखरेखीत चाचणी घेण्यात येत आहे. आगामी दोन महिन्यांत जालन्यापर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण लक्ष्य ठेवण्यात आले आहे. दरम्यान, रोटेगाव येथून इलेक्ट्रिक इंजिन १० बोगीसह औरंगाबादकडे सायंकाळी ७ वाजता रवाना झाले आहे. ही रेल्वे रात्री ८ वाजेपर्यंत औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर येणार आहे. 

विद्युतीकरणाचे काम पूर्ण झालेल्या मनमाड (अंकाई) ते रोटेगाव या मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनासह रेल्वे चालविण्याची चाचणी २६ मार्च रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या देखरेखीत यशस्वीपणे झाली. आता रोटेगाव ते औरंगाबाद पर्यंतच्या विद्युतीकरणाची चाचणी आज घेण्यात येत आहे. रोटेगाव येथून सायंकाळी इलेक्ट्रिक इंजिन औरंगाबादकडे रवाना झाले. इंजिनला १० बोगी आहेत. यावेळी रेल्वेतील अनेक अधिकारी चाचणी संबंधित पाहणी करून माहिती घेत आहेत. 

यापूर्वी रोटेगाव ते औरंगाबाद दरम्यान लोहमार्गाचे विद्युतीकरण झाल्यानंतर ओव्हरहेड वायरमध्ये १५ डिसेंबर रोजी विद्युत प्रवाह सोडण्याचे नियोजन केले होते. विद्युतीकरण पूर्ण होत असल्याने लोहमार्गाच्या परिसरातील नागरिकांना, रेल्वे गेटमधून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये विजेची ओव्हरहेड वायर अडकल्याची घटना १२ डिसेंबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे जवळपास एक ते दोन किलोमीटर अंतरावरील विद्युतीकरणाच्या कामाचे नुकसान झाले. हे काम युद्धपातळीवर पूर्ण करून औरंगाबादपर्यंत इलेक्ट्रिक इंजिनसह चाचणीचे नियोजन करण्यात आले.

दोन महिन्यांत जालन्यांपर्यंत काम पूर्णमनमाड (अंकाई) ते परभणी लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम सुरू असून, ते जुलै २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मनमाड (अंकाई) ते औरंगाबाद दरम्यान विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या अडीच ते तीन महिन्यांत जालन्यापर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यापूर्वी रोटेगावपर्यंत धावली इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वेविद्युतीकरणाचे काम पूर्ण झालेल्या मनमाड (अंकाई) ते रोटेगाव या मार्गावर इलेक्ट्रिक इंजिन सह रेल्वे चालविण्याची चाचणी २६ मार्च रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या देखरेखीत यशस्वीपणे झाली आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे