शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

प्रतीक्षा संपली, ताशी १०० च्या गतीने औरंगाबाद मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह धावली रेल्वे

By संतोष हिरेमठ | Updated: December 30, 2022 19:36 IST

चाचणीसाठी १० बोगींची रेल्वे रोटेगाव - औरंगाबाद मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह धावली

औरंगाबाद :  रोटेगाव - औरंगाबादरेल्वे मार्गावर अखेर इलेक्ट्रिक इंजिन धावणार आहे. विद्युतीकरण झालेल्या या रेल्वे मार्गाची रेल्वे अधिकाऱ्यांच्या देखरेखीत चाचणी घेण्यात येत आहे. आगामी दोन महिन्यांत जालन्यापर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण लक्ष्य ठेवण्यात आले आहे. दरम्यान, रोटेगाव येथून इलेक्ट्रिक इंजिन १० बोगीसह औरंगाबादकडे सायंकाळी ७ वाजता रवाना झाले आहे. ही रेल्वे रात्री ८ वाजेपर्यंत औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर येणार आहे. 

विद्युतीकरणाचे काम पूर्ण झालेल्या मनमाड (अंकाई) ते रोटेगाव या मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनासह रेल्वे चालविण्याची चाचणी २६ मार्च रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या देखरेखीत यशस्वीपणे झाली. आता रोटेगाव ते औरंगाबाद पर्यंतच्या विद्युतीकरणाची चाचणी आज घेण्यात येत आहे. रोटेगाव येथून सायंकाळी इलेक्ट्रिक इंजिन औरंगाबादकडे रवाना झाले. इंजिनला १० बोगी आहेत. यावेळी रेल्वेतील अनेक अधिकारी चाचणी संबंधित पाहणी करून माहिती घेत आहेत. 

यापूर्वी रोटेगाव ते औरंगाबाद दरम्यान लोहमार्गाचे विद्युतीकरण झाल्यानंतर ओव्हरहेड वायरमध्ये १५ डिसेंबर रोजी विद्युत प्रवाह सोडण्याचे नियोजन केले होते. विद्युतीकरण पूर्ण होत असल्याने लोहमार्गाच्या परिसरातील नागरिकांना, रेल्वे गेटमधून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये विजेची ओव्हरहेड वायर अडकल्याची घटना १२ डिसेंबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे जवळपास एक ते दोन किलोमीटर अंतरावरील विद्युतीकरणाच्या कामाचे नुकसान झाले. हे काम युद्धपातळीवर पूर्ण करून औरंगाबादपर्यंत इलेक्ट्रिक इंजिनसह चाचणीचे नियोजन करण्यात आले.

दोन महिन्यांत जालन्यांपर्यंत काम पूर्णमनमाड (अंकाई) ते परभणी लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम सुरू असून, ते जुलै २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मनमाड (अंकाई) ते औरंगाबाद दरम्यान विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या अडीच ते तीन महिन्यांत जालन्यापर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यापूर्वी रोटेगावपर्यंत धावली इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वेविद्युतीकरणाचे काम पूर्ण झालेल्या मनमाड (अंकाई) ते रोटेगाव या मार्गावर इलेक्ट्रिक इंजिन सह रेल्वे चालविण्याची चाचणी २६ मार्च रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या देखरेखीत यशस्वीपणे झाली आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे