शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

प्रतीक्षा संपली, ताशी १०० च्या गतीने औरंगाबाद मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह धावली रेल्वे

By संतोष हिरेमठ | Updated: December 30, 2022 19:36 IST

चाचणीसाठी १० बोगींची रेल्वे रोटेगाव - औरंगाबाद मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह धावली

औरंगाबाद :  रोटेगाव - औरंगाबादरेल्वे मार्गावर अखेर इलेक्ट्रिक इंजिन धावणार आहे. विद्युतीकरण झालेल्या या रेल्वे मार्गाची रेल्वे अधिकाऱ्यांच्या देखरेखीत चाचणी घेण्यात येत आहे. आगामी दोन महिन्यांत जालन्यापर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण लक्ष्य ठेवण्यात आले आहे. दरम्यान, रोटेगाव येथून इलेक्ट्रिक इंजिन १० बोगीसह औरंगाबादकडे सायंकाळी ७ वाजता रवाना झाले आहे. ही रेल्वे रात्री ८ वाजेपर्यंत औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर येणार आहे. 

विद्युतीकरणाचे काम पूर्ण झालेल्या मनमाड (अंकाई) ते रोटेगाव या मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनासह रेल्वे चालविण्याची चाचणी २६ मार्च रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या देखरेखीत यशस्वीपणे झाली. आता रोटेगाव ते औरंगाबाद पर्यंतच्या विद्युतीकरणाची चाचणी आज घेण्यात येत आहे. रोटेगाव येथून सायंकाळी इलेक्ट्रिक इंजिन औरंगाबादकडे रवाना झाले. इंजिनला १० बोगी आहेत. यावेळी रेल्वेतील अनेक अधिकारी चाचणी संबंधित पाहणी करून माहिती घेत आहेत. 

यापूर्वी रोटेगाव ते औरंगाबाद दरम्यान लोहमार्गाचे विद्युतीकरण झाल्यानंतर ओव्हरहेड वायरमध्ये १५ डिसेंबर रोजी विद्युत प्रवाह सोडण्याचे नियोजन केले होते. विद्युतीकरण पूर्ण होत असल्याने लोहमार्गाच्या परिसरातील नागरिकांना, रेल्वे गेटमधून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये विजेची ओव्हरहेड वायर अडकल्याची घटना १२ डिसेंबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे जवळपास एक ते दोन किलोमीटर अंतरावरील विद्युतीकरणाच्या कामाचे नुकसान झाले. हे काम युद्धपातळीवर पूर्ण करून औरंगाबादपर्यंत इलेक्ट्रिक इंजिनसह चाचणीचे नियोजन करण्यात आले.

दोन महिन्यांत जालन्यांपर्यंत काम पूर्णमनमाड (अंकाई) ते परभणी लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम सुरू असून, ते जुलै २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मनमाड (अंकाई) ते औरंगाबाद दरम्यान विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या अडीच ते तीन महिन्यांत जालन्यापर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यापूर्वी रोटेगावपर्यंत धावली इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वेविद्युतीकरणाचे काम पूर्ण झालेल्या मनमाड (अंकाई) ते रोटेगाव या मार्गावर इलेक्ट्रिक इंजिन सह रेल्वे चालविण्याची चाचणी २६ मार्च रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या देखरेखीत यशस्वीपणे झाली आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे