शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून जाणाऱ्या मित्रांना रेल्वेने उडविले

By राम शिनगारे | Updated: September 29, 2022 22:57 IST

अठरा व वीस वर्षांच्या युवकांचा मृत्यू झाल्यामुळे मुकुंदनगर परिसरावर शोककळा पसरली आहे.

औरंगाबाद : रेल्वे रुळाच्या शेजारून एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून गाणे ऐकत चालत जाणाऱ्या दोन युवकांना बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास नंदीग्राम एक्स्प्रेसने उडविल्याची घटना उघडकीस आली आहे. अठरा व वीस वर्षांच्या युवकांचा मृत्यू झाल्यामुळे मुकुंदनगर परिसरावर शोककळा पसरली आहे. दोन्ही युवक पॉलिटेक्निकचे शिक्षण घेत असल्याची माहिती मुकुंदवाडी पोलिसांनी दिली.

तेजस राहुल जाधव (१८) आणि ऋषिकेश सुधाकर जाधव (२०, दोघे रा. मुकुंदनगर) अशी मृत युवकांची नावे आहेत. मुकुंदवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेजस व ऋषिकेश हे दोघे मित्र होते. दोघे पॉलिटेक्निकच्या प्रथम आणि तृतीय वर्षांला शिक्षण घेत. दहा वाजेच्या सुमारास दोघे जण नवरात्र उत्सव पाहून घरी परतत होते. गेट नंबर ५६ च्या पुढे जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे ते रेल्वे रुळाच्या जवळून एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून गाणे ऐकत जात असतानाच नंदीग्राम एक्स्प्रेस औरंगाबादहून नांदेडच्या दिशेने जात होती. दोघांनाही रेल्वेचा आवाज आला नाही. रेल्वे दोघांना उडवून निघून गेली. 

या घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. मुकुंदवाडी पोलिसांना कळविण्यात आले. तेव्हा निरीक्षक ब्रह्मा गिरी, सहायक निरीक्षक सचिन मिरधे यांच्यासह इतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्याठिकाणी दोघांच्या मृतदेहाचे तुकडे सर्वत्र पसरले होते. ओळख पटविण्यासाठी पोलिसांना परिसरातील नागरिकांनी मदत केली. त्यानंतर घाटी रुग्णालयात मृतदेह पोलिसांच्या वाहनातून नेण्यात आले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

तेजस आई-वडिलांना एकुलतामृत तेजस हा आई-वडिलांना एकुलता मुलगा होता. त्याचे वडील खासगी वाहनावर चालक आहेत. ऋषिकेशचे वडील एका खासगी कंपनीत चालक म्हणून काम करतात. दोन युवकांचा मृत्यू झाल्यामुळे मुकुंदनगर परिसरात शोकाकुल वातावरण होते.

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबाद