शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

उन्हाळ्याच्या झळा वाढल्या; श्वानाला लागलं सलाईन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 18:40 IST

शेंद्रा बन परिसरातील अनेक श्वानांना अतिसाराच्या समस्येला सामोरे जावे लागत असून काही मोकाट श्वानांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे.

- कृष्णा नेमानेशेंद्रा ( औरंगाबाद) : सध्या पाळीव तसेच जंगली प्राण्यांनाही उच्च तापमानाचा फटका बसत आहे. तीव्र उन्हाचे चटके बसू लागताच प्रत्येक जण पाणी अथवा गारवा शोधतो. माणसाला ही गरज पूर्ण करणे सहज साध्य होते; मात्र प्राणी व पक्ष्यांना नैसर्गिक स्रोतांमधूनच आपली गरज भागवावी लागत असल्याने उन्हाळा नकळत अनेक पशु-पक्ष्यांच्या जिवावर बेततो आहे. पाळीव कुत्रेही याला अपवाद राहिले नसून उष्माघाताचे कुत्रेही शिकार होत आहेत.

शेंद्रा बन परिसरातील अनेक श्वानांना अतिसाराच्या समस्येला सामोरे जावे लागत असून काही मोकाट श्वानांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. पाळीव श्वान एकाएकी मान खाली टाकत असल्याने श्वानमालक चिंतित आहेत.

आजाराची कारणे...- अचानक वातावरणीय बदल- अति तापमानात श्वानांचा वापर- नियमित लस न देणे- दूषित पाणी पिणे- श्वानांच्या अंगावर पाणी टाकणे

उपाय ....- श्वानाला थंड जागी ठेवणे- इतर श्वानांचा संपर्क न होऊ देणे- श्वानांच्या लसी नियमित देणे- स्वच्छ पाणी पाजणे- श्वानांची जागा स्वच्छ आणि स्वतंत्र ठेवणे

घ्यावी काळजी....श्वानांना लवकर सकाळी आणि संध्याकाळी जेवण तसेच स्वच्छ सावली, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि उन्हात श्वान येणार नाही, ही काळजी श्वान पालकांनी घ्यावी.- शीला जाधव, पशुधन अधिकारी, करमाड

आरोग्य बिघडत आहे...पाळीव श्वानांना अति तापमानाला सामोरे जावे लागत असल्याने श्वानांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असून, श्वानपालकांनी श्वानाला स्वच्छ जागा, स्वच्छ पाणी, उन्हापासून बचाव होईल, अशी व्यवस्था करावी.- अनिल ढवळे, श्वानप्रेमी

टॅग्स :dogकुत्राAurangabadऔरंगाबाद