शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

फक्त विकासाचा नारा! राज्य सरकारला १२ वर्षांपासून मानव विकास निर्देशांक काढण्याचा विसर

By स. सो. खंडाळकर | Updated: August 10, 2024 11:51 IST

२०१२ पासून निर्देशांकाचा पत्ताच नसल्याने त्याचा विकास कामांवर व प्रगतीवर परिणाम होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील जिल्हावार मानव विकास निर्देशांक काढण्याचा सरकारला जणू विसरच पडला आहे. २०१२ पासून गरज असतानाही हा निर्देशांक का काढला जात नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. २०१२ पासून निर्देशांकाचा पत्ताच नसल्याने त्याचा विकास कामांवर व प्रगतीवर परिणाम होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. मानव विकास निर्देशांक काढण्याचे काम पुण्याची यशदा संस्था करीत असते. यासंदर्भात तिथल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, आम्हाला असे कोणतेच आदेश नाहीत. त्यामुळे मानव विकास निर्देशांक काढण्याचा प्रश्नच नाही.

पूर्णवेळ आयएएस अधिकारीच नाहीदरम्यान, छत्रपती संभाजीनगरातील राज्यातील १२५ तालुक्यांसाठी असलेल्या मानव विकास मिशनला पूर्णवेळ आयएएस अधिकारी नसल्यामुळे कामावर विपरीत परिणाम होत आहे. तेथे फक्त अधिकारी व कर्मचारी मिळून दहा जण काम करीत आहेत. २०११ पासून हे मिशन अस्तित्वात आले. विभागीय आयुक्त पदावरून निवृत्त झाल्यानंतर कृष्णा भोगे व भास्कर मुंडे यांनी तेथे आयुक्त म्हणून चांगले काम केले. आता निवृत्तीपर्यंत मधुकरराजे अर्दड यांच्याकडे तिथल्या आयुक्तपदाचे प्रभारीपद होते. मध्यंतरी नितीन पाटील नावाचे आयएएस अधिकारी पूर्णवेळ काम पाहत होते. पण आठ महिने काम पाहून तेही येथून गेले. आता नवे आयुक्त दिलीप गाढवे यांच्याकडे पदभार यायला हवा होता. परंतु तोही तांत्रिक कारणामुळे त्यांना मिळालेला नाही.

स्थलांतरणाचा धोकामानव विकास मिशन दरवर्षी राज्याच्या नियोजन खात्याकडे निधीची मागणी करीत असतो. सुमारे ८०० कोटींहून अधिकच्या निधीपैकी मुलींसाठी ९४ बस खरेदीसाठी ६७ कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत. अन्य निधीची प्रतीक्षा सुरू आहे. निधी नसल्यामुळे मानव मिशन संचालित विविध योजना राबविताना अडचणी येत आहेत. काही योजना बंदही झाल्या आहेत. दरम्यान हे मानव विकास मिशन छत्रपती संभाजीनगरहून मुंबईला कधीही स्थलांतरित होऊ शकते अशी स्थिती आहे. एकीकडे अशी परिस्थिती तर दुसरीकडे मानव विकास निर्देशांक काढण्यासाठी कुठलीच हालचाल नाही, याचा अर्थ काय घ्यायचा अशी चर्चा सुरू आहे.

२०११ चा जिल्हावार मानव विकास निर्देशांक असा आहे१) नंदुरबार- ०.६०४, २) गडचिरोली- ०.६०८,३) वाशिम- ०.६४८,४) उस्मानाबाद- ०.६४९,५) नांदेड- ०.६५७, ६) जालना- ०.६६३, ७) लातूर- ०.६६३,८) धुळे- ०.६७१, ९) बीड- ०.६७८, १०) परभणी- ०.६७८, ११) बुलढाणा- ०.६८३, १२) यवतमाळ- ०.७००, १३) गोंदिया- ०.७०१, १४) अमरावती- ०.७०१, १५) भंडारा- ०.७१८, १६) चंद्रपूर- ०.७१८, १७) अहमदनगर- ०.७२०, १८) अकोला- ०.७२२, १९)वर्धा- ०.७२३, २०)जळगाव- ०.७२३, २१) छत्रपती संभाजीनगर- ०.७२७, २२) सोलापूर- ०.७२८, २३) रत्नागिरी- ०.७३२, २४) सातारा- ०.७४२, २५) सांगली- ०.७४२, २६) नाशिक- ०.७४६, २७)सिंधुदुर्ग-०. ७५३, २८) रायगड- ०. ७५३, २९) कोल्हापूर- ०.७७०, ३०) नागपूर-०.७८६, ३१) ठाणे- ०.८००, ३२) पुणे-०.८१४, ३३) मुंबई- ०. ८४१ व महाराष्ट्र- ०.७५२

मानव विकास निर्देशांक म्हणजे काय? नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ डॉ. अमर्त्य सेन आणि पाकिस्तानी अर्थतज्ज्ञ मेहबूब उल हक यांनी सन १९९०मध्ये पहिला मानवी विकास अहवाल (एचडीआर) सादर केला. ‘नागरिक हेच देशाची खरी संपत्ती आहेत,’... हे पहिल्याच अहवालाच्या प्रारंभी लिहिलेले वाक्य अहवालाचे सार कथन करते. त्यामुळेच देशांची प्रगती फक्त आर्थिक प्रगतीसारख्या पारंपरिक कसोट्यांवर न मोजता तेथील नागरिकांच्या स्थितीचाही आढावा या अहवालात घेण्यात येऊ लागला आणि विविध देशांची क्रमवारीही तयार होऊ लागली. नागरिकांचे शिक्षण, आरोग्य, समानता, रोजगार, सर्जनशीलता आणि मुलभूत गरजा आदींच्या कसोट्या त्यासाठी लावण्यात येतात. जगात विकासाच्या केंद्रस्थानी कोणते देश किंवा विभाग आहेत, आणि विविध देशांतील नागरिकांचे जीवनमान कुठल्या स्तराचे आहे, हे या अहवालातून मांडले जाते.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिकState Governmentराज्य सरकार