शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

एम.एड. अभ्यासक्रमांच्या २० विद्यार्थ्यांचा निकाल तीन महिन्यांपासून रखडला

By राम शिनगारे | Updated: November 3, 2023 13:19 IST

महाविद्यालयांनी संपूर्ण शंका दूर केल्यानंतरही निकाल जाहीर होईना

छत्रपती संभाजीनगर : शासकीय अध्यापक महाविद्यालयातील एम.एड. अभ्यासक्रमांच्या द्वितीय वर्षाच्या चौथ्या सत्रातील आठ आणि जालना येथील महाविद्यालयातील १२ विद्यार्थ्यांचा निकाल तीन महिन्यांपासून विद्यापीठाकडून रखडला आहे. संबंधित महाविद्यालयांनी त्रुटींची पूर्तता केल्यानंतरही निकाल जाहीर केला जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित शासकीय अध्यापक महाविद्यालय, जालना येथील सी.पी. कॉलेज ऑफ एज्युकेशन महाविद्यालयातील एम.एड.च्या विद्यार्थ्यांनी एप्रिल-मे महिन्यात दुसऱ्या वर्षातील चौथ्या सत्रातील परीक्षा दिल्या होत्या. त्यातील शासकीय अध्यापक महाविद्यालयातील आठ आणि सी.पी. कॉलेजमधील १२ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवले होते. शासकीय अध्यापक महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांचे व्हायवाअंतर्गत गुण ऑनलाइन आणि ऑफलाइनसुद्धा वेळेत दाखल केले होते. मात्र, परीक्षा विभागातून संबंधित विद्यार्थ्यांचे मार्कच महाविद्यालयाने दिले नाहीत, या सबबीखाली आठ विद्यार्थ्यांचा निकाल नापास असा दर्शविण्यात आला होता. मात्र, संबंधितांचे व्हायवाचे मार्क पूर्णपणे विद्यापीठाकडे सुपुर्द केले होते. त्यानंतरही निकाल जाहीर झाला नाही. याविषयी महाविद्यालय प्रशासनाने विद्यापीठातील परीक्षा विभागासोबत पत्रव्यवहार केला. अनेकवेळा प्रत्यक्ष जाऊन भेट देऊन चर्चा केली. तरीही तीन महिन्यांपासून निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. अशीच परिस्थिती जालना येथील सी.पी. कॉलेज ऑफ एज्युकेशनची बनलेली आहे. त्याठिकाणचे १२ विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती प्राचार्यांनी दिली.

राखीव निकालाचा आढावाशासकीय अध्यापक महाविद्यालायातील आठ विद्यार्थ्यांच्या राखीव निकालाचा बुधवारी आढावा घेतला. त्याचा प्रश्न निकाली काढला आहे. गुरुवारी जालना येथील महाविद्यालयातील १२ विद्यार्थ्यांचा आढावा घेऊन प्रश्न मार्गी लावला जाईल.- डॉ. भारती गवळी,संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, विद्यापीठ

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षण