शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

मराठा आंदोलनाचा परिणाम लोकसभा निकालावर दिसेल, मनोज जरांगे पाटील यांचा दावा

By बापू सोळुंके | Updated: May 14, 2024 18:18 IST

मनोज जरांगे पाटील यांनी ४ जूनपासून अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला सगे-सोयऱ्याचा कायदा द्यावा, मराठा आंदोलकांवरील गुन्हे रद्द करावे, यासह अन्य मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी ४ जूनपासून अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यासोबतच आमच्या आंदोलनाचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर दिसेल असेही जरांगे पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकारांना सांगितले. 

छत्रपती संभाजीनगर येथे बुलंद छावा संघटनेच्यावतीने आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी छत्रपती संभाजी राजेंच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले, मात्र हे आरक्षण लागू झाले नाही. सगेसोयऱ्याचा कायदा केला नाही, आंदोलकांवरील गुन्हे परत घेतले नाही, यामुळे ४ जूनपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरवात करणार आहे. 

तुमच्या या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर समाजाला काय आवाहन करणार या प्रश्नाचे उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले की, सर्व गोरगरीब मराठा समाज माझ्या पाठिशी आहे, मराठा समाजानेही शांततेत आंदोलन करायचे आहे. ८ जून रोजी नारायणगड(जि.बीड) येथे ६ कोटी मराठ्यांची जाहिर सभा होणार आहे. या सभेसाठी सुमारे ५० हजार स्वयंसेवक असतील. या सभेची काय तयारी सुरू आहे, याचा आढावा घेण्यासाठी आपण नारायणगड येथे जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

लोकसभा निवडणुकीच्या आतपर्यंत झालेल्या तीन टप्प्यात मराठा आंदोलनाचा काय परिणाम जाणवला, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आमचा महायुती अथवा महाविकास आघाडीला किंवा अपक्षाला पाठिंबा नव्हता. केवळ मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा असे सांगितले होते. मी राजकारणी नसल्याने निवडणुकीत काय परिणाम झाला हे मला सांगता येणार नसल्याचे त्यांनी नमूद केले. एकमात्र झाले की, पंतप्रधान मोदी साहेब महाराष्ट्रात येत नव्हते. ते गेल्या काही दिवसांपासून सतत महाराष्ट्रात सभा घेत आहे. हा मराठ्यांचा 'डर' असल्याचा दावा त्यांनी केला.

देवेंंद्र फडणवीस यांनी मराठ्यांचा द्वेष सोडावाआम्ही मराठ्यांच्या विरोधात नव्हतो. पण फडणवीस यांनी आरक्षणाला विरोध केला, महिलांवर लाठीहल्ला केला, गोरगरीब मराठा आंदोलकांवर गुन्हे नोंदविले, महिलांनाही तडीपार केले. यामुळे आमचा त्यांना विरोध आहे. त्यांनी मराठ्यांचा द्वेष सोडावा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील