शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
3
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
4
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
5
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
6
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
7
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
8
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
9
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
10
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
11
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
13
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
14
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
15
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
16
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
17
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
18
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
19
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
20
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा

मराठा आंदोलनाचा परिणाम लोकसभा निकालावर दिसेल, मनोज जरांगे पाटील यांचा दावा

By बापू सोळुंके | Updated: May 14, 2024 18:18 IST

मनोज जरांगे पाटील यांनी ४ जूनपासून अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला सगे-सोयऱ्याचा कायदा द्यावा, मराठा आंदोलकांवरील गुन्हे रद्द करावे, यासह अन्य मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी ४ जूनपासून अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यासोबतच आमच्या आंदोलनाचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर दिसेल असेही जरांगे पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकारांना सांगितले. 

छत्रपती संभाजीनगर येथे बुलंद छावा संघटनेच्यावतीने आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी छत्रपती संभाजी राजेंच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले, मात्र हे आरक्षण लागू झाले नाही. सगेसोयऱ्याचा कायदा केला नाही, आंदोलकांवरील गुन्हे परत घेतले नाही, यामुळे ४ जूनपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरवात करणार आहे. 

तुमच्या या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर समाजाला काय आवाहन करणार या प्रश्नाचे उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले की, सर्व गोरगरीब मराठा समाज माझ्या पाठिशी आहे, मराठा समाजानेही शांततेत आंदोलन करायचे आहे. ८ जून रोजी नारायणगड(जि.बीड) येथे ६ कोटी मराठ्यांची जाहिर सभा होणार आहे. या सभेसाठी सुमारे ५० हजार स्वयंसेवक असतील. या सभेची काय तयारी सुरू आहे, याचा आढावा घेण्यासाठी आपण नारायणगड येथे जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

लोकसभा निवडणुकीच्या आतपर्यंत झालेल्या तीन टप्प्यात मराठा आंदोलनाचा काय परिणाम जाणवला, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आमचा महायुती अथवा महाविकास आघाडीला किंवा अपक्षाला पाठिंबा नव्हता. केवळ मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा असे सांगितले होते. मी राजकारणी नसल्याने निवडणुकीत काय परिणाम झाला हे मला सांगता येणार नसल्याचे त्यांनी नमूद केले. एकमात्र झाले की, पंतप्रधान मोदी साहेब महाराष्ट्रात येत नव्हते. ते गेल्या काही दिवसांपासून सतत महाराष्ट्रात सभा घेत आहे. हा मराठ्यांचा 'डर' असल्याचा दावा त्यांनी केला.

देवेंंद्र फडणवीस यांनी मराठ्यांचा द्वेष सोडावाआम्ही मराठ्यांच्या विरोधात नव्हतो. पण फडणवीस यांनी आरक्षणाला विरोध केला, महिलांवर लाठीहल्ला केला, गोरगरीब मराठा आंदोलकांवर गुन्हे नोंदविले, महिलांनाही तडीपार केले. यामुळे आमचा त्यांना विरोध आहे. त्यांनी मराठ्यांचा द्वेष सोडावा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील