शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

छत्रपती संभाजीनगरवासीय दररोज ६ टन पोह्यांचा नास्ता करतात फस्त 

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 30, 2023 20:42 IST

भाववाढ झाली; पण, नास्त्याचा भाव स्थिर; कांदेपोहे अजूनही खमंग रुचकर

छत्रपती संभाजीनगर : शहरवासीय दररोज नास्त्याला ६ टन खमंग पोहे खातात. महिन्याकाठी १८० टनपेक्षा अधिक पोह्याची शहरात विक्री होते. पोह्यांचा नास्ता एवढा लोकप्रिय आहे. सकाळच्या वेळी तर शहरातील अनेक चौकात पोह्यांच्या स्टॉलवर खवय्यांची गर्दी उसळते. विशेष म्हणजे पोह्यांचे व मुरमुऱ्यांचे दर वाढले आहेत. मात्र, अजून पोहे विक्रेत्यांनी प्लेटचे भाव वाढविले नसल्याने कांदा पोहा ग्राहकांसाठी आणखी खमंग बनला आहे.

किरकोळ विक्रीत दरप्रकार दर (प्रतिकिलो)साधे पोहे : ४६ रु. - ४८ रु.पातळ पोहा : ५६. रु - ६० रु.दगडी पोहा : ४८ रु. - ५० रु.मुरमुरे : ६६ रु. - ८० रु.

दिवाळीपर्यंत दर वाढतच राहणारशहरात गुजरात, मध्य प्रदेश व छत्तीसगड या राज्यांतून पोहे आणले जातात. कच्चामाल (धान)चा तुटवडा जाणवत आहे. कारण, उन्हाळी पीक कमी आले आहे. यामुळे पोहे क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयांनी, तर मुरमुरे ३०० रुपयांनी महागले आहेत. किरकोळ विक्रीत पोहे व मुरमुरे किलोमागे ८ रुपयांपर्यंत वधारला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर दिवाळीपर्यंत आणखी भाव वाढत राहतील.- उमेश लड्डा, होलसेल व्यापारी

अजून खमंग पोह्याचे भाव स्थिरपोह्यांचे भाव किलोमागे ८ ते १० रुपयांनी वाढले आहेत. पाच ते सहा महिन्यांपूर्वीच आम्ही खमंग पोह्याची प्लेट १० रुपयेऐवजी १५ रुपये केली होती. मात्र, भाववाढ होऊनही आम्ही भाव वाढविले नाही. कारण, विक्रेत्यांमध्ये मोठी स्पर्धा आहे. भाव वाढविले की, ग्राहक कमी होतात.- मनोज कस्तुरे, भजे, पोहा विक्रेता

मुरमुऱ्यांची विक्री घटलीउन्हाळ्यात मुरमुऱ्यांची विक्री दररोज ३ ते ४ टनपर्यंत असते. मात्र, पावसाळा सुरू झाल्यावर मुरमुरे लूज पडतात. यामुळे या दिवसात मुरमुरे खाणाऱ्यांची संख्या कमी होते. सध्या दररोज १ ते दीड टन मुरमुरे विक्री होत आहेत.- टिंकू खटोड, किराणा व्यापारी

भाववाढ झाली तरी डब्ब्यात पोहे द्यावे लागतातप्लेटभर पोहे खाल्ल्याने पोट भरते. यामुळे मुलांना शाळेच्या डब्यात अधून-मधून खमंग पोहे देत असते. किलोमागे ८ ते १० रुपयांनी पोहे महागले. ठीक आहे, मुलांना पोहेच आवडतात.-रश्मी सुराणा, गृहिणी

टॅग्स :foodअन्नAurangabadऔरंगाबाद