शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

छत्रपती संभाजीनगरवासी करतात दररोज १०० टन खाद्यतेल फस्त !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 17:50 IST

खाद्यतेलाचा वापर केलाच पाहिजे, पण अतिवापर करणे टाळावे. दररोज प्रतिव्यक्तीने १५ ते २० एमएलपेक्षा अधिक खाद्यतेल खाऊ नये.

छत्रपती संभाजीनगर : देशातील नागरिकांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे खाद्यतेल होय. निरोगी आयुष्यासाठी तेलाचा अतिवापर टाळा असा कानमंत्र खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिला आहे. एकट्या छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर येथे दररोज १०० टन खाद्यतेलाची विक्री होते, आता बोला.

१८ लाख लोक दररोज खातात १०० टन खाद्यतेलछत्रपती संभाजीनगर शहराची लोकसंख्या सुमारे १८ लाख आहे. पॅकिंग व सुटे खाद्यतेल मिळून दररोज अंदाजे १०० टन खाद्यतेलाची उलाढाल होते. प्रतिव्यक्ती सुमारे ७० ते ८० ग्रॅम तेलाचे दररोज सेवन करतो, असा याचा अर्थ होतो. उल्लेखनीय बाब म्हणजे, आहारतज्ज्ञांच्या मते, ४० वर्षांवरील प्रतिव्यक्ती दररोज १५ ते २० एमएल तेल, तर ४० वर्षांखालील व्यक्तींनी २० ते २५ एमएल तेल दररोज खाल्ले पाहिजे.

शहरवासीयांना आवडते सोयाबीन तेलकरडी तेल व शेंगदाणा तेलाचे भाव गगनाला भिडल्याने शहरवासी मागील काही महिन्यांपासून सोयाबीन तेलाला पहिली पसंती देत आहेत. १०० टन पैकी ६० ते ७० टन सोयाबीन तेल विकते. २० ते ३० टन सूर्यफूल तेल विकते, तर उर्वरित १० टन तेलामध्ये करडीतेल, शेंगदाणा, सरकी, पामतेल, राईस ब्रॅन तेल, सरसो तेलाचा समावेश होतो. यात ५० टक्के पॅकिंगचे, तर ५० टक्के सुट्टे तेल विकले जात असल्याची माहिती होलसेल व्यापारी राकेश पांडे यांनी दिली.

एका कुटुंबाला महिन्याला किती लागते तेल ?पती-पत्नी व त्यांचे दोन मुले, अशा चार जणांच्या कुटुंबाला महिन्याकाठी किती तेल लागते. याविषयी माहिती घेतली असता. किराणा दुकानात येणाऱ्या यादीवरून सुमारे ४.५० ते ५ लिटर खाद्यतेल खरेदी करीत असल्याचे निदर्शनात आले. अनिल पवार या व्यक्तीने सांगितले की, आम्ही दोघे व आमच्या दोन मुली असे आमचे कुटुंब आहे. दर महिन्याला आम्ही सोयाबीन किंवा सूर्यफुल तेलाची पाच लिटरची कॅन लागते.

अदलूनबदलून तेल खरेदी कराखाद्यतेलाचा वापर केलाच पाहिजे, पण अतिवापर करणे टाळावे. दररोज प्रतिव्यक्तीने १५ ते २० एमएलपेक्षा अधिक खाद्यतेल खाऊ नये. प्रत्येक तेलाचे गुणधर्म वेगवेगळे असतात. उष्मांक वेगवेगळा असतो. यामुळे दर महिन्याला एकच तेल खरेदी न करता. प्रत्येक महिन्याला खाद्यतेल बदलून वापरत जा. एका महिन्यात सोयाबीन, तर दुसऱ्या महिन्यात सूर्यफूल, तर तिसऱ्या महिन्यात शेंगदाणा तेल असे बदलून वापरत जावे, मात्र तेलाचे प्रमाण मात्र नक्की पाळावे.अलका कर्णिक, आहारतज्ज्ञ

टॅग्स :foodअन्नchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर