शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

निवडणुकीची चाहूल लागताच गहू, तांदूळ, डाळींचे भाव उतरणीला

By प्रशांत तेलवाडकर | Updated: January 11, 2024 18:48 IST

लोकसभा निवडणुकीत महागाईचा मुद्दा डोकेदुखी ठरू शकतो.

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे; तसेच नवीन धान्याचे बाजाराला वेध लागले आहेत. अशा परिस्थितीत गव्हापाठोपाठ, ज्वारी, तांदूळ, डाळींचे भाव उतरणीला लागले आहेत. निवडणुकीत महागाईचा मुद्दा आड येऊ नये म्हणून केंद्र सरकारने भाववाढ रोखण्याची पावले उचलली आहेत. त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेत दिसू लागला आहे.

‘भारत ब्रँड’च्या नावाने स्वस्तात विक्रीलोकसभा निवडणुकीत महागाईचा मुद्दा डोकेदुखी ठरू शकतो. यामुळे भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने ‘भारत ब्रँड’च्या नावाने स्वस्त धान्य दुकान, तसेच आता माॅलमध्ये आटा, तांदूळ व डाळ विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. अजून सरकारी आटा, तांदूळ व डाळ शहरातील मॉलमध्ये विक्रीला आला नाही. मात्र, कमी किमतीत डाळींची विक्री शहरात होत आहे; तसेच सरकारकडे गोदामात मुबलक प्रमाणात धान्य, तांदूळ आहे. परिणामी, मोंढ्यात आटा, तांदूळ, डाळींचे भाव कमी होऊ लागले आहेत.

गव्हाचे उत्पादन विक्रमी होण्याचे संकेतयंदा रब्बी हंगामात देशात ११.४ कोटी टन नवीन गव्हाचे उत्पादन होण्याचा अनुमान आहे. यामुळे तेजीची मानसिकता बदलली व क्विंटलमागे २०० रुपयांनी भाव कमी होऊन २८०० ते ३४५० रुपये दर आहेत. गव्हापाठोपाठ ज्वारीचे भाव ५०० ते ८०० रुपयांनी कमी होऊन शाळू ज्वारी ५००० ते ५५०० रुपये, तर कर्नाटकी ज्वारी ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल विकली जात आहे.

तांदळातही मंदीयंदा तांदळाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. निर्यातीमुळे तांदळाचे भाव वधारले होते. मात्र, सरकारी गोदामातील तांदूळसुद्धा आता कमी किमतीत म्हणजे ३० ते ३५ रुपये किलोने मिळणार आहे. परिणामी, स्थानिक बाजारात तांदळाचे भाव क्विंटलमागे ३०० ते ७०० रुपयांनी कमी होऊन ३६५० ते १० हजार रुपये आहेत.

डाळींत मंदीदिवाळीनंतर पहिल्यांदाच डाळींच्या भावात मंदी आली आहे. हरभरा डाळीच्या भावात १००० रुपयांनी कमी झाले. सध्या ६३०० ते ६६०० रुपये प्रतिक्विंटल आहे. तुरीची डाळ २५०० रुपयांनी स्वस्त होऊन १२०० ते १२६० रुपये, तसेच ७०० ते ८०० रुपये घसरण होऊन मूगडाळ ९५०० ते १०२०० रुपये किलो, मसूर डाळ ५०० ते ७०० रुपयांनी मंदी येऊन ७५०० ते ८००० रुपये आहे.

आणखी भाव कमी होतीलयंदा ज्वारी, तुरीचे उत्पादन समाधानकारक आहे. त्यात गव्हाचे उत्पादन विक्रमी होत आहे. नवीन तुरीची आवक वाढत आहे. नवीन गहू, ज्वारीची आवक पुढील महिन्यात सुरू होईल. यामुळे भाव कमी होऊ शकतात.- नीलेश सोमाणी,होलसेल व्यापारी

टॅग्स :MarketबाजारAurangabadऔरंगाबादlok sabhaलोकसभा