शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

विद्यापीठातील 'औरंगाबाद' नावाच्या ४२ हजार पदव्यांचा कागद होणार रद्दी

By राम शिनगारे | Updated: February 8, 2024 12:40 IST

खरेदी समितीमध्ये १० हजार पदव्यांच्या कागद खरेदीला मंजुरी

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे औरंगाबाद नाव असलेल्या तब्बल ४२ हजार ३२७ पदव्यांच्या कागदाची आता रद्दी होणार आहे. त्यामुळे विद्यापीठास लाखो रुपयांचा भुर्दंड बसला आहे. या प्रकारामुळे पदव्यांच्या कागदाची टंचाई निर्माण झाल्यामुळे मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना पदव्यांचे वाटपही थांबले आहे.

विद्यापीठातील परीक्षा विभागात पदव्यांच्या कागदाची प्रचंड टंचाई असल्यामुळे कुलगुरूंच्या अध्यक्षतेत ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या खरेदी समितीच्या बैठकीत तत्काळ १० हजार पदव्यांच्या छपाईसाठी कागदाच्या खरेदीस मंजुरी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य शासनाने औरंगाबादचे नामांतर केले. त्यानुसार २६ ऑगस्ट २०२३ रोजी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात अध्यादेशानुसार सुधारणा करीत विद्यापीठाच्या नावात औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर हा बदल केला. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने औरंगाबाद नावाचा कागद असलेल्या तब्बल ४२ हजार ३२७ पदव्यांच्या छपाईस मनाई केली. औरंगाबाद नाव असलेल्या कागदावर छत्रपती संभाजीनगर असा बदल करता येतो का, याची चाचपणीही परीक्षा विभागाकडून करण्यात आली.

मात्र, प्रिंट झालेल्या ठिकाणचा औरंगाबाद शब्द काढून त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शब्द टाकणे शक्य नसल्याचा अभिप्राय तज्ज्ञांनी दिला. त्यामुळे परीक्षा विभागाने तत्काळ औरंगाबाद नावाच्या पदव्यांवर छपाईस मनाई केली. त्यानंतर टीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी अर्ज करताना पदव्यांची आवश्यकता असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर नाव असलेला नवीन १० हजार पदव्यांचा कागद मागविला. मात्र, तो कागदही संपला. त्यानंतर कागदाची खरेदी झाली नसल्यामुळे काही दिवसांपासून छपाई केलेल्या पदव्या देण्यास परीक्षा विभागाकडून बंद करण्यात आलेले आहे.

औरंगाबाद नावाच्या पदवी कागदाचे निर्लेखनऔरंगाबाद नावाचा ४२ हजार ३२७ पदव्यांच्या कागदाचे समितीच्या मान्यतेनंतर निर्लेखन केले जाणार आहे. त्यानुसार औरंगाबाद नावाच्या पदव्यांचा कागद एक तर जाळून टाकला जाईल. अन्यथा जमिनीत कायमस्वरूपी गाडला जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

कागदाच्या खरेदीला मान्यताविद्यापीठ खरेदी समितीच्या ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत जुन्याच वेंडरकडून आणखी १० हजार पदव्यांच्या कागदाची खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच दीक्षान्त सोहळ्यासाठी पदव्यांच्या छपाईला नवीन निविदा मागवून कागद खरेदी होईल. त्याशिवाय गुणपत्रिकांच्या कागदही खरेदीस मान्यता मिळाली आहे.

उत्तरपत्रिकांचे काय होणार?मोठ्या प्रमाणात उत्तरपत्रिकांची खरेदी केलेली आहे. त्या उत्तरपत्रिकांवरही औरंगाबाद हे नाव असून, त्यांचा वापर नुकत्याच झालेल्या सत्र परीक्षेत केला आहे. उत्तरपत्रिकांचा वापर संपल्यानंतर त्याचे काही महिन्यांनी निर्लेखन केले जाते. त्यामुळे पदव्यांच्या कागदासारखा कायमस्वरूपी वापर उत्तरपत्रिकांचा होत नसल्यामुळे त्याचा वापर परीक्षेत केल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण