शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

छत्रपती संभाजीनगरात ताशी ५१ किमी वेगाने वादळी वारा; २६ उपकेंद्रांची ‘बत्ती’ गूल

By साहेबराव हिवराळे | Updated: June 5, 2023 19:38 IST

जवळपास १ ते २ तासांनंतर वीजपुरवठा कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने सुरळीत सुरू करण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर : रविवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रापासून ते जालना रोड, शिवाजीनगर, एन-४, एन-७, छावणी, पडेगाव, बायजीपुरा, पन्नालालनगर, सातारा- देवळाई परिसरासह २६ उपकेंद्रांवरील बत्ती गूल झाली होती.

जवळपास १ ते २ तासांनंतर वीजपुरवठा कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने सुरळीत सुरू करण्यात आला. वादळी वाऱ्याने विद्यानिकेतन कॉलनी येथे झाड पडल्याने खांब वाकले व विजेच्या तारा तुटल्या. जालना रोडवर बॅनर पडल्याने तारा तुटल्या, चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात नारळाचे झाड पडल्याने तारा तुटून नुकसान झाले.

सूतगिरणी, शिवाजीनगर, म्हाडा, रोशन गेट, पाॅवर हाउस, जाधववाडी परिसर यासह अनेक भागांतील ३३ केव्हीच्या उपकेंद्रांचा पुरवठा खंडित झाला होता. वीजपुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. खबरदारी म्हणूनही काही केंद्राची वीज बंद करण्यात आलेली होती.

शहरात तासभर सुसाट वादळ, ५१.५ किमी प्रति तास वारा-एक ते दीडच्या दरम्यान शहरात सर्वाधिक ५१.५ ते ५२ किमी प्रतितास वेगाने वारे वाहिले.-अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात ८ ठिकाणी झाडांची पडझड झाली. यात सर्वप्रथम सातारा व रिध्दीसिध्दी हॉल जवळून कॉल प्राप्त झाला. यात कुठेही वित्त किंवा जीवितहानी झाली नाही.- बाजारपेठांमध्ये भाजीविक्रेत्यांचे पेंडॉल उद्ध्वस्त झाले. तर काही ठिकाणी बॅनर देखील फाडले.

असे का झाले ?एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सर्वत्र पूर्वमोसमी वारे सुरू झाले आहेत. सोबतच उत्तरेकडून येणारी ध्रुवीय वारेदेखील सक्रिय झाले. त्याचा परिणाम संपूर्ण राज्यावर झाल्याने वाऱ्याचा वेग वाढला. आज पाऊस पडायला हवा होता. ही परिस्थिती पाहता मान्सून उशिरा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectricityवीज