शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तिन्ही पक्षातील नेत्यांची नसती बडबड; ना राहील महाविकास आघाडी ना वज्रमूठ: संदीपान भुमरे

By बापू सोळुंके | Updated: May 5, 2023 17:55 IST

राज्यातील जनतेला आता कळून चुकले की, हे तिन्ही पक्ष प्रेमाने एकत्र आलेले नाही.

छत्रपती संभाजीनगर: राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली टीका, नाना पटोले आणि अजीतदादा पवार यांनी संजय राऊतांवर केलेली टिका आणि राऊतांची बडबड पहाता आता महाविकास आघाडी राहणार नाही आणि यापुढे त्यांच्या वज्रमूठ सभाही होणार नसल्याचा दावा, राज्याचे राेहयो मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

सकल मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले  की, जिल्ह्यातील सातही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका शिवसेना आणि भाजप युतीने जिंकल्या आहेत. राज्यातील जनतेला आता कळून चुकले की, हे तिन्ही पक्ष प्रेमाने एकत्र आलेले नाही. यामुळे बाजार समिती निवडणूकीत मतदारांनी त्यांना नाकारले आहे. 

वज्रमूठ सभा पुढे ढकलण्यात आल्याकडे तुम्ही कसे पहाता या प्रश्नाचे उत्तर देताना पालकमंत्री म्हणाले की, आता महाविकास आघडीच राहणार नाही,  उद्धव ठाकरे हे दोन दिवसच मंत्रालयात आले होते, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधीपक्षनेते अजीतदादा यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर राऊतही त्यांच्याविषयी बोलत असतात.यावरून महाविकास आघाडी एकत्र राहिले असे वाटत नाही. यामुळे यापुढे वज्रमूठ सभा होणारच नसल्याचा दावाही त्यांनी केला. 

टॅग्स :Sandipan Bhumreसंदीपान भुमरेAurangabadऔरंगाबादMahavikas Aghadiमहाविकास आघाडी