शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

तिन्ही पक्षातील नेत्यांची नसती बडबड; ना राहील महाविकास आघाडी ना वज्रमूठ: संदीपान भुमरे

By बापू सोळुंके | Updated: May 5, 2023 17:55 IST

राज्यातील जनतेला आता कळून चुकले की, हे तिन्ही पक्ष प्रेमाने एकत्र आलेले नाही.

छत्रपती संभाजीनगर: राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली टीका, नाना पटोले आणि अजीतदादा पवार यांनी संजय राऊतांवर केलेली टिका आणि राऊतांची बडबड पहाता आता महाविकास आघाडी राहणार नाही आणि यापुढे त्यांच्या वज्रमूठ सभाही होणार नसल्याचा दावा, राज्याचे राेहयो मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

सकल मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले  की, जिल्ह्यातील सातही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका शिवसेना आणि भाजप युतीने जिंकल्या आहेत. राज्यातील जनतेला आता कळून चुकले की, हे तिन्ही पक्ष प्रेमाने एकत्र आलेले नाही. यामुळे बाजार समिती निवडणूकीत मतदारांनी त्यांना नाकारले आहे. 

वज्रमूठ सभा पुढे ढकलण्यात आल्याकडे तुम्ही कसे पहाता या प्रश्नाचे उत्तर देताना पालकमंत्री म्हणाले की, आता महाविकास आघडीच राहणार नाही,  उद्धव ठाकरे हे दोन दिवसच मंत्रालयात आले होते, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधीपक्षनेते अजीतदादा यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर राऊतही त्यांच्याविषयी बोलत असतात.यावरून महाविकास आघाडी एकत्र राहिले असे वाटत नाही. यामुळे यापुढे वज्रमूठ सभा होणारच नसल्याचा दावाही त्यांनी केला. 

टॅग्स :Sandipan Bhumreसंदीपान भुमरेAurangabadऔरंगाबादMahavikas Aghadiमहाविकास आघाडी