शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

उन्हाचा चटका वाढला! जिल्हा परिषद शाळांचे वेळापत्रक बदला

By विजय सरवदे | Updated: February 24, 2023 14:10 IST

ग्रामीण भागामध्ये ५० टक्के शाळांच्या वर्गखोल्यांना पत्र्याचे शेड आहेत; १ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवा शाळा

औरंगाबाद : अलीकडे काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचा विचार करता जिल्ह्यातील जि.प. शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात याव्यात, अशी मागणी अनेक शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. यामध्ये प्राथमिक शिक्षक समिती, आदर्श शिक्षक समिती, शिक्षक भारती, शिक्षक सेना या संघटनांनी शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांना १ मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरवण्याची विनंती केली आहे. 

संघटनांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिले की, फेब्रुवारी महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनच उष्णता जाणवते. दुसरीकडे, ग्रामीण भागामध्ये आतापासून पाण्याची टंचाईदेखील जाणवायला लागली आहे. याशिवाय ग्रामीण भागामध्ये ५० टक्के शाळांच्या वर्गखोल्यांना पत्र्याचे शेड आहेत. विद्यार्थ्यांना त्यामध्ये बसूनच विद्यार्जन करावे लागत आहे. वर्गखोलीतील उष्णता वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांना बसणे असह्य होत आहे. अनेक शाळांचे बिल न भरल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता नियमित तासिकांमध्ये फरक न करता एक मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवण्यात याव्यात.

यासंदर्भात प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर, रंजीत राठोड, नितीन नवले, श्याम राजपूत, गुलाब चव्हाण, विष्णू भंडारी, दिलीप रासने, के.के. जंगले, सतीश कोळी, आदर्श शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष बरबंडे, संजीव देवरे, जिल्हाध्यक्ष राजेश भुसारी, मच्छींद्र भराडे, संतोष ताठे, महेंद्र बारवाल, शिक्षक सेनेचे दीपक पवार, प्रभाकर पवार, सदानंद माडेवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्याही निदर्शनात ही बाब आणून दिली आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण