शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
3
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
4
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
5
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
6
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
7
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
8
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
9
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
10
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
11
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
12
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
14
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
15
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा चटका वाढला! जिल्हा परिषद शाळांचे वेळापत्रक बदला

By विजय सरवदे | Updated: February 24, 2023 14:10 IST

ग्रामीण भागामध्ये ५० टक्के शाळांच्या वर्गखोल्यांना पत्र्याचे शेड आहेत; १ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवा शाळा

औरंगाबाद : अलीकडे काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचा विचार करता जिल्ह्यातील जि.प. शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात याव्यात, अशी मागणी अनेक शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. यामध्ये प्राथमिक शिक्षक समिती, आदर्श शिक्षक समिती, शिक्षक भारती, शिक्षक सेना या संघटनांनी शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांना १ मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरवण्याची विनंती केली आहे. 

संघटनांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिले की, फेब्रुवारी महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनच उष्णता जाणवते. दुसरीकडे, ग्रामीण भागामध्ये आतापासून पाण्याची टंचाईदेखील जाणवायला लागली आहे. याशिवाय ग्रामीण भागामध्ये ५० टक्के शाळांच्या वर्गखोल्यांना पत्र्याचे शेड आहेत. विद्यार्थ्यांना त्यामध्ये बसूनच विद्यार्जन करावे लागत आहे. वर्गखोलीतील उष्णता वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांना बसणे असह्य होत आहे. अनेक शाळांचे बिल न भरल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता नियमित तासिकांमध्ये फरक न करता एक मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवण्यात याव्यात.

यासंदर्भात प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर, रंजीत राठोड, नितीन नवले, श्याम राजपूत, गुलाब चव्हाण, विष्णू भंडारी, दिलीप रासने, के.के. जंगले, सतीश कोळी, आदर्श शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष बरबंडे, संजीव देवरे, जिल्हाध्यक्ष राजेश भुसारी, मच्छींद्र भराडे, संतोष ताठे, महेंद्र बारवाल, शिक्षक सेनेचे दीपक पवार, प्रभाकर पवार, सदानंद माडेवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्याही निदर्शनात ही बाब आणून दिली आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण