शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

उन्हाचा चटका वाढला! जिल्हा परिषद शाळांचे वेळापत्रक बदला

By विजय सरवदे | Updated: February 24, 2023 14:10 IST

ग्रामीण भागामध्ये ५० टक्के शाळांच्या वर्गखोल्यांना पत्र्याचे शेड आहेत; १ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवा शाळा

औरंगाबाद : अलीकडे काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचा विचार करता जिल्ह्यातील जि.प. शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात याव्यात, अशी मागणी अनेक शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. यामध्ये प्राथमिक शिक्षक समिती, आदर्श शिक्षक समिती, शिक्षक भारती, शिक्षक सेना या संघटनांनी शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांना १ मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरवण्याची विनंती केली आहे. 

संघटनांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिले की, फेब्रुवारी महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनच उष्णता जाणवते. दुसरीकडे, ग्रामीण भागामध्ये आतापासून पाण्याची टंचाईदेखील जाणवायला लागली आहे. याशिवाय ग्रामीण भागामध्ये ५० टक्के शाळांच्या वर्गखोल्यांना पत्र्याचे शेड आहेत. विद्यार्थ्यांना त्यामध्ये बसूनच विद्यार्जन करावे लागत आहे. वर्गखोलीतील उष्णता वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांना बसणे असह्य होत आहे. अनेक शाळांचे बिल न भरल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता नियमित तासिकांमध्ये फरक न करता एक मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवण्यात याव्यात.

यासंदर्भात प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर, रंजीत राठोड, नितीन नवले, श्याम राजपूत, गुलाब चव्हाण, विष्णू भंडारी, दिलीप रासने, के.के. जंगले, सतीश कोळी, आदर्श शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष बरबंडे, संजीव देवरे, जिल्हाध्यक्ष राजेश भुसारी, मच्छींद्र भराडे, संतोष ताठे, महेंद्र बारवाल, शिक्षक सेनेचे दीपक पवार, प्रभाकर पवार, सदानंद माडेवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्याही निदर्शनात ही बाब आणून दिली आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण