शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

सरकार बदलले अन् ‘पुस्तकांचे गाव’ राहिले कागदावरच; पाहणीच्या पलीकडे हालचाल शून्य

By विकास राऊत | Updated: April 1, 2023 19:06 IST

मराठी वाचा आणि वाचवा, यासाठी २०१७ पासून सुरू असलेली ही योजना व्यापक करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर : ‘हे ऑन वे’ या वेल्स इंग्लंडमधील गावाच्या धर्तीवर राज्यात ‘पुस्तकांचे गाव’ ही संकल्पना अस्तित्वात आली असून, जिल्ह्यातील वेरूळमध्ये गेल्यावर्षी महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेले पुस्तकांचे गाव सरकार बदलताच कागदावरच राहिले आहे. वेरूळ ग्रामपंचायतींतर्गत श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाला ‘पुस्तकाचे गाव’ करण्यास शासनाने मार्च २०२२ मध्ये मान्यता दिली, परंतु उपक्रम अजूनही सुरू केलेला नाही.

पुस्तकाचे गाव उपक्रमासाठी शासनाने डिसेंबर २०२१ च्या शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीत योजनेच्या विस्ताराला आर्थिक साह्य करण्याचा निर्णय घेतला होता. मराठी भाषा विभागाने याबाबत जानेवारी २०२२ मध्ये अध्यादेश जारी केला. त्यानंतर २५ मार्च रोजी सहा महसुली विभागांतून आलेल्या प्रस्तावांची छाननी करून निवड केल्याचे शासनाने जाहीर केले होते. मराठी वाचा आणि वाचवा, यासाठी २०१७ पासून सुरू असलेली ही योजना व्यापक करण्यात आली. दरम्यान, निवड झालेल्या संस्थेची जागा पाहणी करण्यापलीकडे भाषा संचालनालयाने काहीही केलेले नाही.

यामुळे वेरूळची निवडपर्यटनस्थळ, तीर्थक्षेत्र, वाङ्मय, साहित्य चळवळ, ऐतिहासिक वारसा वैशिष्ट्ये, कृषी पर्यटन, पुस्तकांच्या खपात लौकिक असलेल्या गावांचा योजनेत समावेश होईल. या पूर्ण निकषांत वेरूळचा समावेश होतो. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले घृष्णेश्वर देवस्थान, जगप्रसिद्ध लेण्यांमुळे वेरूळमध्ये येणाऱ्या पर्यटक आणि भाविकांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे पुस्तकांचे गाव तेथे झाल्यास आणखी एक आकर्षण पर्यटकांसाठी वाढण्याच्या दृष्टीने वेरूळची निवड झाली. तंटामुक्त, वाचन संस्कृती, आदर्श गाव, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, निसर्गसंपन्नता, शांतता याचा विचार करून जिल्हा प्रशासनाने योजनेत सहभागी होण्यास वेरूळचा प्रस्ताव दिला होता.

या ठिकाणी पुस्तकांचे गावलोकसहभाग, २५० चौ. फुटांची दहा दालने, जागेची सुरक्षितता, वाचकांसाठी सुविधा, संबंधित संस्थांची राज्य मराठी विकास संस्थेसोबत करार करण्याची अट आहे. एका दालनासाठी पाच लाख रुपये शासन अनुदान देण्याची तरतूद आहे. मराठी भाषा गौरव दिन, वाचन प्रेरणा दिन, भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रमांचे आयोजन निवड झालेल्या संस्थांना करण्याचा नियम आहे. छत्रपती संभाजीनगर (वेरूळ), नागपूर (नवेगाव बांध), सिंधुदुर्ग (पोंभुर्ले), पुणे (अंकलखोप) या ठिकाणी पुस्तकांचे गाव सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. वेरूळसह सर्व ठिकाणच्या गावांची अशीच परिस्थिती असल्याचे समजते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार