शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जनतेला फसवून सरकार सत्तेत आले, शेतकरी कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरणार: अंबादास दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 19:13 IST

पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करताना महायुतीतील घटक पक्षांमध्ये चर्चा झाली नाही, यामुळेच  दोन जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्याची नामुष्की सरकारवर ओढावली आहे.

छत्रपती संभाजीनगर: महायुतीने निवडणूक काळात शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. आता मात्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषयावर बोललो नसल्याचे सांगत आहेत. शेतकऱ्यांना फसवून हे सरकार सत्तेवर आल्याचा आरोप विधान परिषदेची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशाराही त्यांनी दिला.

आ. दानवे म्हणाले की, पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करताना महायुतीतील घटक पक्षांमध्ये चर्चा झाली नाही, यामुळेच दोन जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्याची नामुष्की सरकारवर ओढावली आहे. कारण या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांविरोधात महायुतीतील दुसरे मंत्री आणि त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन महायुतीने दिले होते. लाडक्या बहिणींनाही दरमहा २१००रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र सत्तेवर येताच लाडक्या बहिणींचे पैसे कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, शिवाय कृषीमंत्री दादा भुसे आणि  उपमुख्यमंत्री अजित दादा हे तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी बोललोच नसल्याचे म्हणत आहेत. जनतेला फसवून महायुतीत सत्तेत आल्याचा आरोप आ. दानवे यांनी केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याने ते दरेगाव येथे गेल्याचे बोलले जात आहे, याकडे लक्ष वेधले असता आ.दानवे म्हणाले की, एकनाथ शिंदे आता काहीही करू शकत नाही. कारण अडिच वर्षाच्या मुख्यमंत्रीपाच्या काळात शिंदे यांनी अनागोंदी कारभार केला. त्याचा सर्व रेकॉर्ड भाजपने सांभाळून ठेवला आहे. शिंदेसेना ही भाजपसाठीच काम करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. 

संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना गांर्भियाने घेतली नाहीअभिनेता सैफ अली  यांच्यावर हल्ला करणारा अवघ्या दोन दिवसांत पकडला जातो. दुसरीकडे मात्र मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांतील एक आरोपी अद्याप सापडला नाही.  गांर्भियाने तपास केला असता तर चार दिवसांत सर्व आरोपींना अटक झाली असती, असे विरोधीपक्षनेते आ. दानवे म्हणाले. 

शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती २३ जानेवारी रोजी साजरी होत आहे. यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगर शिवसेना शाखेच्यावतीने रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, अन्नदान, तसेच अभिवादन असे विविध उपक्रम शहरातील विविध वॉर्डात आयोजित करण्यात आल्याचे आ. दानवे यांनी सांगितले.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेShiv SenaशिवसेनाAgriculture Sectorशेती क्षेत्र