शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

प्रथेला फाटा देत अखेरची इच्छा पूर्ण; पाच मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला दिला खांदा, नातवाच्या हस्ते अग्निडाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 14:06 IST

बजाजनगरातील घटना; पाच मुलींनी सामाजिक प्रथेला फाटा देत जन्मदात्याला अखेरचा निरोप, नातवाने दिला अग्नीडाग

- शेख मेहमूद

वाळूज महानगर : प्रथेला फाटा देत पाच मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला तर नातवाने आजोबाला अग्नीडाग दिला. जन्मदात्याची अंतिम इच्छा पूर्ण करीत समाजापुढे आदर्श निर्माण केल्याचा हा प्रसंग आज सकाळी बजाजनगरात घडला. परिसरात प्रथमच मुलींच्या खांद्यावर निघालेल्या या अंत्ययात्रेत अनेकजण सहभागी होते.

मालेगाव जि.नाशिक येथील पुरुषोत्तम चंदुलाल खंडेलवाल (७२ रा.बजाजनगर) हे २५ वर्षापुर्वी पोटाची खळगी भरण्यासाठी अर्धागिनी मीना आणि रेखा, राखी, राणी, आरती व पुजा या मुलींसोबत बजाजनगरात आले होते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तसेच पाचही मुलीच असल्याने पुरुषोत्तम खंडेलवाल यांनी न डगमगता कापड विक्रीचा व्यवसाय सुरु केला. सायकलवरुन बजाजनगर व परिसरात दिवसभर कपडे विकुन पुरुषोत्तम खंडेलवाल हे कुटुंबाची उपजिवीका भागवित होते. मुलगा नसल्याची खंत न बाळगळता पुरुषोत्तम खंडेलवाल यांनी मुलींच माझे स्वप्न पुर्ण करतील, अशी आशा बाळगत खडतर परिश्रम घेत मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण दिले. 

सर्व मुलीं उच्चशिक्षीत झाल्यानंतर खंडेलवाल यांनी कपडे विक्रीतुन केलेल्या कष्टाईच्या कमाईतुन या पाचही मुलींचे लग्न लावुन दिले. मुली सासरी केल्यानंतर तसेच वयोमनानुसार कष्टाचे काम करता येत नसले तर त्यांनी आपला व्यवसाय सुरुच ठेवला होता. अशातच ९ वर्षापुर्वी आजारी पडल्यानंतर पुरुषोत्तम खंडेलवाल हे घरातच पडून होते. पतीच्या आजारपणात अर्धागिनी मिना खंडेलवाल व मुलगी राणी या दोघांनी त्यांची देखभाल केली. आजारपणातही पुरुषोत्तम खंडेलवाल हे पत्नी मीना व मुलगी राणी यांच्या मदतीने दैनंदिन कामकाज करीत होते. 

बुधवार (दि.१९) सकाळी ८ वाजेच्या सुमारास मुलगी राणीस, मला दुधाचा कपआणून दे, तोपर्यंत मी फ्रेश होतो, असे म्हणून पुरुषोत्तम खंडेलवाल बाथरुमला गेले. बराचवेळ झाला तरी वडील बाहेर आले नाही. यामुळे शेजाऱ्यांच्या मदतीने मुलगी राणीने बाथरुमचा दरवाजा तोडला. यावेळी पुरुषोत्तम खंडेलवाल यानाचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. यानंतर राणी यांनी नातेवाईक व छत्तीसगड, ओरीसा व शहरात असलेल्या दोन्ही  बहिणींना वडीलांचे छत्र हरपल्याची माहिती दिली.

पाच मुलींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला खांदापुरुषोत्तम खंडेलवाल यांच्या ओरीसा व छत्तीसगड मध्ये वास्तव्यास असणाऱ्या दोन्ही मुली आज गुरुवारी पहाटे बजाजनगरात पोहचल्या. सर्व पाचही मुली वडिलांना अखेरचा निरोप देण्यासाठी आल्यानंतर नातेवाईक व शेजाऱ्यांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरु केली होती. या पाचही मुलींनी धार्मिक प्रथेला फाटा देत जन्मदात्याच्या पार्थिवाला खांदा देण्याचा निर्णय घेतला. तसेच पाचही मुली स्मशानभुमीपर्यंत गेल्या. यानंतर नातू तेजस खंडेलवाल याने आजोबांना अग्नीडाग दिला.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबाद