शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

‘फूड व्हॅन’च्या प्रस्तावास निवडणुकीचा ‘ब्रेक’ लागल्याने बचत गटांचा हिरमोड

By विजय सरवदे | Updated: May 2, 2024 19:18 IST

सव्वा कोटीच्या या प्रस्तावाचा विचार निवडणुकीनंतर होऊ शकतो, असा अंदाज

छत्रपती संभाजीनगर : बचत गटांना ‘फूड व्हॅन’ उपलब्ध करून देण्याचे जिल्हा परिषदेचे नियोजन मावळत्या आर्थिक वर्षात बारगळले आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे हा प्रस्ताव आता लांबणीवर पडला. दरम्यान, मार्च अखेरपूर्वी ‘फूड व्हॅन’ मिळेल, व्यवसायाची भरभराटी होईल, या आशेने देव पाण्यात ठेवून बसलेल्या बचत गटांचा मात्र पुरता हिरमोड झालाय. तरीही सव्वा कोटीच्या या प्रस्तावाचा विचार निवडणुकीनंतर होऊ शकतो, असा अंदाज जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सूत्रांनी बांधला आहे.

मागील सहा महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे यांनी जिल्ह्यातील १६ बचत गटांना खाद्यपदार्थ विक्रीसाठी ‘फूड व्हॅन’ उपलब्ध करून देण्याचा नावीन्यपूर्ण प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरीही दिली व १ कोटी २० लाखांचा हा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीसमोर सादर केला. यात दोन प्रभागसंघ आणि १४ ग्रामसंघांचा सहभाग आहे.

जिल्ह्यात १८ हजार ३८१ महिला बचत कार्यरत आहेत. तथापि, गाव व परिसरातील बचत गटांना व्यवहारात पारदर्शकता आणणे, सरकारकडून मिळणाऱ्या निधीचा व्यवहार स्वतंत्र राहावा तसेच उत्पन्न व खर्चाचे मूल्यांकन करणे, अंदाजपत्रकावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामसंघ स्थापन करण्यात आले आहेत. एका ग्रामसंघात गावातील २० ते २५ बचत गटांचा समावेश आहे. याशिवाय, जि. प. गट अथवा मतदारसंघातील बचत गटांवरील संनियंत्रणासाठी प्रभागसंघही स्थापन करण्यात आले आहेत. एका प्रभागसंघात जवळपास १० ग्रामसंघांचा समावेश आहे. जिल्ह्यात असे ८०३ ग्रामसंघ व ४२ प्रभागसंघ कार्यरत आहेत.

खाद्यपदार्थांना चांगली मागणीबचत गटांकडून वेगवेगळ्या पद्धतीची लोणची, चटण्या, कुरडया, पापड याप्रमाणे खाद्यपदार्थ तयार केले जात असून, त्यास नागरिकांची चांगली मागणी अनेक प्रदर्शनातून दिसून आली आहे. हे लक्षात घेऊनच मुख्य कार्यकारी अधिकारी मीना आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सिरसे यांनी नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत बचत गटांना ‘फूड व्हॅन’ उपलब्ध करून देण्याची संकल्पना आखली आहे. आठवडी बाजार, यात्रा, एमआयडीसीतील गजबजलेले चौक, शहर किंवा गर्दीच्या ठिकाणी या ‘व्हॅन’ उभ्या करून तेथे नास्ता, चहा, जेवण आदी खाद्यपदार्थांची विक्री केली जाणार आहे.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfoodअन्न