शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
3
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
4
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
5
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
6
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
7
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
8
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
9
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
10
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
11
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
12
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
13
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
14
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
15
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
16
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
17
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
18
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
19
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
20
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल

रब्बी हंगामासाठी जायकवाडीतून पहिले आवर्तन सोडले; शेतकऱ्यांमध्ये आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 18:35 IST

छत्रपती संभाजी नगर, जालना व परभणी जिल्ह्यातील पिकांना होणार फायदा...

- संजय जाधव पैठण: रब्बी हंगामासाठी मोसमातील पहिले आवर्तन जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून शुक्रवारी सायंकाळी ४ वा सोडण्यात आले. १०० क्युसेक्स क्षमतेने सुरू करण्यात आलेल्या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार आहे. रब्बी पिकासाठी जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जायकवाडी धरणात सध्या ४५.५६% जलसाठा असून रब्बी हंगामासाठी शुक्रवारी पहिली पाळी सोडण्यात आली आहे. १०० क्युसेक्सने सुरू केलेल्या विसर्गात हळूहळू वाढ करून २००० क्युसेक्स पर्यंत विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. सदर रब्बी पाळीचे पाणी २५ दिवस सुरू राहणार आहे. पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पुढील दोन पाळ्या बाबत निर्णय घेतला जाणार आहे. रब्बी पाळिचे पाणी परभणी जिल्ह्यातील कालवा साखळी क्र. किमी १२२ पर्यंत जाते. हंगामातील पहिले आवर्तन सोडताना विशेष काळजी घ्यावी लागते. सुरवातीला कमी क्षमतेने पाणी सोडून कालव्याची चाचणी घेतली जाते. शेवटपर्यंत विनासयास पाणी पोहचल्यानंतर विसर्गात हळुहळू वाढ करण्यात येते. दरम्यान कालव्यास कुठे गळती लागलेली असल्यास दुरूस्ती करण्यात येते असे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले.

जायकवाडीच्या डाव्या कालव्या अंतर्गत येणाऱ्या लाभक्षेत्रातील १२०००० हे. सिंचन क्षेत्रासाठी जवळपास १७०  दलघमी पाणी २५ दिवसात धरणातून सोडण्यात येणार आहे. सध्या रब्बी हंगामातील गहू, बाजरी, तूर,हरभरा या पिकासह फळबागासाठी कालव्यातून सोडलेले पाणी लाभदायक ठरणार असल्याने जायकवाडी लाभक्षेत्रात येणाऱ्या औरंगाबाद, जालना, व परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांंना मोठा दिलासा मिळाला आहे. 

रब्बी हंगामात तीन तर उन्हाळ्यात पाच आवर्तनेधरणाच्या उपयुक्त पाणीसाठ्यातून रब्बी हंगामात तिन तर  उन्हाळी हंगामात पाच आवर्तने दिले जातात. जलाशयातून एकूण ११४८ दलघमी पाण्याचा वापर केला जातो. परंतु यंदा पिकांची परिस्थिती व उपलब्ध जलसाठ्या नुसार जायकवाडी प्रशासनास पुढील पाणीपाळीचा निर्णय घ्यावा लागणार आहे.

डावा कालव्यावर १४१६४० हे.सिंचनजायकवाडी धरणाच्या २०८ कि मी लांबी असलेल्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात १४१६४० हे. क्षेत्र सिंचना खाली येते यात छत्रपती संभाजी नगर - ७६२० हे,  जालना - ३६५८० हे,  परभणी - ९७४४० हेक्टर क्षेत्र येते या क्षेत्रातील पिकांना फायदा होणार आहे. 

उजव्या कालव्यातूनही पाणी सोडाउजव्या कालव्यावर ४१६८२ हे क्षेत्र सिंचनाखाली येते. जायकवाडीचा उजवा कालवा १३२ कि मी लांबीचा  आहे. या कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यात छत्रपती संभाजी नगर - १४३२ हे,  बीड - ३७९६० हे, व अहमदनगर - २२९० हे क्षेत्रातील पिकांसाठी पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रJayakwadi Damजायकवाडी धरण