शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

बेपत्ता मुलाच्या हत्येनंतर कुटुंबाला सहाव्या दिवशी समजले, पोलिसांनी वाट पाहून केला दफनविधी

By सुमित डोळे | Updated: December 7, 2023 20:04 IST

सोयगावच्या बहुल खेडा येथील तरुणाची हत्या, पोलिसांनी नोटीस दिल्यानंतर झाला होता बेपत्ता

छत्रपती संभाजीनगर : गावातील वादात पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर सोयगाव तालुक्यातील अम्मद मुराद तडवी (३२) हा १८ नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाला होता. २४ नोव्हेंबर रोजी हियामत बाग परिसरात तो गंभीर जखमी अवस्थेत आढळला. कुटुंबाला २९ नोव्हेंबर रोजी ही बाब कळली. सायंकाळी त्यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी नातेवाइकांची वाट पाहून काही तास आधीच दफनविधी पार पाडले होते. ही हत्या असल्याचे ५ डिसेंबर रोजी निष्पन्न झाले व चार संशयितांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

शेती व्यावसायिक अम्मद बहुल खेडा येथे कुटुंबासह राहत होता. १६ नोव्हेंबर रोजी गावातीलच रहेमान आयुब शेख याने सोयगाव पोलिसांकडे अम्मदविरोधात भांडणाची तक्रार केली होती. त्यानंतर गावातीलच ईश्वर भोमा पवारने अम्मदला ठाण्यात नेले. तेव्हा त्याच्यासोबत अख्तर आयुब शेख, आब्बल सयाजी तडवी हेदेखील होते. चौघांनी माझ्या मुलाला तेव्हा जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप अम्मदच्या वडिलांनी केला आहे. रहेमानच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अम्मदला नोटीसदेखील बजावली होती. त्यानंतर अम्मद १८ नोव्हेंबर रोजी अचानक बेपत्ता झाला. तणावातून गेला असेल, पाच वर्षांचा मुलगा, गरोदर पत्नीसाठी तो नक्की घरी येईल, असे कुटुंबाला वाटले. मात्र, अम्मद नंतर घरी परतलाच नाही.

इकडे मात्र हत्यादरम्यान, २४ नोव्हेंबर रोजी हिमायत बागसमोरील जलवाहिन्यांवर अम्मद मृतावस्थेत आढळला. त्याच्या अंगावर गंभीर जखमा होत्या. बेगमपुरा पोलिसांनी विविध माध्यमातून त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. माध्यमे, सोशल मीडियातून संदेश पाठवण्यात आले होते.

शेवटचे पाहायलाही मिळाले नाहीपोलिसांनी २४ ते २९ नोव्हेंबर या काळात अम्मदचा मृतदेह शवागृहाच्या शितपेटीत ठेवून कुटुंबाची वाट पाहिली. त्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी त्याचा दफनविधी करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी पोलिस पाटलांकडून कुटुंबाला अम्मदबाबत कळाले. कुटुंबाने तत्काळ सायंकाळी बेगमपुरा ठाण्यात धाव घेतली. मात्र, त्याच्या काही तास आधीच पोलिसांनी अम्मदचा दफनविधी पार पाडला होता. डॉक्टरांनी अम्मदची हत्या झाल्याचा अहवाल ४ डिसेंबर रोजी दिला. त्यानंतर रहेमान, अख्तर, ईश्वर, आब्बलवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सहायक निरीक्षक हरेश्वर घुगे यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी