शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सहा वर्षांपासून मालवाहतूकनगरची ‘कोंडी’ फुटेना; अहवाल एमएसआरडीसीकडे पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 12:30 IST

फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याने मालवाहतूकदारांच्या आशा पल्लवित

- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : ४ ऑक्टोबर २०१६ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत करोडी शिवारात मालवाहतूकनगर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर सत्तांतर झाले आणि आघाडी सरकारचे या विषयाकडे दुर्लक्ष झाले. आता फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि ही कोंडी फुटेल, अशी अशा मालवाहतूकदार, उद्योजक, व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

औद्योगिक वसाहतीमुळे शहरात दररोज अडीच हजारांपेक्षा अधिक मालट्रक, टेम्पो मुक्कामी असतात. त्यांच्या पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत आहे. शहराबाहेर २० ते २५ कि. मी.च्या हद्दीत मालवाहतूकनगर तयार करण्यात यावे, अशी मागणी २१ वर्षांपासून जिल्हा व्यापारी संघटना, मालवाहतूकदार संघटना करत आहेत. सहा वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत करोडी शिवारात मालवाहतूकनगर उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्याची जबाबदारी एमएसआरडीसीकडे सोपविण्यात आली होती. ३ नोव्हेंबर २०१७मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी करोडी येथील गट क्रमांक २४ मधील २४ हेक्टर जागा एमएसआरडीसीकडे हस्तांतरित केली होती. त्यासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी जाहीर झाला होता. एमएसआरडीसीने प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून मुंबईच्या फोरस्टेक कंपनीची निवड केली होती. या कंपनीने मालवाहतूकदारांची बैठकही घेतली. त्यानंतर प्रकल्पाचा आर्थिक अहवाल कंपनीने एमएसआरडीसीच्या मुंबई कार्यालयातील सहव्यवस्थापकीय संचालकांकडे दिला. पण अजूनही त्यावर कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही.

उपमुख्यमंत्र्यांनी मालवाहतूकनगरकडे लक्ष द्यावेदेवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे येत्या काळात या प्रकरणात ते लक्ष घालतील व प्रकल्प पूर्ण होईल.- अजय शाह, वरिष्ठ उपाध्यक्ष, कॅट

काय असावे मालवाहतूकनगरात ?एकाच वेळी एक हजारच्या जवळपास टेम्पो थांबतील एवढे पार्किंग, लहान मालवाहतूकदारांसाठी खासगी ऑफिस, गॅरेज, गोदाम, वजनकाटा, वाहनचालकांसाठी विश्रांतीगृह, स्वच्छतागृह, हॉटेल, डिझेल, सीएनजी पंप, वेअर हाऊस असावे. बँक, पोस्ट ऑफिस असावे, याचा आराखडा संघटनेने दिला आहे.- फय्याज खान, अध्यक्ष, मालवाहतूकदार संघटना

अहवाल विचाराधीनमालवाहतूकनगर प्रकल्प व आर्थिक नियोजन अहवाल फोरस्टेक कंपनीने मुंबईतील एमएसआरडीसीच्या सहव्यवस्थापकीय संचालकांकडे दिला आहे. हा अहवाल विचाराधीन आहे.- सुरेश अभंग, कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडी