शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
2
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
3
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
4
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
5
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
6
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
7
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
8
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
9
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
10
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
11
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
12
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
13
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
14
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
15
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
16
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
17
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
18
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

बोर्डाला अद्यापही ‘त्या’ ३७२ उत्तरपत्रिकांचा लागेना सुगावा

By विजय सरवदे | Updated: May 22, 2023 21:17 IST

पोलिसांत का जात नाही बोर्ड : दोन दिवसांत मॉडरेटर, प्राचार्यांची सुनावणी

छत्रपती संभाजीनगर : बारावी परीक्षेतील भौतिकशास्त्र विषयाच्या ३७२ उत्तरपत्रिकांमध्ये उत्तरे लिहिणारा ‘तो’ कोण, कोणाच्या ताब्यात उत्तरपत्रिका असताना हा प्रकार घडला. दहा दिवसांहून अधिक कालावधी होत आला, तरीही या गंभीर प्रकरणाचा सुगावा बोर्डाला अद्याप लागलेला नाही. यासंदर्भात बोर्डाचे अधिकारी पोलिसांत का जात नाहीत, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

आता २२ आणि २३ मे या दोन दिवसांत बोर्डात संबंधित मॉडरेटर तसेच प्राचार्यांची सुनावणी घेतली जाणार आहे. या सुनावणीतून त्रैयस्थ व्यक्तीने उत्तरे लिहिल्याची साखळी निष्पन्न होईल, असे अधिकाऱ्यांचा व्होरा आहे. उत्तरपत्रिकांमध्ये हस्ताक्षर बदल असल्याची तक्रार मॉडरेटर्सकडून बोर्डाला करण्यात आल्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले. त्यानंतर बोर्डाने नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार विद्यार्थी, त्यांचे पालक, कस्टोडीयन, केंद्रसंचालक, पर्यवेक्षक आदींकडे चौकशीचा सपाटा लावला.

आता मॉडरेटर आणि प्राचार्यांची चौकशी होणार आहे. यातून तथ्य बाहेर आले नाही, तर पोलिसांत जाण्याचा पवित्रा अधिकाऱ्यांनी घेतला आहे. निकाल जाहीर करण्याची वेळ जवळ येत असताना बोर्डाकडून निव्वळ सुनावण्यावर सुनावण्या घेतल्या जात आहेत. परीक्षा देताना एखाद्या विद्यार्थ्याने केंद्रातून उत्तरपत्रिका पळविली, पाने फाडली किंवा मास कॉपी झाली तर तात्काळ पोलिसांत गुन्हा दाखल केला जातो. मग, हे एवढे मोठेे गंभीर प्रकरण समोर आले असताना बोर्ड पोलिसांकडे न जाता सुनावण्या घेण्यातच वेळ मारुन नेत आहे. बोर्डावर कोणाचा दबाव आहे का, असा शिक्षणतज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केला आहे. चौकट....उत्तरपत्रिकांचा प्रवासपेपर संपल्यानंतर संबंधित केंद्रप्रमुखांच्या स्वाक्षरीने ‘रणर’कडे उत्तरपत्रिका सोपविल्या जातात. ‘रणर’च्या माध्यमातून उत्तरपत्रिका कस्टोडियनकडे सुपूर्द केल्या जातात. कस्टोडियनकडून विषयनिहाय पॅनलवर असलेल्या प्राध्यापकांकडे थेट उत्तरपत्रिका न पाठवता. संबंधित महाविद्यलायांच्या प्राचार्यांच्या नावे टपालाने त्या पाठविल्या जातात. प्राचार्य मग आपल्या महाविद्यालयांतील प्राध्यापकास रोज किती उत्तरपत्रिका तपासणे शक्य आहे, तेवढ्याच मोजून त्याकटे सुपूर्द करतात व तपासलेल्या उत्तरपत्रिका बोर्डाकडे पाठविल्या जातात. दरम्यान, उत्तरपत्रिका योग्य प्रकारे तपासल्या आहेत का, गुणदान योग्य प्रकारे झाले आहे का, याची खातरजमा प्राचार्यांकडून मॉडरेटरकडे करण्याची पद्धत आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद