शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

शिंदे-फडणवीस सरकारने दिलेली स्थगिती खंडपीठाने उठविली; मंजूर विकासकामे करता येणार

By प्रभुदास पाटोळे | Updated: March 3, 2023 21:12 IST

जालना, अंबड, घनसावंगी आणि वसमत तालुक्यातील विकासकामे सुरू करण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षातील अर्थसंकल्पात जालना, अंबड, घनसावंगी आणि वसमत तालुक्यातील मंजूर केलेली, प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता दिलेली व निविदा प्रक्रियेच्या स्तरावरील कामांना शिंदे - फडणवीस सरकारने स्थगिती दिली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील व न्या. संतोष चपळगावकर यांनी शुक्रवारी (दि. ३) स्थगिती उठविली आणि स्थगित केलेली विकासकामे सुरू करण्याचे आदेश दिले. सदरील आदेश हे संपूर्ण राज्यास लागू नसून, केवळ या रिट याचिकेमध्ये आव्हानित केलेल्या कामांपुरतेच लागू असल्याचे ॲड. संभाजी टोपे यांनी सांगितले.

वसमतचे आमदार राजू नवघरे, जालना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश टोपे, पूजा कल्याण सपाटे आदींनी ॲड. संभाजी टोपे यांच्यामार्फत याचिका दाखल करून महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या निधीनुसार कामे व्हावीत, अशी विनंती केली होती. ती खंडपीठाने मंजूर केली आहे. राज्यात शिंदे - फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या काही कामांना स्थगिती दिली होती. निविदा पूर्ण होऊन कार्यारंभ आदेश दिलेल्या विकासकामांना स्थगित करण्यात येऊ नये, असे खंडपीठाने यापूर्वीच्या सुनावणीवेळी बजावले होते. त्यानंतर संबंधित कामांचा शासन स्तरावर आढावा घेतला जात आहे, असे निवेदन शासनाकडून करण्यात आले होते.

खंडपीठात ५ जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीवेळी बऱ्याचशा कामांवरील स्थगिती उठवण्यात आल्याचे शासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, याचिकाकर्त्यांचे वकील संभाजी टोपे यांनी स्थगिती उठवण्यात आलेली कामे केवळ सत्ताधारी पक्षातील आमदारांची असून, विरोधी पक्षातील लाेकप्रतिनिधींच्या कामांवरील स्थगिती कायम असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. सुनावणीच्या वेळी त्यांनी विविध न्याय निवाड्यांचेसुद्धा संदर्भ दिले.

विकासकामांच्या स्थगितीला घटनेच्या धारा २०४ची बाधाॲड. टोपे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार अर्थमंत्री असताना दोन्ही सभागृहांनी आणि राज्यपालांनी याचिकेत दर्शविलेली विकासकामे मंजूर केली होती. अशा प्रकारे मंजूर केलेली कामे राज्य घटनेच्या धारा २०४ नुसार स्थगित करता येत नाहीत. शासन बदलल्यानंतर शिंदे सरकारने कुठलीही प्रक्रिया पूर्ण न करता मंजूर झालेली कामे सचिवांच्या स्वाक्षरीने स्थगित केली. शासनाच्या कामाच्या नियमानुसार (बिजनेस रुल्स) मोठ्या निर्णयासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यक असते, याचे पालन झाले नाही.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठCourtन्यायालयEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे