शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जिवंतपणीच मुलाचं घातलं तेरावं ! गतिमंद मुलास रुग्णालयात सोडून देत निर्दयी मातापित्याचे कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 17:25 IST

शेजाऱ्यांनी मुलाला घाटी रुग्णालयात ओळखले, परंतु आई घेरी नेण्यास येणार आहे असे सांगून त्या गतिमंद मुलाने त्यांच्यासोबत येण्यास नकार दिला.

औरंगाबाद : गतिमंद मुलाला घाटी रुग्णालयात सोडून देत आईवडिलांनी त्याच्या फोटोला हार चढवत 'तेरावा' घातल्याची संतापजनक घटना रांजणगावात उघडकीस आली आहे. तीन महिन्यांपूर्वी कोरोनामुळे १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचे निर्दयी मातापिता सर्वांना सांगत होते. परंतु, परिसरातील काही तरुणांच्या सतर्कतेमुळे ही घटना समोर आली असून त्यांच्या दबावामुळे पित्याने मुलाला आज घरी आणले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, १६ वर्षीय गतिमंद मुलाची सावत्र बापास अडचण होत होती. यामुळे त्याने तीन महिन्यांपूर्वी मुलाला कोरोना झाला असून घाटी येथे उपचार सुरु आहेत असे शेजाऱ्यांना सांगितले. तसेच आठच दिवसानंतर मुलाचे कोरोनात निधन झाले असून घाटी रुग्णालयात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर डोळ्यात खोटे अश्रू आणत निर्दयी मातापित्याने जिवंतपणीच मुलाच्या फोटोला हार चढवत त्याचा 'तेरावा' घातला.

दरम्यान, राजनगाव येथील युवक हाफिज शेख, अमोल शेवनकर, शुभम दुसांगे हे  सोमवारी ( दि. १३ ) कामानिमित्त घाटी रुग्णालयात गेले होते. येथे तो गतिमंद मुलगा भिक्षा मागत असल्याचे दिसले. त्याच्याजवळ जात तुला घरी घेऊन जातो असे म्हटले. यावर मुलाने माझी आई नेण्यास येत आहे असे सांगत येण्यास नकार दिला. परत आल्यानंतर युवकांनी मुलाच्या मातापित्यास याची माहिती दिली असता त्यांनी तो कोणी दुसरा असेल म्हणू वेळ मारून नेली. मात्र, युवकांनी शेजाऱ्यांना याची माहिती दिली. सर्वांनी मिळून निर्दयी मातापित्यास मुलाला घेऊन या अन्यथा आम्ही पोलिसात माहिती देऊ असे खडसावले. यामुळे पित्याने घाटी रुग्णालयात जाऊन मुलाला घरी परत आणले. यानंतर शेजाऱ्यांनी गतिमंद मुलगा आणि बापाला पोलिस ठाण्यात नेले. येथे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी यापुढे मुलाला व्यवस्थित सांभाळण्याची बापाला तंबी दिली. तसेच मुलाला नवीन कपडे खरेदी करण्यासाठी पैसे ही दिले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक