शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

तेरा करम है मौला, मावळा मी शिवरायांचा ये स्वराज्य है मेरा

By सुमेध उघडे | Updated: February 19, 2020 13:01 IST

छत्रपती शिवाजी महाराज जयंती : उदयोन्मुख गायकाचा कवालीतून शिवाजी महाराजांच्या मुस्लिम मावळ्यांवर प्रकाश

ठळक मुद्दे पहिल्यांदाच मराठी कवालीमधून शिवाजी महाराजांची सर्वधर्मसमभावाची प्रतिमा मांडली आहे.

- सुमेध उघडे 

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण केले. शिवरायांचे स्वराज्य हे सर्व जातीधर्मातील जनतेचे स्वराज्य होते. शिवरायांनी आपल्या राज्यात कधीही भेदाभेद केला नाही. त्यांना साथ देणारे जसे हिंदू अठरा पगड जातीचे होते, तसेच मुस्लिम मावळेसुद्धा होते. यावर कवालीच्या माध्यमातून शहरातील उदयोन्मुख गायक अजय देहाडे यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.     

ही बारा बलुती जाती अठरा पगड सोबत चालतीमावळे खंबीर शूरवीर गडकिल्ले हे जिंकतीहिंदू-मुस्लिम भेदभावाचा गेला पुसुनी ठसाकल्याणकारी समतेचा जपला त्यांनी वारसासांगा बरं शिवाजी राजा मुस्लिमविरोधी कसा..  

असा सडेतोड सवाल करीत या कवालीतून शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्ष प्रतिमा आपल्या समोर येते. पनवेल येथील गीतकार अमोल कदम यांनी हृदयाचा ठाव घेणाऱ्या शब्दांत पहिल्यांदाच मराठी कवालीमधून शिवाजी महाराजांची सर्वधर्मसमभावाची प्रतिमा मांडली आहे. आज समाजात जातीपातीवरून द्वेष पसरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे शिवाजी महाराजांच्या मुस्लिम मावळ्यांनी गाजवलेले शौर्य पुन्हा एकदा सांगण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने ही कवाली रचली गेली, असे गीतकार कदम सांगतात. कवालीचे संगीत संयोजन उज्ज्वल वळुंजे यांनी केले होते. मुस्लिम मावळ्यांचे वर्णन करताना गीतकार म्हणतात, 

महाराजांच्या सेवेला मदारी मेहतरआरमार प्रमुख दर्यासारंग खंबीर तत्परसेनापती नूरखान बेग सारे जागले इमानासिद्धी इब्राहिम सांभाळतो महाराजांचा तोफखाना वकील काझी हैदर पराक्रमी सिद्धी हिलाल वाघ नखांचा कारागीर रुस्तमे जमाल 

शिवरायांचे आरमार हे इंग्रज, सिद्दी आणि पोर्तुगीजांनादेखील धडकी भरविणारे होते. सामुद्रिक तटबंदी सुरक्षित ठेवण्यासाठी आरमार दलाची कामगिरी महत्त्वाची होती. अशा आरमार दलाच्या प्रमुखपदी शिवरायांनी दौलतखानची नेमणूक केली. शिवरायांकडे अत्याधुनिक तोफखाना होता. इब्राहिमखान हे शिवरायांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. शिवरायांच्या स्वराज्यात सातशे निष्ठावान पठाणांची फौज होती. शिवरायांच्या स्वराज्याचा पहिला सरनौबत नूरखान बेग होता. घोडदळातील अत्यंत महत्त्वाच्या पदावर सिद्दी हिलाल आणि सिद्दी वाहवाह होते. शिवाजीराजांच्या अंगरक्षक दलात एकूण एकतीस अंगरक्षक होते. सिद्दी इब्राहिम हे शिवाजीराजांचे अंगरक्षक होते. शमाखान हे शिवरायांचे विश्वासू सरदार होते. मदारी मेहतर हे महाराजांच्या आगरा भेटीच्या वेळी आणि त्यांना तेथून बाहेर काढण्याच्या मोहिमेत अग्रभागी असणारे स्वराज्यनिष्ठ होते. अशा अनेक धाडसी, शूरवीर मुस्लिम मावळ्यांची आठवण या कवालीतून पुढे येते. 

शिवाजी महाराजांची लढाई कोणत्याही जातीधर्माविरुद्ध नव्हती, तर सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट यासाठी शिवरायांची तलवार तळपत होती. यावर समाजात अधिक प्रबोधन व्हावे, चर्चा व्हावी यावरच कवालीचा शेवट होतो तो पुढील शब्दांत... 

धर्मविरोधी शिवाजी राजा नका रंगवू आज रे  मानवतेचे स्वराज्य आपले तोच आपला साज रेजानो शिवाजी मानो शिवाजी दिखा दो शिवाजीविचारो का इस जहाँ जो सीखा दो शिवाजी

शिवाजी महाराज आदर्शशिवाजी महाराज आपल्या सर्वांचे आदर्श आहेत. त्यांच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वांचा प्रसार होणे अधिक आवश्यक आहे. कवालीचे रेकॉर्डिंग झाले असून, लवकरच ते आपल्या समोर येईल. - अजय देहाडे, गायक- संगीतकार

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivjayantiशिवजयंतीAurangabadऔरंगाबादSocialसामाजिक