शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

शिक्षण मंडळाच्या डोक्याला ताप; दहावीच्या मूल्यांकनात शाळांकडून चुकांचा भडिमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 16:38 IST

SSC Results : मूल्यांकन २१ जूनपासून ऑनलाईन भरण्याचे वेळापत्रक होते. २४ जूनला शिक्षण मंडळाची संगणकीय प्रणाली सुरळीत सुरू झाली.

ठळक मुद्देबोर्डाकडून ३ दिवस मुदतवाढीची विनंतीया विद्यार्थ्यांचे निकाल रखडणार...

- योगेश पायघनऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संगणकीय प्रणालीवर शाळांकडून दहावीच्या विद्यार्थ्यांच्या भरलेल्या निकालात चुकांचा भडिमार केला आहे. त्या चुकांची दुरुस्ती करता-करता नाकीनऊ आल्याने विभागीय शिक्षण मंडळाकडून पुढे ३ दिवसांची मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे.

इयत्ता नववी व दहावीच्या मूल्यांकनाच्या आधारे दहावीचा निकाल लागणार आहे. हा निकाल जून महिन्याच्या अखेरपर्यंत लागेल, असे सुरुवातीला सांगण्यात येत होते. त्यानंतर १५ जुलैपर्यंत निकाल लागेल, असे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले. मात्र, शाळांनी असंख्य चुका निकाल भरताना केल्या आहेत. त्यांची दुरुस्ती आणि तांत्रिक अडचणींमुळे प्रक्रिया आणखी वेळखाऊ होऊ शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे. मूल्यांकन २१ जूनपासून ऑनलाईन भरण्याचे वेळापत्रक होते. २४ जूनला शिक्षण मंडळाची संगणकीय प्रणाली सुरळीत सुरू झाली. त्यामुळे दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी ३० जूनपर्यंतची मुदत २ दिवस वाढविल्याने २ जुलैपर्यंत हे काम चालले. त्यानंतर दुरुस्ती, विषय बदल, त्रुटी आदी कामे सध्या बोर्डाच्या ईडीपी विभागाकडून सुरू आहेत.

मुदतवाढीची विनंती केलीनिकाल भरल्यावर निश्चिती केली नाही. श्रेणी व्यवस्थित टाकली नाही. माध्यमांतील बदल केला. संपूर्ण शाळा राखीव ठेवली. आता पूर्ण शाळेचे गुण बोर्डाला भरायचे आहेत. अशा असंख्य चुका आहेत. चुकांचे प्रकार वेगवेगळे आहेत. त्यानुसार त्यांच्या दुरुस्त्यांची संख्याही वेगवेगळी आहे. त्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. नऊ जुलैपर्यंत मुदत होती. ती आम्हाला १०, ११, १२ जुलैपर्यंत किमान तीन दिवस वाढवून हवी आहे, असे विभागीय शिक्षण मंडळाचे सहसचिव आर. पी. पाटील यांनी सांगितले.

या विद्यार्थ्यांचे निकाल रखडणार...विभागीय शिक्षण मंडळात दहावीसाठी अर्ज केलेल्या १ लाख ७७ हजार ७६२ विद्यार्थ्यांपैकी २ हजार ५६० विद्यार्थ्यांचा निकाल अंतिम केलेला नाही. त्यात औरंगाबाद जिल्ह्यात ६०१ जणांच्या निकालाची निश्चिती झाली नाही, तर ९७ विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे अपूर्ण व निकाल निश्चित न झालेल्या विद्यार्थ्यांच्या निकालाची जबाबदारी शाळांवर आली आहे. राहिलेल्या विद्यार्थ्यांचे करायचे काय, याबद्दल मुदतवाढ मिळाली नाही. 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी