शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

दहा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

By admin | Updated: November 8, 2015 23:37 IST

तेर : येथील तेरणा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एका १० वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाला़ ही दुर्दैैवी घटना रविवारी दुपारी तेरणा नदीपात्रातील खोलीकरणात घडली

तेर : येथील तेरणा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एका १० वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाला़ ही दुर्दैैवी घटना रविवारी दुपारी तेरणा नदीपात्रातील खोलीकरणात घडली असून, बालकाच्या मृत्यूमुळे रूग्णालय परिसरात नातेवाईकांनी एकच आक्रोष केला़ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेर येथील पृथ्वीराज काकासाहेब देवकते (वय-१०), प्रमोद काकासाहेब देवकते या दोघा भावंडांसह अशोक बालाजी देवकते हे तिघे रविवारी दुपारी श्री संत गोरोबा काका मंदिराजवळ तेरणा नदीपात्रात करण्यात आलेल्या शिरपूर पॅटर्नमध्ये साठलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेले होते़ तेथे अशोक देवकते व पृथ्वीराज देवकते हे दोघे पाण्यात उतरले़ मात्र, ते पाण्यात बुडू लागल्याने नदीच्या काठावर बसलेल्या प्रमोद देवकते याने पोहता येत नसतानाही पाण्यात उडी मारून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला़ मात्र, तोही पाण्यात बुडू लागल्याने ओरडू लागला़ मुलांच्या ओरडण्याचा आवाज आल्यानंतर मंदिराच्या भिंतीचे काम करणारे मिस्त्री चंद्रकांत मोरे यांनी पाण्यात उडी मारून प्रमोद देवकते व अशोक देवकते या दोघांना बाहेर काढले़ त्यावेळी प्रमोद देवकते यांनी माझा भाऊ पृथ्वीराजही बुडत असल्याचे सांगितल्यानंतर मोरे यांनी पाण्यात उडी मारून त्याचा शोध घेतला़ मात्र, तो सापडत नसल्याने मंदिरातील सुरक्षा रक्षक परमेश्वर सरवदे यांना बोलावून घेतले़ सरवदे यांनी पाण्यात उडी मारून शोध घेतल्यानंतर तो पाण्यात तळाला सापडला़ पृथ्वीराजला बाहेर काढून पोटातील पाणी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला़ त्यानंतर त्याला तेर येथील ग्रामीण रूग्णालयात नेल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ़ देशमुख यांनी त्याला मयत घोषित केले़ या घटनेनंतर मयताच्या नातेवाईकांनी रूग्णालय परिसरात एकच आक्रोष केला़ ऐन दिवाळीच्या सणात ही घटना घडल्याने देवकते कुटुंबासह तेर गावावर शोककळा पसरली आहे़ तेर येथील शिरपूर पॅटर्न अंतर्गत करण्यात आलेल्या नदीपात्रातून तेर गावाला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे़ मात्र, दर्शनासाठी येणारे भाविक याच पाण्यात अंघोळ करीत असून, मयताची राखही टाकली जात आहे़ त्यातच एका बालकाचा या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे़ त्यामुळे प्रशासनाने या नदीपात्राच्या परिसराच्या स्वच्छतेसाठी व सुरक्षेसाठी एका कर्मचाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे़